सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 6 May 2022
Thursday, 5 May 2022
कोंढाणे प्रकल्पाच्या कामास सिडकोने गती द्यावी
- जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मुंबई दि ५ :कोंढाणे धरण प्रकल्पाच्या कामास शहर व औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) गती द्यावी. नजीकच्या गावातील पिण्याच्या पाण्याची पूर्तता करावी. तसेच २४० हेक्टर सिंचनासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिल्या.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण प्रकल्पाबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी श्री.पाटील यांनी वरील सूचना दिल्या. या बैठकीस खासदार सुनिल तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, सुरेश लाड, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, सिडकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आदिसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, नजीकच्या गावांना पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. कोंढाणे धरण प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांना १० दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा तसेच, भूभागाचे सर्वेक्षण करताना स्थानिक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. २४० हेक्टर सिंचनासाठी लागणारे पाणी उपलब्ध होईल यादृष्टीने प्रकल्पाचे काम सिडकोने करावे, असे सांगितले.
या प्रकल्पाअंतर्गत ज्यांना भू भाडे द्यावयाचे आहेत,अशांना मोबदला देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती खासदार सुनील तटकरे यांनी या बैठकीत केली.
००००
Bhavtal
कोकणातल्या झिपरीचं नेमकं काय झालं?
- बदलत्या हवामानात टिकणाऱ्या ज्वारीची गोष्ट
(भवतालाच्या गोष्टी ०५)
“पयले कुडाची घर होती अन् कुड बांधायला झिपरीचं साठं(धाटे) उपेग केलं जायचं. ते दोन - तीन वरीस टिकायचं, आत्ता घरकुल योजना आल्यापासनं सगळी सिमेंटची घर बांधत्यात, तै झिपरीच्या साठचां काय उपेग?”... रामचंद्र गावित हा पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील माझा सहकारी. त्यानं केलेला हा सवाल.
विकासाच्या नादात आपण काय - काय हरवत चाललो आहोत, हे पाहिलं की अस्वस्थ व्हायला होतं. पिकांच्या वाणांचा तर गावोगावचा ठेवा नष्ट होत असतो. अशाच मागं पडत चाललेल्या कोकणच्या पालघर-जव्हार भागातील ‘झिपरी’ ज्वारीची ही गोष्ट!
भवताल वेबसाईटवरील ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील पाचवी गोष्ट.
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक:
https://bhavatal.com/Zipri-Jwari
भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय: bhavatal.com
(इतरांसोबतही शेअर करा)
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी अभ्यासगट.
मुंबई, दि. 5 : अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे आदर्शगाव योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे.
आदर्शगाव योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये 120 प्रशिक्षणार्थीकरिता निवासासह प्रशिक्षणार्थी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
या प्रशिक्षण केंद्रात आदर्शगाव योजनेतील प्रशिक्षणाबरोबरच इतरही प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे. प्रशिक्षण केंद्र संचलित करण्यासाठी आस्थापना निर्माण करणे, निधीचा स्त्रोत निश्चित करणे, देखभालीचे धोरण ठरविणे, अल्प व दीर्घकालीन प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित करणे तसेच प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी अभ्यासगट नियुक्त करण्यात आला आहे. या अभ्यासगटामध्ये आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष हे अध्यक्ष असतील. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक, सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे संचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव/उपसचिव तसेच अवरसचिव या अभ्यासगटात सदस्य असतील. याशिवाय वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे माजी सह मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे संचालक, प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कन्सल्टंटस संचालक, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यशदाचे प्राध्यापक आनंद पुसावळे, कृषी मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रफिक नाईकवाडी, सेवानिवृत्त कृषि आयुक्त उमाकांत दांगट, कोल्हापूरचे प्रगतशील शेतकरी प्रतापराव चिपळूणकर, बीड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे देखील या समितीचे सदस्य असतील. याशिवाय, आदर्शगाव योजना-प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणेचे 1 प्रतिनिधी, 1 पंचायत राज प्रतिनिधी,1 सरपंच हे या समितीमध्ये निमंत्रित सदस्य असतील तसेच मृद संधारण व पाक्षेव्यचे संचालक हे या अभ्यासगटाचे सदस्य सचिव असतील.
००००
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा शनिवारी जनता दरबार
मुंबई, दि. 5 : मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत शनिवार दि. 7 मे रोजी जनता दरबारचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय (ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई) येथे 7 मे रोजी सकाळी 11.30 वा. आयोजित या जनता दरबारमध्ये उपस्थित राहून जनतेने शासनाच्या विविध विभागांशी संबंधित समस्या, अडचणी मांडण्याचे आवाहन पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे.
