Thursday, 25 August 2022

कोळीवाडा विकास

 कोळीवाड्यांचा विकासन .वीन नियमावलीनुसार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.

            मुंबई, दि 25 : मुंबई शहरातील कोळीवाड्यांचा विकास नवीन विकास नियमावलीनुसार केला जाईल असे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

            लक्षवेधी सूचनेवरील चर्चेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईतील कोळीवाड्यांचे रेखांकन करण्यात आले आहे. रेखांकनाच्या बाहेर असलेल्या झोपडपट्टींचा विकास केला जाईल. मात्र रेखांकनात समावेश असलेल्या कोळीवाडा क्षेत्रांचा विकास करण्यासाठी नवीन विकास नियमावली तयार करण्यात येत आहे. त्या नियमावलीनुसार कोळी वाड्यांचा विकास केला जाईल.

            मुंबईतील विविध झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्रकल्पांबाबत सर्व आमदारांची व्यापक बैठक बोलावली जाईल. तसेच झोपडपट्टी पात्रतेबाबत एक विशेष कार्यप्रणाली विकसित केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            झोपडपट्टी पुनर्वसन विकास करताना भाडे न देणाऱ्या विकासकांविरुध्द कारवाई करण्यात येईल. भाडे देण्यासाठी सक्ती करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

            कॅप्टन आर. तमिल सेल्वन, अस्लम शेख, योगेश सागर, अतुल भातखळकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.


००००

शिवम

 


Swami समर्थ


 

अल्पसंख्यक

 अल्पसंख्याक विभागातीलरिक्त पदे लवकरच भरणार

मंत्री सांदीपान भुमरे यांची माहिती.

            मुंबई, दि. 25: अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री सांदीपान भुमरे यांनी आज विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते.

            मंत्री सांदीपान भुमरे यांनी सांगितले की, अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. रिक्त असणाऱ्या पदाच्या भरतीची कार्यवाही लवकरच करण्यात येईल.

            अल्पसंख्याक विभागाच्या अखत्यारितील विविध समित्या आणि मंडळावरील नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच अल्पसंख्याक विभागात निधी खर्च होण्यासाठी विविध विभागांशी समन्वय ठेवण्यात येईल, अशी माहितीही मंत्री भुमरे यांनी दिली.

            सदस्य रईस शेख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.


०००००

चौकशी

 दुधनी परिसरातील गैरप्रकारांचीसखोल चौकशी करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.

            मुंबई दि. 25 : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या विविध गैरप्रकारांबाबत चौकशी करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

            सदस्य सचिन कल्याणशेट्टी यांनी आज उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते.

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिसरातील विविध प्रकारच्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.



गणेशो्सवानिमित्त सूचना

 गणेशोत्सव काळात भाविकांची गैरसोय आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठीमुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोकणाकडे ये - जा करणाऱ्या अवजड वाहनांना प्रतिबंध

·       जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना निर्बंधातून सूट

            मुंबईदि. 24 : गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच त्या मार्गावर ये जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गृह (परिवहन) विभागाने अशा वाहनांना या मार्गावर प्रतिबंध केला आहे. त्या संदर्भातील आदेश दि. २३ ऑगस्ट२०२२ रोजी जारी करण्यात आले आहेत.

            दि.२७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून (००.०१ वाजेपासून) ते दि.१० सप्टेंबर रोजीच्या रात्री आठ वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर वाळू/रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहणार आहे. परंतुवरील निर्बंधबंदी दूधपेट्रोल/डिझेलस्वयंपाकाचे गॅस सिलेंडरलिक्वीड मेडिकल ऑक्सिजनअन्न धान्यभाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या रस्ता रुंदीकरण /रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्यमाल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

            महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासीयांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते.  राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरुन जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतूकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणा-या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोंडी होऊन प्रवाशांची गैरसोय होतेत्यामुळे गृह (परिवहन) विभागाने मोटार वाहन अधिनियम१९८८ च्या कलम ११५ मधील तरतूदीचा वापर करुन  सार्वजनिक हितास्तव पनवेल ते

इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ (रा.म.क्र.जुना क्र.१७) (पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेणवडखळनागोठाणेकोलाडइंदापूरमहाडखेडचिपळूण, संगमेश्वरराजापूरकणकवलीकुडाळसावंतवाडी) वरुन होणारी वाळू/रेती भरलेल्या ट्रकचीमोठ्या ट्रेलर्सच्या तसेच अवजड वाहनांच्या वाहतूकीस प्रतिबंध केला आहे. त्याबाबतचे आदेश विभागाने जारी केले आहेत.

