Thursday, 15 September 2022

ठेव ईश्वरा ची


 

कांदा

 नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना पत्र

------

शुल्क व करपरतावा माफीचा लाभ वाढवावा अशी विनंती

 

            मुंबईदि. 15 : काद्यांचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.  त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्वारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड) करण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहारअन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियूष गोयल यांना केली आहे.

            या संदर्भामध्ये दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणतात कीकांदा हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून देशातील एकूण उत्पादनाच्या 35 ते 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. चांगल्या पावसामुळे कांद्याचे उत्पादन 2021-22 मध्ये 136.70 लाख मे.ट. झाले जे की त्यापूर्वीच्या वर्षीपेक्षा 20 लाख मे.टनाने जास्त होते.  एकंदरच बाजारपेठेतील किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये निराशा आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले.  एरवी श्रीलंकेकडून मोठ्या प्रमाणावर कांदा आयात होते मात्रतेथील आर्थिक संकटामुळे या आयातीमध्ये देखील अडचणी आल्या आहेत.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सततच्या बदलत्या परिस्थितीमुळे आपल्याकडील शेतकऱ्यांना निर्यातीतून उत्तम किंमत मिळणे शक्य होत नाही.

            केंद्र सरकारने देखील निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि कर माफीच्या योजनेत (Remission of Duties and Taxes on Export Products- RoDTEP) 2 टक्के ऐवजी 10 टक्क्यांपर्यंत लाभ वाढवून द्यावा अशी राज्य सरकारची विनंती देखील नाकारली आहे. आपल्या मंत्रालयाने या योजनेत 10 टक्क्यांपर्यंत लाभ दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायद्याच होईल.  त्याचप्रमाणे सध्या नाफेडकडून कांदा खरेदी सुरु आहे ती आणखी 2 लाख मे.टनाने वाढवावी, अशी देखील विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नाफेडने यापूर्वीच 2.38 लाख मे.टन कांदा खरेदी यावर्षी एप्रिल ते जून मध्ये केली आहे.  आणखी 2 लाख मे.टन खरेदी केल्यास कांदा उत्पादकांना किंमतीच्या बाबतीत दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

गो गुगली

 *Okay Google,*

 *माझ्या पत्नीला कॉल करा आणि तिला सांगा की, मला घरी यायला उशीर होईल.*

 *आणि रात्रीच्या जेवणासाठी स्पेशल काहीतरी बनवून ठेव*.

" *Google :-*

 *ठीक आहे,*

 *काही वेळानंतर...*

 *Google:-*

 *पुढच्या वेळी तुम्ही स्वतः तुमच्या पत्नीशी बोला...एवढं कोण ऐकून घेणार तुमच्या बायकोचं*

 😠😅😂🤣

लिलाव लालबाग राजा चरणी वस्तू

 जय गणेश 🙏

नमस्कार..!

लालबागच्या राजाच्या चरणी गणेशोत्सवादरम्यान भाविकांकडून अर्पण करण्यात आलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा जाहीर लिलाव ऊद्या गुरूवार दिनांक १५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजल्यापासून रात्रौ ठीक दहा वाजेपर्यंत लालबागच्या राजाच्या मंडपात आयोजित करण्यात आलेला आहे याची कृपया सर्व भाविकांनी नोंद घ्यावी.🙏🙏