००००
‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. विजय चोरमारे यांची मुलाखत
राजर्षि शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष
मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. विजय चोरमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. 6 मे व शनिवार 7 मे, सोमवार 9 मे व मंगळवार 10 मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक बांधणीत राजर्षि शाहू महाराज यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती कार्यरत आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त राजर्षि शाहू महाराजांचे लोकोत्तर कार्य, त्यांचा दूरदृष्टीपणा, समाजातील तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि एकूणच महाराष्ट्राच्या जडण-घडणीतील त्यांचं योगदान याविषयी सविस्तर माहिती डॉ. विजय चोरमारे दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
००००
अन्य मराठी साहित्य संमेलन आयोजनासाठी अनुदान
साहित्य संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन.
मुंबई, दि. 5 : राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी संस्था नोंदणी अधिनियम १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या साहित्य संस्थांना सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सहायक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून दि. ०६ मे, २०२२ ते ०६ जून, २०२२ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.
साहित्य संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या व राज्यात अन्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणाऱ्या साहित्य संस्था अनुदानासाठी अर्ज करू शकतील. साहित्यबाह्य क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विज्ञान, क्रीडा, कृषि, आरोग्य, पर्यावरण व अध्यात्मिक. यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या बहुउद्देशीय संस्थांना अनुदानासाठी अर्ज करता येणार नाही.
विहित नमुन्यातील अर्ज व नियमावली www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर "नवीन संदेश या सदरात 'अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदान या शीर्षाखाली 'what's new' या सदरात ‘Grant in Aid for Annya Marathi Sahitya Sammelane' या शीर्षाखाली, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या www.sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर 'नवीनतम संदेश' या सदरात 'अन्य मराठी साहित्य संमेलनासाठी अनुदान' शीर्षाखाली उपलब्ध होतील, तसेच सदर अर्ज महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दूसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५२२२४३२ ५९३१) येथे विहित कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतील.
अनुदानासाठीचे अर्ज विहित नमुन्यात व विहित कालावधीत (दि.०६ मे, २०२२ ते ०६ जून, २०२२) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे सादर करणे बंधनकारक राहील. विहित कालमर्यादेनंतर (दिनांक (२०२२ ते ०६ जून २०२२) येणाऱ्या अर्जांचा अनुदानासाठी विचार केला जाणार नाही, असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्रपाठक रामेश्वर रोकडे यांनी कळविले आहे.
**
यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्रकार्यान्वित करण्यासाठी अभ्यासगट
मुंबई, दि. 5 : अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे आदर्शगाव योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत अभ्यासगट गठीत करण्यात आला आहे.
आदर्शगाव योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये 120 प्रशिक्षणार्थीकरिता निवासासह प्रशिक्षणार्थी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
या प्रशिक्षण केंद्रात आदर्शगाव योजनेतील प्रशिक्षणाबरोबरच इतरही प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे. प्रशिक्षण केंद्र संचलित करण्यासाठी आस्थापना निर्माण करणे, निधीचा स्त्रोत निश्चित करणे, देखभालीचे धोरण ठरविणे, अल्प व दीर्घकालीन प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित करणे तसेच प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी अभ्यासगट नियुक्त करण्यात आला आहे. या अभ्यासगटामध्ये आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष हे अध्यक्ष असतील. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक, सामाजिक वनीकरणचे वनसंरक्षक, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे संचालक, मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव/उपसचिव तसेच अवरसचिव या अभ्यासगटात सदस्य असतील. याशिवाय वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे माजी सह मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे संचालक, प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कन्सल्टंटस संचालक, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यशदाचे प्राध्यापक आनंद पुसावळे, कृषी मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रफिक नाईकवाडी, सेवानिवृत्त कृषि आयुक्त उमाकांत दांगट, कोल्हापूरचे प्रगतशील शेतकरी प्रतापराव चिपळूणकर, बीड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे देखील या समितीचे सदस्य असतील. याशिवाय, आदर्शगाव योजना-प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणेचे 1 प्रतिनिधी, 1 पंचायत राज प्रतिनिधी,1 सरपंच हे या समितीमध्ये निमंत्रित सदस्य असतील तसेच मृद संधारण व पाक्षेव्यचे संचालक हे या अभ्यासगटाचे सदस्य सचिव असतील.
००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...


