Wednesday, 13 April 2022

 दोन कोटी महिलांना सक्षम करणार ॲड. यशोमती ठाकूर

· ‘माविम’तर्फे आयोजित प्रेरणादायी महिलांच्या सन्मान सोहळ्यात घोषणा.

            मुंबई, दि. 12 : महाविकास आघाडीचे शासन माविमच्या माध्यमातून 2 कोटी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे काम करीत असून येत्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजून 2 कोटी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास आज महिला बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने सह्याद्री अतिथीगृह, येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित "सन्मान प्रेरणादायी महिलांचा" या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

            या कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे, मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी आणि सारस्वत बँकेचे जनरल मॅनेजर समीर राऊत आदी उपस्थित होते.

            मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माविम नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, बचत गटामधील महिलांमध्ये उद्योगजकतेचा विकास व्हावा, यासाठी माविम अनेक योजना राबवित आहे. सध्याच्या काळात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक सक्षमीकरण नाही, तर त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सक्षमीकरण झाले पाहिजे. त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

            श्रीमती ज्योती ठाकरे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. सध्या राज्यात सुमारे दीड लाख बचतगटांची स्थापना ‘माविम’च्या वतीने करण्यात आली आहे. महामंडळाने आतापर्यंत विविध योजनेअंतर्गत 1.50 लाख बचतगटाची निर्मिती करुन 17.51 लाख महिलांचे संघटन उभे केले असून त्यापैकी सुमारे 8.50 लाख महिला विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. माविमने बचत गटांचे महाराष्ट्रामध्ये 361 फेडरेशन नोंदणीकृत केले आहे. यापैकी 80% फेडरेशन हे स्वबळावर सुरु आहेत.

            श्रीमती पेडणेकर म्हणाल्या, माविम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे काम करते. महिलांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी काम होणे गरजेचे आहे. महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते व देश सक्षम होतो.

            या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात माविममार्फत विविध कार्यक्षेत्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी “सेफ्टी ऑडीट” राबविण्यात आले. याची सुरुवात मुंबई शहरापासून केली जाणार आहे. मविम स्टाफ व महिलांसाठी अक्षरा या स्वयंसेवी संस्थेच्या साधन व्यक्ती मार्फत सेफ्टी ऑडिट या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते “महिला सेफ्टी ऑडीट - (Women Safety Audit)” प्रशिक्षण पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

            कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश सावंत यांनी “महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांचे कार्य विषद केले. यावेळी १२ यशस्वी महिला उद्योजक / सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पृथ्वी पाटील - ठाणे, लिला गजरा - पालघर, प्रतिभा सांगळे - बीड, संजीवनी ताडेगांवकर - अकोला, कल्पना किशोर दिवे - अमरावती, मनुताई सुर्यभान वरठी, न्या. निकिशा अशरफखान पठाण - चंद्रपूर, सुषमा केशव पवार - भंडार, मिना हिरालाल भोसले – धुळे, वनिता शिरिष हजारे – पुणे, श्रध्दा कांडोळे, यांना प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

            व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी आभार मानले.

------



दक्षता

 प्रवासात

    सार्वजनिक ठिकाणी फिरताना खबरदारी घ्या

     अनोळखी व्यक्तीने काही खायला दिले तर खाऊ नका


 लेटेस्ट विडीयो पहा

 *05.04.2022*

    व अश्या सुशिक्षीत भुरट्या चोरांपासुन सावध रहा

👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽


*पहा


विडीयो*

 जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेवेतन वेळेवर होण्यासाठी यंत्रणा सुधारण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

            मुंबई, दि. 12 :- राज्यातील जिल्हा परिषदांच्या तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही, या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे, त्यासाठी सेवार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


            राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, आमदार कपिल पाटील, आमदार अभिजीत वंजारी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी विलंब होणे चुकीचे आहे. शिक्षकांचे वेतन सेवार्थ प्रणालीद्वारे केले जाते. या सेवार्थ प्रणालीसह इतर यंत्रणातील त्रुटींमुळे वेतन अदा करण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभाग आणि वित्त विभागाने समन्वयाने काम करावे, यंत्रणांमधील त्रुटी दूर करुन आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले. 


*****               





Tuesday, 12 April 2022

 *"श्री.तुलसीदासांना"* एकदा एका भक्तांने विचारले की...

*"महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?"*

तुलसीदास म्हणाले :- "हो"

भक्त :- मला पण दर्शन घडवाल का ???

तुलसीदास :- "हो नक्की"

★ *तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं, जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेल !!!*

*तुलसीदास म्हणाले , ""अरे हे खुप सोप्पं आहे !!!  तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील.""*

*प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल.* 

त्यासाठी मी तुला एक *सुत्रश्लाेक*  सांगतो.

त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सुत्र लागु होईल!!!

भक्त :-"कोणते सुत्र ?"

*तुलसीदास* :- हे ते सुत्र ...

*||"नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण ||  || तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम || "*

वरील सुत्राप्रमाणे

★ *आता कोणाचेही नांव घ्या, त्याची अक्षरे माेजा*...

*१)त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा*.

*२)त्यात (पंचतत्व मिलन) ५ मिळवा.*

*३)त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा.*

*४)आलेल्या संख्येला (अष्ट सो भागे) ८ ने भागा.*

*""पुर्ण भाग जात नाही!!!*

*दरवेळेस बाकी २ शिल्लक राहतेच* ...

*ते दोन म्हणजेच "राम" ही दोन अक्षर होय*...

