Friday, 13 May 2022


 


 

 किमान आधारभूत किमतीनुसार हरभरा खरेदीसाठी

शेतकऱ्यांनी १७ मे पर्यंत नोंदणी करावी

- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

            मुंबई, दि ११ : किमान आधारभुत किमतीने हरभरा खरेदीसाठी आतापर्यंत ४ लाख 94 हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. मार्चपासून आजतागायत 50.84 लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असून, उद्दीष्टपूर्तीसाठी १७ मे पर्यंत नोंदणीची तारीख अंतिम करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

            आज मंत्रालयात हंगाम २०२१-२२ मधील हरभरा (चणा) खरेदी, साठवणूक नियोजन व शेतकरी चुकारे संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आतापर्यंत चना खरेदी संदर्भातील आढावा घेतला व शेतकऱ्यांसाठी नोंदणीची तारीख वाढवावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिपक तावरे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, पणनचे सहसंचालक विनायक कोकरे , द विदर्भ सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक हरी बाबू, यांच्यासह पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सौ.भाग्यश्री टिळेकर, विदर्भ ॲग्रीकल्चरल अलाईड प्रोड्युसर कंपनी(वॅपको) नागपूरच नाफेडचे श्री.पुनीतसिंग, भारतीय अन्न महामंडळ अंशुमन चक्रवर्ती व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            सहकार व पणन मंत्री श्री. पाटील म्हणाले, चालू वर्षी राज्यात हरभऱ्याचे उत्पादन चांगले झाले आहे. तथापि बाजारभाव मात्र हमीभावापेक्षा कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ देण्यासाठी आणि राज्याला दिलेले हरभरा (चना) खरेदीचे उद्दिष्ट ६.८९ लाख मे टन पूर्ण करण्यासाठी सर्व राज्य नाफेड संस्थानी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे खरेदी केलेल्या मालाचे नुकसान होऊ नये, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात. खरेदी केलेले शेतमाल गोदामात लवकर जमा करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. हरभरा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यात यावेत. यासाठी व्यवस्थापकीय संचालक, पणन महासंघ मुंबई यांनी नाफेड व भारतीय अन्न महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, शेतकरी चुकाऱ्यांबरोबर हमालीचे पैसे अनुषंगिक खर्च व बारदाण्याचे पैसेही नाफेडने लवकर अदा करावे, अशी सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.

            राज्यातील चना खरेदी वाढवावी त्याचबरोबर गोडाऊनचा उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित मंडळांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

            हरभरा ५२३० प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येत असून, दिनांक १ मार्च पासून ७३० खरेदी केंद्रांवर हरभरा (चना) खरेदी सुरू करण्यात आला आहे. आजतागायत ४ लाख ९४ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ५०.८४ लाख क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. २ लाख ८० हजार २८४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. खरेदीची एकूण किंमत २६५८.९३ कोटी असून, १९५८.४० कोटी निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.

0000


संदेश

 *🌻धम्म संदेश ज्ञ🌻*

"न हि वेरेन वेरानि, 

सम्मन्तीध कुदाचनं ।

अवेरेन च सम्मन्ति, 

एस धम्मो सनन्तनो ।"

         - तथागत बुद्ध 

*इस संसार में वैर से वैर कभी शान्त नहीं होता, मैत्री से ही (वैर) शान्त होता है। यही संसार का सनातन नियम है।*

मन को मंगल कामनाओं से भर देने को भगवान बुद्ध *'मैत्री भावना'* कहते हैं । 

भिक्षुओं को सम्बोधित करते हुए तथागत बुद्ध ने कहा- 

भिक्षुओ ! मैत्री रखने में ग्यारह लाभ है? 

कौन-से ११ लाभ है?

*🍀मंगल मैत्री के 11 लाभ🍀*  

मैत्री भावना करनेवाला : 

*🍀1. सुख की नींद सोता है।*

*🍀2. तरोताज़ा जागता है।*

*🍀3. दुःस्वप्न नहीं देखता है।*

*🍀4. मनुष्यों में प्रिय होता है।*

*🍀5. अमनुष्यों में प्रिय होता है।*

*🍀6. देवता उसकी रक्षा करते है।*

*🍀7. अग्नि, विष, शस्त्र उसे मार नहीं सकते। ( यानी कोई शत्रु नहीं होने के कारण कोई उसे अग्नि, विष, शस्त्रसे  नही मारते है।)*

*🍀8. सहज समाधिस्थ हो सकता है।*

*🍀9. मुख का वर्ण निखरता है। मुखाकृति शांत होती है।*

*🍀10. बेहोशी में नहीं मरता है।*

*🍀11. मरने के बाद अच्छी गति होती है ।*

🙏🏻🙏🏻🙏🏻

 सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठीजलसंपदा विभागाने सुधारित प्रस्ताव सादर करावा

- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे.

            मुंबई, दि. 12 : रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी सीआरझेडची परवानगी आवश्यक आहे. यासाठी बाणकोट खाडी परिसरातील नौकानयन सुलभ होण्याच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

            सावित्री नदीच्या मान्सूनपूर्व तयारीचा श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा घेण्यात आला. यावेळी पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, स्थानिक आमदार भरत गोगावले, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री. गौतम, पूर नियंत्रण समिती रायगड चे सदस्य आदी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.  

