Tuesday, 3 May 2022

 सिनेमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगासमोर आणावी




                                                            -राज्यपाल 

        मुंबई, दि. 3 :- युद्ध व शस्त्रास्त्रे ही देशाची सच्ची शक्ती नसून संस्कृती हीच भारताची सौम्य संपदा आहे. संस्कृतीला आधारभूत मानून सर्जनशीलतेला चालना दिल्यास आपण अजरामर कृती तयार करू शकू असे सांगताना सिनेमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगासमोर आणावी प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. 'भारतीय सिनेमा व सौम्य संपदा' या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे उदघाटन राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवन येथे केले, त्यावेळी ते बोलत होते.  

            भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद व फ्लेम युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या या चर्चासत्राला ज्येष्ठ चित्रपट निर्माते तसेच फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शेखर कपूर, माजी खासदार रूपा गांगुली, आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, फ्लेम युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. दिशान कामदार, प्रसिद्ध निवेदक हरीश भिमानी व संयोजक विनोद पवार प्रामुख्याने उपस्थित होते.   

            भारतीय सिनेमाच्या सौम्य संपदेमुळेच अनेक देशातील लोकांना भारतीय भाषा समजत असल्याचे सांगताना भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानामुळेच रामायण व महाभारत यांवर आधारित धारावाहिक सर्वाधिक चालल्या, असे राज्यपालांनी सांगितले. स्वामी विवेकानंद यांचे शिकागो येथील भाषण तसेच आज जगभर मान्यता पावलेला भारतीय योग देशाच्या सांस्कतिक संपदेचे द्योतक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह यांचे जीवनकार्य प्रेरणादायी असून ते चित्रपटांच्या माध्यमातून जगापुढे यावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

            भारतीय कथानक जगभर पोहोचविण्यासाठी युवकांना तंत्र सक्षम करावे : शेखर कपूर

        आज अमेरिकेतील 90 टक्के युवक सिनेमा किंवा इतर आभासी व्यासपीठांवरील निर्मिती पाहत नसून ते गेमिंग तसेच युट्युबवर निर्मित खासगी कथानक पाहत असल्याचे नमूद करून जगातील मोठा युवा देश असलेल्या भारताकरीता सध्याचा काळ ही आपले कथानक जगभर पोहोचविण्याची सुवर्ण संधी आहे, असे शेखर कपूर यांनी यावेळी सांगितले. युवकांमधील सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान सक्षम करणे आवश्यक असल्याचे शेखर कपूर यांनी यावेळी सांगितले. भारताकडे जगाला सांगण्यासाठी फार मोठे कथानक असून त्याच्या प्रचार प्रसारासाठी आपण मार्ग शोधले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

            डॉ. विनय सहस्रबुद्धे तसेच डॉ. दिशान कामदार यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.

     चर्चासत्रामध्ये सिनेमातील वसाहतवाद : पाश्चात्यांच्या नजरेतून जागतिक व भारतीय सिनेमा, भारताचा मूलभूत विचार आणि चित्रपटाचे माध्यम, भारतीय सिने संगीतावर जागतिक परिणाम व लता मंगेशकर यांची गाणी या विषयांवर सत्र होणार आहेत. चर्चासत्राचा समारोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.        


 

‘टॉनिक’ नावाच्या औषधाची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ०२)

१८ व्या शतकाच्या अखेरपर्यंत ब्रिटिशांनी जवळजवळ संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्थापित केली होती. शेवटची काही राज्ये उरली होती. त्यात मराठ्यांचे राज्य होते, शिवाय दक्षिणेत श्रीरंगपट्टनचा टिपू सुलतान ब्रिटिशांशी संघर्ष करत होता. मात्र, १७९९ साली ब्रिटिशांनी त्याचा पराभव केला आणि म्हैसूर राज्य ताब्यात घेतले. ब्रिटिश सैन्य या विजयाचा आनंद साजरा करत होते, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण काही आठवड्यांमध्येच अनेक ब्रिटिश सैनिक, अधिकारी मलेरियामुळे आजारी पडू लागले.

तिथून एका औषधाची गोष्ट सुरू झाली. ते ‘कोरोना’वरील मात्रा म्हणून पुन्हा चर्चेत आले. ते भारतात कसे पोहोचले? त्याचीच ही रंजक कथा...

संपूर्ण कथा वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/blog-det/11


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हर्षदा गरुड हिचे अभिनंदन वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक.

        मुंबई, दि.3 :- जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. 

            मावळमधील (जि. पुणे) हर्षदाने ग्रीस- हेराकिलॉन येथील स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेत भारताने यापूर्वी असे सुवर्णपदक जिंकले नव्हते. त्यामुळे हर्षदाने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल, अशी कामगिरी केली आहे. "महाराष्ट्र कन्ये"चा हा पराक्रम आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी हर्षदाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


 

 आमदार अतुल भातखळकर यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने निधन...