परिषद उद्योग

 ही परिषद राज्याच्या विकासाला मार्गदर्शक ठरणार - ललित गांधी*


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रीकल्चर या महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी उद्योग क्षेत्राच्या शतक महोत्सवी शिखर संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उद्योग परिषदेचे आयोजन गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत तळमजला साउथ लॉन्स, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
भारताच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राची प्रगती भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आणि मेक इन महाराष्ट्र मध्ये उद्योगांची भूमिका या विषयावर आयोजित राज्यस्तरीय परिषदेमध्ये मुख्य पाहुणे भारत सरकारचे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नाम. श्री. नारायण राणे व प्रमुख पाहुणे महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री नाम. श्री. उदय सामंत हे भारताच्या सूक्ष्म लघु व मध्यम क्षेत्राची प्रगती - भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आणि मेक इन महाराष्ट्र मध्ये उद्योगांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यस्तरीय परिषदेत युवा सक्षमीकरणासाठी कौशल्य विकासाची भूमिका आणि राष्ट्र निर्माण या विषयावर महाराष्ट्र सरकारचे पर्यटन व कौशल्य विकास मंत्री नाम. श्री. मंगलप्रभात लोढा हे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या  राज्यस्तरीय परिषदेमध्ये राज्यातील व्यापार, उद्योगांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा व मार्गदर्शन होणार असून केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी असलेल्या योजनांची माहिती मिळणार असून ही राज्यस्तरीय परिषद राज्याच्या व्यापार, उद्योग क्षेत्राला मार्गदर्शक ठरेल अशी माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे. तसेच व्यापारी उद्योजकांनी मोठ्या संख्येने राज्यस्तरीय परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र मानगावे, उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर ,उपाध्यक्ष तनसुख झांबड, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर व कार्यकारीणी समितीने केले आहे.

भवताल

 या विहिरीचे पाणी कधीच आटत नाही?

 ...त्यासाठी भूजलाची ओळख करून घ्यावी लागेल

.

महाराष्ट्रात अशा काही विहिरीझरेनैसर्गिक जलस्रोत आहेत की त्यांचे पाणी कधीच आटले नाहीअगदी १९७२ सारखा भीषण दुष्काळात आणि नंतरच्या दुष्काळांमध्येही ते टिकून होतेयावरून काही जण मानतात की या जलस्रोतांना स्वत:चे पाणी असतेत्यामुळे ते आटत नाहीत... कितीही पाणी उपलसे तरी!


·  पण जमिनीत आपोआप पाणी निर्माण होते का?

·  जमिनीतील पाण्याशी पावसाचा संबंध असतो का?

·  जमिनीतील जलसाठ्यांना पाणी का  कसे लागते?

·  कितीही उपसले तरी त्यांचे कमी होत नाही का?

·  मग असे कितीतरी प्रश्न निर्माण होतात.


त्यांची उत्तरे उलगडण्यासाठी भूजल समजून घ्यावे लागेल.

त्यासाठीच,

भवताल शॉर्ट कोर्सेससत्र .


भूजलहडप्पा संस्कृतीदेवराई आणि प्लास्टिक या घटकांची ओळख करून देणारी सेशन्स.

 

मर्यादित प्रवेश; सहभागींना प्रमाणपत्र.

 

नावनोंदणीसाठी लिंक:

https://bhavatal.com/ShortCourses2

 

अधिक माहितीसाठी:

९५४५३५०८६२ bhavatal@gmail.com


--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com


भारतीय संस्कृती

 स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी

- सुधीर मुनगंटीवार

आयस्ट्रीम कॉन्ग्रेस 22 परिषदेचे उद्घाटन

 

          मुंबईदि. 14 : स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. मुंबईत आयस्ट्रीम कॉन्ग्रेस 22 या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

            ते पुढे म्हणाले की,  हे माध्यम  दुधारी आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करायचा की नकारात्मक हे आपल्या हातात आहे. त्यामुळे स्ट्रीमिंग उद्योगाने देश उभारणीत आपला वाटा सकारात्मक पद्धतीने उचलावा. आज प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी असतोत्यामुळे या उद्योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर थेट प्रभाव पडतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मनोरंजन कर कमी करत या उद्योगाला मदत केली. महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही ठामपणे या उद्योगाच्या पाठी उभे आहोत.

            श्री.मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले कीआज अमेरिकेत लाखो विद्यार्थी संस्कृत शिकत आहेततर जर्मनीमधल्या विद्यापीठांमध्ये भारतशास्त्र (इंडॉलॉजी) अभ्यासक्रमांना प्रचंड मागणी आहे. जगभरात भारताचे आकर्षण वाढले आहे. अशावेळी स्ट्रीमिंग उद्योगाने भारतीय संस्कृती व ज्ञान परंपरा जगासमोर चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे.

            यावेळी हरित नागपालप्रसाद संगमेश्वरनसत्रजीत सेन, शाहबाझ खान आदी उपस्थित होते.

००००




Featured post

Lakshvedhi