★विश्वासच बसत नाही ना???

उदा. घेऊ...

कोणाचेही नाव निवडा, अक्षर कितीही असोत !!!

★ उदा. ..निरंजन...४ अक्षरे

१) ४ ने गुणा ४x४=१६

२)५ मिळवा १६+५=२१

३) दुप्पट करा २१×२=४२

४)८ ने भागा ४२÷८= ५पुर्णांक, बाकी मात्र २ !!!

*बाकी नेहमी दोनच अक्षरे उरतील ती म्हणजे - "राम" !!!*

*विशेष म्हणजे सुत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिलं आहे*!!!

★1) *चतुर्गुण* म्हणजे *४ पुरुषार्थ* :- *धर्म, अर्थ, काम,मोक्ष* !!!

★2) *पंचतत्व* म्हणजे *पंचमहाभौतिक* :- *पृथ्वी, जल, अग्नि, वायु , आकाश*!!!

★3) *द्विगुण प्रमाण* म्हणजे *माया व ब्रह्म* असे दोन !!!

★4) *अष्ट सो भागे* म्हणजे *अाठ दिशांनी* ( *चार दिशा* :-पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण , *चार उपदिशा* - आग्नेय,नैऋत्य, वायव्य, ईशान्य,  *आठ प्रकारची लक्ष्मी* (आग्घ,

विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग आणि योग

लक्ष्मी )

★आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासून पहा ...

विस्मयकारक वाटेल पण बाकी नेहमी २ च येईल...

*यात तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची व अतुट रामभक्तीची ओळख पटते* !!!

🙏🏻 *जय श्रीराम* 🙏🏻


 

 बायको डोक्यावर चढते.


 .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

            मुंबई, दि. 11 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयामध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

            राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना तसेच नवीन पिढीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

            इयत्ता पहिली ते पाचवीसाठी वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय (वेशभूषेसह) स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी ‘मी डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोलतोय’, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग आणि ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण’ हे विषय असतील. वक्तृत्व आणि एकपात्री अभिनयासाठी दिलेल्या तीनपैकी कोणत्याही विषयावर तीन मिनिटांचा व्हिडीओ तयार करून अपलोड करता येईल. तर चित्रकला स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगावर ए-4 आकाराच्या कागदावर चित्र काढून त्याचा फोटो अपलोड करावा लागणार आहे.

            इयत्ता सहावी ते आठवी साठी निबंधलेखन, वक्तृत्व, स्वरचित कविता, काव्यवाचन, पोस्टरनिर्मिती आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार - डॉ.बाबासाहेब आंबेडकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे विविधांगी पैलू हे विषय असतील. निबंधलेखनासाठी दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर ३०० ते ५०० शब्दांपर्यंत ए-४ आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो अपलोड करावा. वक्तृत्व स्पर्धेसाठी दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा तीन मिनिटांचा व्हिडिओ तयार करून अपलोड करावा लागेल. स्वरचित कवितालेखन आणि काव्यवाचनासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित स्वरचित कविता ए-४ आकाराच्या कागदावर लिहून त्याचा फोटो अपलोड करावा आणि काव्यवाचनासाठी काव्य म्हणून त्याचा तीन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा. पोस्टर निर्मिती आणि रांगोळी स्पर्धेसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग व त्यांच्या जीवनातील विविध पैलू यावर पोस्टर तयार करून त्याचा फोटो अपलोड करावा.

            इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी निबंधलेखन, वक्तृत्व, व्हिडीओनिर्मिती, दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह, एकांकिका, एकपात्री अभिनय, कथाकथन आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येतील. यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरू : तथागत गौतम बुद्ध, महात्मा कबीर आणि महात्मा जोतिबा फुले, सम्राट अशोक आणि भारताची राष्ट्रीय प्रतीके, माझी शाळा, माझे ग्रंथालय, माझ्या घरातील समृद्ध ग्रंथालय हे विषय असतील. निबंधलेखन आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी दिलेल्या विषयावर निबंधासाठी ए-४ आकाराच्या कागदावर लिहून त्याचा फोटो अपलोड करावा आणि वक्तृत्वासाठी तीन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा. व्हिडिओ निर्मिती - इंटरनेटवरील फोटोंचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग दर्शविणारी तीन मिनिटांची व्हिडिओ क्लिप तयार करून अपलोड करावी. दुर्मीळ छायाचित्रांचा संग्रह विषयासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांचे कार्य सांगणाऱ्या फोटोंचा कोलाज तयार करून त्याचा फोटो अपलोड करावा. तर कथाकथन, एकांकिका व एकपात्री अभिनय आणि रांगोळी स्पर्धेअंतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांचे कार्य सांगणारा तीन ते पाच मिनिटांचा व्हिडिओ तयार करून अपलोड करावा आणि या विषयावर रांगोळी काढून त्याचा फोटो अपलोड करावा.

            याप्रमाणे विद्यार्थी व शिक्षक यांनी कार्यक्रमांचे आयोजन करून सादरीकरणाचा दोन ते तीन मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडिओ, फोटो व इतर साहित्य समाजसंपर्क माध्यमावर (फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) #muknayak या HASHTAG (#) चा वापर करून अपलोड करण्यात यावे. व त्या पोस्टची लिंक https://scertmaha.ac.in/competitions/ इथे देण्यात यावी. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत उत्कृष्ट उपक्रमांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. या कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, अशा सूचना शासन परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

00



Featured post

Lakshvedhi