Tuesday, 7 June 2022

भवताल

 एका पंजाने उलगडलेल्या रहस्याची गोष्ट !

(भवतालाच्या गोष्टी २६)

त्या गुहेची पाहणी करत असताना म्हाला हाडांचे काही ढीग आणि मातीत काही विसाव्याच्या खुणा सापडल्या. पण त्या कोणत्या प्राण्याच्या आहेत हे ओळखण्यासाठी आणखी काही चिन्हे मिळणे आवश्यक होतेतेवढ्यातविवेकला गुहेच्या का भागात काहीतरी भन्नाट दिसले. तो होताचिखलात उमटलेला एका पंजाआम्ही त्याचा बारकाईने अभ्यास केलात्याचा नेमका आकार (size) लक्षात यावा म्हणून माझा पा शेजारी ठेवून त्याची काही छायाचित्रे घेतलीही पंजाची खूण अगदी अलीकडची होती. पण तिथे पंजाची ही फक्त एकच खूण कशीआम्ही सर्वत्र काळजीपूर्वक शोध घेतलापण इतर कही मिळाले नाही एका पंजावरून त्या प्राण्याचे रहस्य उलगडले... ते कसे? आणि तो प्राणी कोणता? याची ही भन्नाट गोष्ट.

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/One-Paw-Mystery

 

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी खास भवतालाच्या गोष्टी या सदरातील ही २६ वी गोष्ट)

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी -  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)


--


भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com


 












दरोडा घाला च

 *सुशिक्षित दरोडा*😊😃😁


हॉंगकॉंगमध्ये एका बँकेवर दारोडा पडला.


‘सगळ्यांनी मुकाट्याने जमिनीवर आडवे पडून रहा. 


लक्षात ठेवा पैसा सरकारचा आहे पण जीव तुमचा आहे.’ 


दरोडेखारांनी ओरडून सांगताच

सर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.


*याला म्हणतात ‘माईंड चेन्जिंग कन्सेप्ट’* 

( *Mind Changing Concept* ) म्हणजेच माणसांच्या

सर्वसाधारण विचारांमधे बदल घडवण्याची

किमया.


त्यातील एक महिला कर्मचारी 'अश्लील’ पद्धतीने आडवी

पडली होती. एक दरोडेखोर तिला ओरडून

म्हणाला, 


‘मॅडम! जरा सभ्यपणे वागा. हा

दरोडा आहे, बलात्कार नाही.’


*याला म्हणतात व्यावसायिक रहाणे* 

( *Being professional* ). आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.


दरोडा टाकल्यावर दरोडेखोर लूट घेऊन घरी आले. 

त्यातला ज्युनिअर दरोडेखोर, *जो एम.बी.ए. होता*  

 तो 6 वी पर्यंत शिकलेल्या

सिनियर दरोडेखोराला म्हणाला., ‘चला

आता आपण पैसे मोजायला लागूया!’ त्यावर

सिनिअर दरोडेखोर म्हणाला, ‘वेडा आहेस की

काय? हे पैसे मोजायला कित्येक तास लागतील. 

जरा धीर धर. रात्री टी. व्ही.

वरच्या बातम्या बघ. तुला आपोआपच कळेल की

आपण किती लाखांचा दरोडा घातला आहे ते.’


*याला अनुभव म्हणजेच*

*‘एक्सपिरिअन्स’*

   ( *Experience* ) असे म्हणतात.


हल्ली कागदी पदव्यांपेक्षा अनुभव जास्त

महत्वाचा झाला आहे.


दरोडेखोर बँकेतून निघून गेल्यावर बँक मॅनेजर

सुपरवायझरला म्हणाला, ‘ताबडतोब

पोलिसांना फोन कर!’ 


सुपरवायझर म्हणाला ,

‘थोडे थांबा साहेब! *आपण आधीच बँकेच्या 70 लाख* *डॉलर्सवर डल्ला मारला आहे. त्यात अजून 10 लाख डॉलर्सची भर घालूया व मग पोलिसांना बोलवूया!’*


*याला म्हणतात ‘लाटेबरोबर पोहणे’*

( *Swim with the tide* ). म्हणजेच संकटाचे रुपांतर संधीत करून

स्वतःचा स्वार्थ साधून घेणे.


सुपरवायझर म्हणाला, ‘जर दर महिन्यात असा

दरोडा पडला तर काय मजा येईल!’


*याला म्हणतात ‘प्रॉयॉरिटी बदलणे’* 

( *Changing priority*). 


कारण ‘पर्सनल

हॅपिनेस’ हा तुमच्या ‘जॉब’ पेक्षा जास्त महत्वाचा असतो.