            महाड जवळ बाणकोट खाडीत नौकानयन सुलभ होण्यासाठी मेरीटाईम बोर्ड आणि राजेवाडी ते केंबुर्ली या भागात सावित्री नदीतील गाळ आणि बेटे काढण्यासाठी जलसंपदा विभागाने स्वतंत्र प्रस्ताव सादर केले होते. यातील मेरीटाईम बोर्डाच्या प्रस्तावास महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीमार्फत मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने सीआरझेड मधील तरतुदींनुसार मेरीटाईम बोर्ड मार्फत सुधारित प्रस्ताव सादर केल्यास त्यास मान्यता देता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

00000


 



 कोस्टल रोडचे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी

- मंत्री आदित्य ठाकरे.

            मुंबई दि. 12 :- मुंबईत पश्चिम किनारपट्टीवर विविध टप्प्यांमध्ये कोस्टल रोडचे काम सुरू आहे. हे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

            कोस्टल रोडच्या सुरू असलेल्या कामाचा मंत्री श्री. ठाकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सह पोलिस आयुक्त (वाहतूक) श्री. राजवर्धन यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

            श्री. ठाकरे यांनी मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. संबंधित सर्व यंत्रणांनी एकमेकांच्या सहकार्याने ही कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

 शेतकऱ्यांचा होणार गौरव!15 व्या आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनानिमित्त

 महाराष्ट्र पर्यटन संचालनालय व एटीडीसी चा खास उपक्रम.

            मुंबई, दि. 12 :- आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन व कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या (ATDC) संयुक्त विद्यमाने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे सोमवार, 16 मे रोजी सकाळी 10 कृषी पर्यटन विकासाशी संबंधित विविध कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. कार्यक्रमात एका विशेष पुरस्कार सोहळ्याचे देखील आयोजन केलेले आहे. राज्यातील नाविन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना व कल्पनांना या कार्यक्रमात पुरस्कृत केले जाईल.

            कृषी पर्यटन विकास हे करिअरचे अनोखे क्षेत्र ठरू शकते, म्हणूनच या क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती इच्छुकांपर्यंत पोहचवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य आहे. विविध क्षेत्रातील मार्गदर्शक, या कार्यक्रमात पर्यावरणपुरक उपक्रम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कृषी पर्यटनाची भूमिका अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या नव्याने व वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात अनेक नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत, ज्यांची माहिती करून घेण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन विभाग व कृषि पर्यटन विकास महामंडळाने केलेले आहे.

             पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. अदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंग, एमटीडीसी व्यवस्थापकीय संचालक श्रीमती जयश्री भोज, पर्यटन संचालनालयाचे संचालक श्री. मिलिंद बोरीकर आणि सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर तसेच कृषी पर्यटन विकास महामंडळ (एटीडीसी) चे सदस्य श्री पांडुरंग तावरे यांच्यासह सर्व विभागातील शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

            कृषी पर्यटन क्षेत्रातील धोरणामुळे शहरी पर्यटकांना शेतीची प्रत्यक्ष भेटीतून माहिती, शेतकरी जीवनाचे दर्शन, ग्रामीण संस्कृतीशी ओळख असा अनुभवांचा ठेवा मिळतो. शेतीची कामे कशी चालतात त्याचा स्वतः अनुभव घेऊन निसर्गाशी मैत्री करण्याची संधी मिळते आणि निरामय आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते.

            या उपक्रमाविषयी माहिती देताना विभागाच्या पर्यटन प्रधान सचिव, श्रीमती वल्सा नायर सिंग म्हणाल्या की, “2020 मध्ये धोरणाची अंमलबजावणी झाल्यापासून, गेल्या दोन वर्षांत केवळ ऑनलाइन कृषी पर्यटन परिषद झाली होती, यंदा परिस्थिती सुधारल्याने आणि उद्योगधंद्यांना संजीवनी मिळाल्याने, आम्ही प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजित करत आहोत जिथे अनेक कृषी पर्यटन केंद्र संचालकांना कृषी पर्यटन विकासासाठीच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल.” 

            महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांनी कृषी-पर्यटन ही एक उदयोन्मुख आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी संकल्पना असल्याचे म्हटले. “कृषी पर्यटनामुळे नवीन अर्थार्जनाच्या संधी निर्माण होतील व गावांचा शाश्वत विकास होईल. आमचे 6 प्रादेशिक उपसंचालक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून संबंधित विभागात कृषी पर्यटन क्षेत्राची व्याप्ती आणि संधी समजावून सांगतील," अशी माहिती संचालकांनी दिली.

            राज्य कृषि व ग्रामीण पर्यटन समितीचे सदस्य पांडुरंग तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ३५४ कृषी पर्यटन केंद्रे कार्यरत आहेत. हे धोरण राबवल्यापासून शेतकऱ्यांच्या रोजगारात 25 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. या कृषी पर्यटन केंद्रांवर 2018, 2019 आणि 2020 साली अनुक्रमे 4.7 लक्ष, 5.3 लक्ष आणि 7.9 लक्ष पर्यटक भेट देऊन गेले. या पर्यटक भेटींमधून शेतकऱ्यांना 55.79 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. इतकेच नाही तर कृषी पर्यटनातून विशेषतः ग्रामीण भागातील 1 लाख महिला आणि तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. पुणे, रायगड, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये असे अनुभवायला आले की कृषी पर्यटन केंद्रांमुळे केवळ शेतकऱ्यांचे जीवन बदलेले नाही. तर संपूर्ण गावाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला हातभार लागला आहे.


Featured post

Lakshvedhi