सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 25 August 2022
Wednesday, 24 August 2022
आरोग्य अर्थ सल्ला
*हेल्थ इन्शुरन्स (आरोग्य विमा)*
*Must Read For All...*
हेल्थ इन्शुरन्स वरील खर्च म्हणजे काहीजणांना वायफळ खर्च वाटतो.
परंतु अनेकांना हे माहीत नसतं किंवा माहित असूनही काही लोक याकडे दुर्लक्ष करतात की आपण आयुष्यभर साठविलेले पैसे हे एका क्षणात पूर्णपणे दवाखान्यात खर्च होऊन जातात. आपले मित्र किंवा नातेवाईक अशा वेळी आपल्याला मदत करतीलच असे नाही. तसेच दवाखान्यात आपण आपल्या रुग्णाला ठेऊन पैशासाठी कुठे कुठे फिरणार,
तसेच हॉस्पिटलचा वाढलेला खर्च हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच पैसे भरल्या शिवाय हॉस्पिटल मध्ये रुग्णावर उपचार सुरू केले जात नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या वर प्रभावी उपाय म्हणजे वेळेतच हेल्थ इन्शुरन्स घेणे होय....
कृपया मेडिक्लेम घेतलेला नसेल तर लगेच काढून घ्या...
मेडिक्लेम पॉलिसी बद्दल तुमच्यासाठी हि माहिती पाठवीत आहे.
*मेडिक्लेम म्हणजे काय ?*
१)अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा
२)अपघाता मुळे २४ तासा पेक्षा अधिक कालावधी साठी किंवा
३)२४ तासा पेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच इन्शुरन्स कंपनी कडून दावा/ क्लेम मंजूर करून
एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात मध्ये भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च इन्शुरन्स कंपनी कडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्र इन्शुरन्स कंपनीत दाखल करून परत मिळवता येतो.
*मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात.*
१)खोलीभाडे
२)नर्सिंग चार्जेस
३)डॉक्टर तपासणी चार्जेस
४)डॉक्टर फेरी चार्जेस
५)आय सी यु चार्जेस
६)एन आय सी यु चार्जेस
७)गोळ्या,औषधे,सलाइन खर्च
८)सोनोग्राफी खर्च
९)एम आर आय खर्च
१०)सिटी स्कॅन खर्च
११)रक्त,लघवी तपासणी खर्च
१२)रक्त पिशवी खर्च
१३)विशेष लॅबोरेटरी तपासण्याचा खर्च
१४)रुग्णवाहिका खर्च
१५) ऑपरेशन थेटर चे भाडे खर्च
१६)डॉक्टर सर्जरी खर्च
असे व आणखी इतर खर्च मिळतात.
*मेडिक्लेम काढणे गरजेचे का आहे ?*
१)अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.
२)बँकेत बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.
३)बँकेतली एफ डी मोडावी लागते.
४)सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.
५)शेअर्स विकावे लागतात
६)नातेवाईक मित्र मंडळी यांचे कडे हात पासरावे लागतात.
७)बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते.
८)या खर्चां करिता घर, गाडी जमीन विकताना लोक दिसतात.
९)वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.
*मेडिक्लेम असल्यास*
१)आपण निश्चिन्त मनाने मानसिक आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटलच्या खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.
२)हॉस्पिटल मध्ये डिपॉझिट भरण्याची शक्यतो गरज पडत नाही.
३)बँक, खाजगी सावकार यांचे कडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर, गाडी, जमीन, प्लॉट, फ्लॅट, दुकान विकण्याची वेळ येत नाही.
४)चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.
५)नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हात पसरण्याची वेळ येत नाही.
६)भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.
मेडिक्लेम ची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही. आणि वेळेवर मेडिक्लेम घेतली तरी लाभ त्वरीत मिळेलच असे नाही.
मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.
इन्शुरन्स हा ह्युमन लाईफ व्हॅल्यु प्रमाणे असायला हवा. HLV प्रमाणे त्यामध्ये सेविंग पाॅलिसी - लाईफ इन्शुरन्स , हेल्थ पाॅलिसी - मेडिक्लेम इंशुरन्स , टर्म पाॅलिसी, अॅक्सीडेंट इन्शुरन्स यांचा समावेश असायला हवा , वेळेनुसार इन्कमनुसार सर्व घ्या पण मेडिक्लेम पहिला घ्या कारण आजारपणात पैसा वाचवला तरच तो इतरत्र गुंतवणूक करण्याचा विचार मनात येईल ,म्हणून म्हणतात इन्शुरन्स हि आग्रहाची विषय वस्तू आहे. इन्शुरन्स विकत घेण्यासाठी आग्रह करावा लागतो.
*संपर्क-अधिकृत विमा सल्लागार*
वैशाली भगत.
९८३४२७१६७२
धन्यवाद🙏
Good morning
*“Pages of yesterday cannot be revised, but the pages of today & tomorrow are blank & you hold the pen... Make it an inspiring story... We are the architect of our Destiny ....”*
*Good morning*😊
नुकसानभरपाई
सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई
· मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केले महत्वपूर्ण निर्णय.
मुंबई, दि. 23 : सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
सन २०२२ च्या माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेत सर्वश्री विरोधी पक्ष नेते अजित पवार, अशोक चव्हाण, समीर कुणावार, संजय गायकवाड, भास्करराव जाधव, छगन भुजबळ, नाना पटोले, बच्चू कडू, राजेश पवार, चंद्रकांत नवघरे, सुरेश वरपूडकर, कैलास पाटील, धर्मरावबाबा आत्राम, प्राजक्त तनपुरे, ॲड. आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडे, राजेश टोपे, किशोर जोरगेवार, हिरामण खोसकर, हरीश पिंपळे, अनिल पाटील यासह मान्यवर सदस्यांनी आपली मत मांडून विविध मागण्या मांडल्या होत्या.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.
पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर
नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे ई-पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे अशा प्रकारची प्रणाली नव्याने विकसित करण्यात येत आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (सॅटेलाइट इमेज) वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.
किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील मदत
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्
निवासस्थान
राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना निवासस्थानाचे वाटप
मुंबई, दि. 23 : शासनाकडून राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना बंगला / निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार विविध मंत्री आणि त्यांना वाटप करण्यात आलेली निवासस्थाने पुढीलप्रमाणे आहेत.
श्री. राधाकृष्ण विखे-पाटील (रॉयलस्टोन),
श्री. सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी),
श्री. चंद्रकांत (दादा) पाटील (ब-१ (सिंहगड),
श्री. विजयकुमार गावीत (चित्रकुट),
श्री. गिरीश महाजन (सेवासदन),
श्री. गुलाबराव पाटील (जेतवन),
श्री. संजय राठोड ( शिवनेरी),
श्री. सुरेश (भाऊ) खाडे (ज्ञानेश्वरी),
श्री. संदिपानराव भुमरे (ब-२ (रत्नसिंधु),
श्री. उदय सामंत (मुक्तागिरी),
श्री. रवींद्र चव्हाण ( अ-६ (रायगड),
श्री. अब्दुल सत्तार अब्दुल नबी (ब-७ (पन्हाळगड),
श्री. दीपक केसरकर (रामटेक),
श्री. अतुल सावे (अ-३ (शिवगड),
श्री. शंभूराज देसाई (ब-४ (पावनगड) आणि
श्री.मंगल प्रभात लोढा (ब- ५ (विजयदुर्ग).
***
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...