दुस-या दिवशी टी. व्ही. वर बातमी झळकली

की *बँकेवर 100 लाख डॉलर्सचा दरोडा पडला*.


पण ही बातमी ऐकून दरोडेखोर मात्र हैराण झाले. 


कारण त्यांनी आणलेली कॅश परत परत मोजली. पण ती फक्त 20 लाख डॉलर्सच निघाली. 

*मग 80 लाख डॉलर्स कुठे गेले?* 


*खरी मेख काय आहे ते सिनियर दरोडेखोराच्या बरोबर लक्षात आहे.*


 तो वैतागून म्हणाला, ‘आपण

जीवावर उदार होऊन दरोडा टाकला पण.

आपल्याला फक्त 20 लाख डॉलर्सच मिळाले. 


पण

त्या बँक मॅनेजरने मात्र काहीही न करता 80

लाख डॉलर्स लाटले. 


*खरे आहे माणसाने शिकले पाहिजे.नुसतेच दरोडेखोर न* *होता ‘सुशिक्षित दरोडेखोर’ व्हायला पाहिजे,’*


*याला म्हणतात ‘ज्ञान’ म्हणजेच* *‘नॉलेज’* 

( *Knowledge*) ज्याची किंमत

सोन्यापेक्षाही जास्त असते. 


तुमचे सोने नाणे

लोक पळवून नेऊ शकतात पण तुमचे ‘नॉलेज’ कुणीच

पळवून नेऊ शकत नाही.     

🔴 *Point to be Noted*   

             🙏🙏

 मुळ रचना ज्याने केली त्याला 100000 सलाम.

👍👍🙏🙏


घरटे उडते वादळात  

बिळा-वारूळात पाणी शिरते 

कोणती मुंगी? कोणतं पाखरू?

म्हणून आत्महत्या करते?

🐜🕊


प्रतिकूल परिस्थितीतही 

वाघ लाचारीने जगत नाही 

शिकार मिळाली नाही म्हणून 

कधीच अनुदान मागत नाही.

🐅


घरकुलासाठी मुंगी

करत नाही अर्ज 

स्वतःच उभारते वारूळ 

कोण देतो गृहकर्ज?

🎭


हात नाहीत सुगरणीला 

फक्त चोच घेऊन जगते 

स्वतःच विणते घरटे छान 

कोणतं पॅकेज मागते?

🕴


कुणीही नाही पाठी 

तरी तक्रार नाही ओठी 

निवेदन घेऊन चिमणी 

फिरते का कोणत्या योजनेसाठी?


घरधन्याच्या संरक्षणाला 

धावून येतो कुत्रा 

लाईफ इन्शुरन्स काढला का? 

असं विचारत नाही मित्रा!

🐕


राब राब राबून बैल 

कमावून धन देतात 

सांगा बरं कुणाकडून 

ते निवृत्तीवेतन घेतात?

🐂


कष्टकऱ्याची जात आपली 

आपणही हे शिकलं पाहिजे 

पिंपळाच्या रोपासारखं 

पाषाणावर टिकलं पाहिजे

🤕


कोण करतो सांगा त्यांना 

पुरस्काराने सन्मानित 

तरीही मोर फुलवतो पिसारा 

अन् कोकिळ गाते मंजुळ गीत

🐧


मधमाशीची दृष्टी ठेव 

फुलांची काही कमी नाही 

मधाच्या पोळ्यासाठी मित्रा 

कोणतीच रोजगार हमी नाही

🐝


घाबरू नको कर्जाला 

भय, चिंता फासावर टांग 

जीव एवढा स्वस्त नाही 

सावकाराला ठणकावूण सांग

😎


काळ्या आईचा लेक कधी 

संकटापुढे झुकला का? 

कितीही तापला सूर्य तरी 

समुद्र कधी सुकला का?

🌊💦


निर्धाराच्या वाटेवर 

टाक निर्भीडपणे पाय 

तू फक्त विश्वास ठेव 

पुन्हा सुगी देईल धरणी माय

🎑


निर्धाराने जिंकू आपण 

पुन्हा यशाचा गड 

आयुष्याची लढाई 

फक्त हिमतीने लढ...

फक्त हिमतीने लढ...!!

👊


आवडली तर इतरांनाही Share करा.

          🌹🙏🙏🙏🌹❣️👍


 

 Don't feel alone there is always someone who silently cares for you.

Good Morning.

 मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान !

मृद व जलसंधारण विभागामार्फत राज्यातील जलसंवर्धन प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीची मोहीम हाती घेण्याच्या उद्देशाने “ मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम ” ही योजना आखण्यात आली. ही योजना नेमकी काय आहे याबाबतचा विशेष लेख ....

उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकास आणि तिचे उपयुक्ततापूर्ण व फायदेशीर व्यवस्थापन म्हणजे जलसंधारण होय. पृथ्वीच्या पृष्ठाचा 71 टक्क्यांपेक्षा अधिक भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांमुळे प्राणिजीवन, वनस्पतीजीवन, मानवीजीवन आणि आधुनिक संस्कृती यात पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. उपलब्ध पाण्याचे प्रमाण अचल असल्यामुळे वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे दरडोईप्रमाण सारखे घटत आहे. पाण्याचा पुरवठा अपुरा वाटत असल्यामुळे जगात शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार पाण्याच्या व्यवस्थापनाची म्हणजे जलसंधारणाची आवश्यकता निर्माण झाली आहे. पाऊस व हिम या रूपाने पृथ्वीवर पाणी उपलब्ध झाल्यापासून त्याच्या प्रवाह आणि साठ्यावर नियंत्रण ठेवून त्यापासूनचा धोका कमी करणे व त्या पाण्याचे नियमन करून ते योग्य प्रमाणात आवश्यक तेथे आणि आवश्यक त्या वेळी उपलब्ध करणे हे जलसंधारणाचे मुख्य कार्य असते.जलसंधारणाच्या योजना आखण्यात व त्या पार पाडण्यात स्थापत्य अभियांत्रिकी व कृषी चा विशेष आणि मुख्य भाग असला, तरी इतर अनेक शास्त्रांतील तज्ञांचीही मदत आवश्यक असते.

राज्‍यातील ग्रामीण भागातील हरित ग्रामीण महाराष्‍ट्राची उभारणी करण्याबरोबरच जलसंधारणाची कामे गतीने करण्यावर भर देण्यात येत आहे. हे करीत असताना सामाजिक वनीकरणास प्रोत्‍साहन देणे. मर्यादित साधनसंपत्‍तीच्‍या प्रभावी शास्‍त्रीय व्‍यवस्‍थापनासाठी पाणलोट निहाय मृद व जलसंधारणांच्‍या प्रथांना प्रोत्‍साहन/ चालना देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण कार्यक्रमांमध्ये लोकसहभागास प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम येणाऱ्या काळात आखण्यात येणार आहेत.

गेल्या दोन वर्षात राज्यात जलसंधारणाची अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, नवीन जलसंधारण योजना, जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती इत्यादी कामांना प्राधान्य दिले जात आहे. राज्यातील जलसंचय वाढीबरोबरच जमीनीची धूप थांबविण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेच्या सुमारे 1 लाख प्रकल्पांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. परंतु किरकोळ दुरुस्ती अभावी अनेक प्रकल्पांची साठवण व सिंचन क्षमता कमी झालेली असल्याने या प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीची मोहीम हाती घेण्याच्या उद्देशाने “ मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम ” ही योजना आखण्यात आली. यामध्ये जलसंधारण, जलसंपदा, कृषी, पाणीपुरवठा विभाग व सर्व जिल्हा परिषदा यांच्याकडील प्रकल्पांची विशेष दुरुस्ती जलसंधारण विभागामार्फत करण्याचे निश्चित करण्यात आले.

प्रथम टप्यात 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेच्या 8000 योजनांच्या दुरुस्तीसाठी रु.1400 कोटींच्या आराखड्याला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे सुमारे 8 लक्ष टीएमसी पाणी साठवण क्षमता व 17 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता पुनर्स्थापित होणार आहे. सिंचनातून समृद्धी वाढविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक तलावांची डागडुजी, दुरुस्ती करुन साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्यात येणार आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले तर पाणीसाठ्यात वाढ होते. या अडवलेल्या आणि साठवलेल्या पावसाच्या पाण्याच्या माध्यमातून सिंचन क्षेत्र वाढतानाच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागतो आणि त्यामुळेच भविष्यकालीन उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे.मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेसाठी सन 2021-22 या वर्षासाठी रु.720 कोटी तर 2022-23 या वर्षासाठी रु.700 कोटींची तरतुद केलेली आहे. दि. 31 मार्च 2022 पर्यंत जलसंधारण विभाग व जिल्हा परिषदा यांच्याकडील 4073 प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून याची किंमत रु.1040 कोटी आहे. यातील जास्तीत जास्त प्रकल्पांची दुरुस्ती मान्सुनपूर्वी करण्याचे नियोजन आहे.  