उद्या बुधवारी कांदिवली येथे श्रद्धांजली सभा...

          आ. अतुल भातखळकर यांच्या मातोश्री श्रीमती शैलजा भातखळकर यांचे सोमवार, दिनांक 2 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. उद्या बुधवारी सायं 5 ते 7 दरम्यान कनकश्री सभागृहामध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थळ : कनकश्री हॉल, चक्रवर्ती अशोक रोड, अशोक नगर, कांदिवली पूर्व, मुंबई.

वेळ : बुधवार, दिनांक 4 मे 2022 रोजी सायंकाळी 5.00 ते 7.00


 







 

 राज्यातील कौशल्य विकासविषयक विविध योजनांचे जागतिक बँक तसेचकेंद्र शासनाच्या समितीकडून कौतूक


संकल्प प्रकल्पांतर्गत विविध उपक्रमांचा केंद्र शासन,


जागतिक बँक प्रतिनिधीद्वारे आढावा


कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाला प्रतिनिधींची भेट


 


            मुंबई, दि. २ : संकल्प प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत कौशल्य विकास मंत्रालय, भारत सरकार व जागतिक बँकेमार्फत नुकतीच ७ सदस्यांनी राज्याला भेट दिली. राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेऊन समिती सदस्यांनी त्याचे कौतुक केले. विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी समिती सदस्यांचे स्वागत करून त्यांना विविध योजनांची माहिती दिली.

            पथकामध्ये केंद्रशासनामार्फत आर. के. गुप्ता (संचालक-संकल्प), रुशिया ऑलख (सल्लागार), निखील जैन (सल्लागार), ज्योती सिंह (सल्लागार), श्रीमती पुष्पा (सहाय्यक अधिकारी-संकल्प) हे उपस्थित होते. जागतिक बँकेमार्फत प्रद्युमन भट्टाचार्य (शिक्षण विशेषज्ञ), संगीता पटेल (खरेदी विश्लेषक) उपस्थित होते. या प्रतिनिधींनी भेटीदरम्यान कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाला भेट देऊन संकल्प योजनेचा आढावा घेतला. तसेच राज्यात कौशल्य विकास संबधित योजना राबविताना अवलंबविण्यात येणाऱ्या उत्कृष्ट कार्यपद्धती (Best Practices) जाणून घेतल्या. याव्यतिरिक्त कौशल्य विकास कार्यक्रम राबविताना येणाऱ्या अडचणी तसेच भविष्यातील नियोजन या बाबींचाही आढावा घेण्यात आला.

            महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी राज्यात जागतिक बँकेमार्फत अनुदानित व केंद्र पुरस्कृत संकल्प योजनेंतर्गत सद्यस्थितीत यशस्वीरीत्या प्रगतीवर असणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सादरीकरण केले. तसेच विविध योजना व उपक्रमांच्या यशोगाथा दाखवण्यात आल्या. संकल्प प्रकल्पअंतर्गत “उडने दो” या विशेष उपक्रमाद्वारे महिला, दिव्यांगजन, तृतीयपंथी आणि देहविक्री करणाऱ्या व इतर पिडीत महिला यांसारख्या समाजातील उपेक्षित घटकांकरिता आत्मनिर्भर होऊन आयुष्याची सुरुवात नव्या दिशेने करण्याकरिता रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यात येत आहे.

            याचबरोबरच आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील कौविड-१९ साथीशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत Oxygen Plant या क्षेत्रातील १ हजार २०० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेऊन महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील प्रत्येकी ३० उमेदवारांची १ तुकडी तयार करून प्रशिक्षण सुरु केले. महाराष्ट्र हे इलेक्ट्रिक वाहन धोरण आणणारे देशातील पहिले राज्य आहे. त्यादृष्टीकोनातून संकल्प प्रकल्पअंतर्गत Electric Vehicle Charging Station & Entrepreneurship अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्याच्या संकल्पनेची केंद्रीय पथकाकडून प्रशंसा करण्यात आली.

            भेटीच्या दरम्यान MSME अंतर्गत कार्यरत असलेल्या IDEMI, सायन, मुंबई येथील व मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेले पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी हॉस्पिटल, गोवंडी येथील अनुक्रमे Electric Vehicle Charging Station & Entrepreneurship व Oxygen Plant Maintenance या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी समवेत संवाद साधला. प्रशिक्षणार्थी यांनी व्यक्त केलेल्या भावना व त्यांचे दैनंदिन जीवनात या प्रशिक्षणामुळे आलेल्या सकारात्मक बदलाबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.