            या आदेशानुसार,  गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा प्रवास/ मुर्तीचे आगमन ( दि.२७.०८.२०२२ रोजी ००.०१ वाजेपासून ते दि.३१.०८.२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत) कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे (जड-अवजड वाहनेट्रकमल्टीएक्सलट्रेलर इ. वाहने) अशा वाहनांना वाहतुकीसाठी बंदी असेल.

            पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचे विर्सजन/गौरी गणपती विसर्जन/ काही अंशी परतीचा प्रवास ( दि. ०४.०९.२०२२ रोजी ०८.०० वाजेपासून ते दि.०६.०९.२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत) कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहनेट्रकमल्टीएक्सलट्रेलर इ. वाहने) अशा सर्व वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद असेल.

            अनंत चतुर्दशी १० दिवसांचे गणपती विसर्जन/ परतीचा प्रवास ( दि.०९.०९.२०२२ रोजी ०८.०० वाजेपासून ते दि.१०.०९.२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत)  या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर सर्व वाहने ज्यांची वजनक्षमता १६ टन किवा १६ टनापेक्षा जास्त आहे. (जड-अवजड वाहनेट्रक,

मल्टीएक्सलट्रेलर इ. वाहने) वाहतुकीस पूर्णत: बंद असेल.

            दि.२७.०८.२०२२ रोजी ००.०१ वाजेपासून ते दि.१०.०९.२०२२ रोजी २०.०० वाजेपर्यंत या कालावधीत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर वाळू/रेती व तत्सम गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंद करण्यात यावी. परंतुवरील निर्बंधबंदी दूधपेट्रोल/डिझेलस्वयंपाकाचे गॅस सिलेंडरलिक्वीड मेडिकल ऑक्सिजनअन्न धान्यभाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ च्या रस्ता रुंदीकरण /रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्यमाल इ. ने-आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार

नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग/महामार्ग पोलीस यांना सूचना.


शिक्षक deeeeeeeen

 *शिक्षक कुठे काय करतो*


वकील, डॉक्टर, आणि कलेक्टर

सारं तुम्हास करण्या जीव त्याचा झुरतो

तरी,कुणीही उठतं शेमडं बंब आजकल

म्हणे शिक्षक कुठे काय करतो

वेळ जनगणनेची आली

त्यांनी अशी तयारी केली

दिसभर विद्यादान करी

रात्री जनगणना सुरू झाली

वेळ मिळेना देण्या कुटुंबाला

सर्व्हे करण्या दारोदारी फिरतो

तरी कुणीही उठतं.....।।

निवडणुकीची आली वारी

सारे शिक्षक बनले अधिकारी

कुटुंबाची त्यास नाही पर्वा

राष्ट्रीय कार्य जोमाने करी

निष्पक्षपाती,इमानदार तो

साऱ्यांस असा आदर्श तो ठरतो

तरी कुणीही उठतं.......

सर्व्हेक्षण साऱ्या गावाचे करी

पोलिओ डोस पाजले दारोदारी

असा अष्टपैलू आहे का कुणी

कामे एकटाच सगळे करी

डोईवरी बोजा अशैक्षणिक कामाचा

विद्यादान तरीही इमाने करतो

तरी कुणीही उठतं.......

कोरोना संकट आले देशावरी

इथेही जोमाने तो देशकार्य करी

कोवीड-१९ योध्दा बनला असा

राष्ट्रीय कार्य सदैव उरी

सेवा देताना कैक बळीही गेले

तो ही देशासाठी शहीद इथे ठरतो

तरी कुणीही उठतं........

पोतं पोषण आहाराचे डोईवरी

कारकून-शिपायांचंही काम तो करी

कुटुंबकल्याणाच्या केसही केल्या

कधी प्रौढ शिक्षणाचीही ओढली दोरी

प्रामाणिकपणे हे सारे करण्या

धावपळ करून एकटाच मरतो

तरी,कुणीही उठतं शेमडं बंब आजकल

म्हणे शिक्षक कुठे काय करतो 


*श्री. सुभाष बाबू ओव्हाळ*

*माणगांव, रायगड.*

Featured post

Lakshvedhi