            प्रत्येक ठिकाणची भौगोलिक स्थिती, जमिनी, सिंचन स्रोत समान नसतात. त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार मृद व जल संधारणाचे उपाय अवलंबणे गरजेचे आहे. मृद्‌ व जलसंधारण कामांच्या निर्मितीमध्ये तसेच देखभाल दुरुस्तीमध्ये लोकसहभाग फार महत्त्वाचा असतो. सध्या भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र त्याप्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाहीपरिणामी, भूजलपातळी खोल जात आहे. पडलेल्या पावसाच्या पाण्याचे संधारण करणे अतिशय महत्त्वाचे असते. मृदसंधारणासाठी डोंगर उतारावर व पडीक जमिनीवर सलग समतल चर, बांधबंदिस्ती, नालापात्रात माती आणि सिमेंटचे बांध तसेच खोदतळे यासारखे कामे करणे गरजेचे आहे. यामुळे विहिरीतील पाणीपातळीत वाढ होऊन सिंचनक्षेत्रात वाढ होते. परिणामी, पिकांच्या उत्पादकतेतही वाढ होते. जलसंधारणासाठी करण्यात येणाऱ्या उपायांमध्ये समपातळीवरील बांध, समपातळीरेषेवरील चर, घळ नियंत्रण बांधकाम, नाला बांध, गॅबियन, सिमेंट बंधारे, नाला सरळीकरण, शेततळ्याचा समावेश होतो. शास्त्रीय पद्धतीने या उपाययोजना करण्यावर राज्य शासनामार्फत भर देण्यात येत आहे.

जलसंधारणाच्या दृष्टीने नालाबांध अत्यंत महत्त्वाचा असतो. नाल्यातून वाहून येणारे पाणी पावसाळयानंतर नाल्यात साठून राहते, हे पाणी जमिनीत मुरल्यामुळे बांधाच्या आसपासच्या भागातील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होते. त्यामुळे पाणी साठवण क्षमता कायम राहण्यास मदत होते. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा अधिक होऊ शकेल आणि वाहणाऱ्या पाण्याचे कमी रुंदीचे पात्र लक्षात घेऊन असे बंधारे लोकसहभागातून बांधण्यावर भर देण्यात येणार

जलसंधारण योजनांचे पुनरुज्जीवन करण्यावर 

-- मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडा

      राज्यातील अनेक जलसंधारण योजनांचे पुनरुज्जीवन केल्याने विकेंद्रित जलसाठे निर्माण होण्यास मदत होणार आहे. भूजल पातळीत वाढ होण्याबरोबरच संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेमधून जलसंधारण, जलसंपदा, कृषी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि जिल्हा परिषदांकडील 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमतेच्या सुमारे 16 हजार जलसंधारण प्रकल्पांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यात 0 ते 600 हेक्टर सिंचन क्षमता असणारे 97 हजारांहून अधिक प्रकल्प बांधण्यात आले आहेत. यामध्ये सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे, गावतळे, पाझर तलाव, साठवण तलाव, लघुसिंचन योजना कामांचे, बांधकामानंतर किरकोळ दुरुस्तीअभावी अनेक प्रकल्पांची साठवण क्षमता व सिंचन क्षमता कमी झाली असल्याचे दिसून आल्याने ही योजना महत्त्वाची ठरणार आ

पावसाच्या पाण्याच्या माऱ्याने, पाण्याच्या वेगवान प्रवाहाने तसेच वाऱ्याच्या झोताने जमिनीतील क्रियाशील सूक्ष्म कण, तसेच माती अनेकदा वाहून नेली जाते. या शेतजमिनीच्या धुप होण्याने मातीची घट थांबविणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ढाळीचे बांध करुन पावसाचे पाणी अडवले जाऊन जमिनीतील वाहून जाणारे मातीचे कण, तसेच ओलावा जमिनीतच साठवण्याचे काम करण्यास प्राधान्य असणार आहे. पाणलोट क्षेत्रातील डोंगराच्या उताराहून खालील भागात वेगात वाहत येणारे पाणी समपातळी चरामध्ये अडवल्याने पाण्याचा वेग कमी होतो. तसेच पाण्याबरोबर वाहत आलेली माती चरामध्ये साठून राहिल्यामुळे झाडांची वाढ चांगली होते. समपातळी चरामध्ये साठलेली माती ही दर तीन वर्षांनी काढून टाकून चर पुन्हा पूर्वीप्रमाणे होतील याप्रमाणे व्यवस्थापन ठेवण्यासाठी विविध उपाययोजना विभागामार्फत करण्यात येणार आहेत 

माहिती व जनसंपर्क महासंनचलनलय

Featured post

Lakshvedhi