            राज्यात जिल्हा नियोजन समितीकडून किमान कौशल्य कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात यशस्वीपणे पार पाडण्यात येत आहे. तसेच योजनांचे एकसूत्रीकरण अंतर्गत राज्यात विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य प्रशिक्षण योजनांवर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा एकछत्री अंमल आणण्याबाबत शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांकरिता तयार करण्यात आलेला “जिल्हा कौशल्य विकास आरखडा” विशेष गौरविण्यात आला आहे. सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वाशीम आणि ठाणे या ५ जिल्ह्यांनी “जिल्हा कौशल्य विकास आराखडा” (DSDP) उत्तम आराखडा प्रस्तुत केल्याने DSDP पुरस्कारासाठी या ५ जिल्ह्यांना नामांकन मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

            शांघाय (चीन) येथे होण्याऱ्या जागतिक स्पर्धेकरिता महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी पूर्ण प्रयत्नशील आहे. या सर्व उल्लेखनिय बाबींसाठी देखील महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला.


       

 कृषी विद्यापीठांमधील संशोधन मातीत अवतरले पाहिजे ;

आर्थिक राजधानीसोबत कृषी राजधानी म्हणून महाराष्ट्राची व्हावी नवी ओळख


- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

शेतकऱ्यांचा सन्मान हा शासनाचा बहुमान;

कृषी पुरस्कारांच्या रकमेत करणार वाढ

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

· अर्थक्षेत्राला कृषीक्षेत्रामुळे लाभली स्थिरता - उपमुख्यमंत्री अजित पवार

· शेतकऱ्यांनी तारली अर्थव्यवस्था - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

· कृषी ग्रामविकास समिती ठरणार मार्गदर्शक - कृषी मंत्री दादाजी भुसे

            नाशिक, दि. २ : एकीकडे अत्यंत प्रगत तर दुसरीकडे अत्यंत प्राथमिक अवस्थेत असणारी शेती आपल्याला दिसते. हे चित्र बदलायचे असेल तर कृषी विद्यापींठांमधील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून ते मातीत अवतरायला हवे. तसेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची देशाच्या कृषी क्षेत्राची राजधानी म्हणून नवीन ओळख निर्माण करा, असे आवाहन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. ते आज नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

            विद्यापीठाच्या धन्वंतरी सभागृह शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी येथे आयोजित वर्ष सन 2017, 2018 व 2019 च्या या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सर्वश्री हिरामण खोसकर, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नितीन पवार, पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषि विभागाचे आयुक्त धीरज कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व इतर अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी बोलताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, हा देश अनादी काळापासून शेतीप्रधान आहे. इथल्या शेतकऱ्याची भारताचाच नाही तर देशाबाहेरही अन्नदाता म्हणून ओळख आहे. त्यामुळे हा देश सदैव शेतकऱ्यांच्या ऋणात आहे. महाराष्ट्रात शेतीचे नवनवीन प्रयोग होत आहेत. काही प्रयोगांना जी.आय. टॅगिंगही मिळाले आहे. सेंद्रिय शेती व बाजाराच्या मागणीप्रमाणे पीकपद्धतीचा अवलंब केल्याने चारपटीने उत्पन्नात वाढ झाल्याची, शेतीमाल अमेरिका, ब्रिटन सारख्या देशात प्रत्यक्ष निर्यात झाल्याची उदाहरणं मी पाहिली आहेत. एवढंच नाही तर हे प्रयोग पाहण्यासाठी उत्तराखंड येथील शेतकऱ्यांनाही आपण आमंत्रित केल्याचे यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले. उद्योगांनी इथल्या गरीब शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना आज पुरस्कार मिळाले आहेत, त्यांनी आपल्यासोबतचे अनुभव, ज्ञान इतर शेतकरी बांधवांना द्यायला हवे. आपल्यासोबत इतरांनाही पुढे नेत घरात जसे नव्या जन्माचा आनंद आपण घेतो तसा आनंदोत्सव अनुभवावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना केले.

            यंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान हा नव्या शेतीचा खरा मुलमंत्र असून ते आत्मसात करण्याबरोबरच शेजारी गुजरात व देशात काही ठिकाणी सुरू असलेल्या नैसर्गिक (प्राकृतिक) शेतीचे प्रयोगही आपण पहायला हवेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मधील कमीत कमी जमीनीत करता येण्यासारखा आत्याधुनिक व्हर्टीकल फार्मिंगचा प्रयोगही शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे.

            कोरोनाकाळात संपूर्ण देशाला वाचवण्याचं कार्य आमच्या अन्नदाता शेतकरी बांधवांनी केले आहे. साखर कारखान्यांसाठी इथेनॉल निर्मिती फायदेशीर व अधिक लाभाची असल्याचे सांगत शेतकऱ्यांसाठी राज्य शासन व केंद्र सरकार खूप योजना राबवत आहेत, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी होते, राहील अशी ग्वाही यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी दिली.


 



Featured post

Lakshvedhi