सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 11 March 2022
*कावळा शिवण्याला काय आहे शास्त्राधार* । 👇🏻
माणसांना फक्त उजेडात दिसते... मांजराला उजेडात व अंधारातही दिसते... वटवाघुळ व घुबडास फक्त अंधारातच दिसते अशी निरनिराळी दृष्टी परमेश्वराने दिलेली आहे...
तशी त्या पिंडातील जीवात्मा दिसण्याची दॄष्टि परमेश्वराने कावळ्यास दिली आहे...
आपली इच्छा पुरी होण्याचे आश्वासन मिळेपर्यंत तो जीवात्मा कावळयाला शिवू देत नाही... कावळे जवळ येतात पण उडून जातात... मृत व्यक्ति कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते, अशी अनेकांची समजूत आहे पण प्रत्यक्षात तसे नसून तो जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास मज्जाव करतो... पिंडाला कावळाच का शिवला पाहिजे तर कावळ्यास ही दृष्टी आहे म्हणून... जीवात्मा दिसण्याची दॄष्टि कावळ्याला आहे तर त्याचे डोळ्यातील लेंसप्रमाणे लेंस तयार करता आली तर आपणासही त्या पिंडातील जीवात्मा दिसू शकेल, असे वाटून जर्मनीतील एका संशोधकाने तशी लेन्स करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे... तशी लेन्स तयार झाली तरीही आपणास जीवात्मा दिसू शकणार नाही... कारण लेन्स हे जीवात्मा दिसण्याचे साधन नाही तर लेन्स बरोबर ती दॄष्टीही पाहिजे... तशी दृष्टी परमेश्वराने फक्त कावळ्यालाच् दिली आहे डोळ्यासारखा डोळा असूनही अनेक माणसांना दिसत नाही... दुसऱ्या माणसांना त्याचे डोळे इतर माणसां प्रमाणेच दिसतात पण दिसण्याची शक्ती त्यात नसते... दिसण्याची शक्ती सूर्याची असते... परमेश्वराच्या नेत्रापासून सूर्य निर्माण झाला आहे... चक्षो:सूर्यो अजायत... असे पुरुष सुक्तात म्हटले आहे... तसेच 'सूर्योमेचक्षुशिश्रिता' असे दूसरे वचन वेदांत आहे... याचा अर्थ पाहण्याची शक्ती सूर्यामुळे मिळते... डोळा हे पाहण्याचे साधन आहे... म्हणून कावळ्याच्या डोळ्यासारखी लेन्स तयार केली तरी त्यात सूर्यशक्ती नसल्याने (ध्वनीफितीत प्राणशक्ति नसते त्याप्रमाणे) त्या डोळ्यांनी जीवात्मा दिसणे शक्य नाही... जीवात्मा हा वायुरुप असतो... कावळा एकाक्ष,नजर तीक्ष्ण,सूक्ष्म... दहा दिवसापावेतो सूक्ष्म देह वासना रहिल्यास असतो, पिंडाभोवती फिरतो... कावळ्यास तो दिसल्याने काकस्पर्श होत नाही... ईच्छापूर्तीचे आश्वासन मिळाले की सूक्ष्म देह निघून जातो... हालचाल नाही म्हणून काक पिंडास स्पर्श करतो...
कावळा हा वैवस्वत कुळात जन्माला आलेला आहे जो पर्यंत वैवस्वत मन्वन्तर आहे तो पर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिण्डाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे श्रीरामानी कावळ्याला वरदान दिले आहे म्हणून कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्न रूपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पितरांना त्रांस होत नाही म्हणून कावळ्याला अन्न किंवा पिंड देतात...
🙏🏻🍁🔆🍁🙏🏻
*लुगड्याची गोष्ट .*
रात्रीची वेळ... निरव शांतता ...
तेलाच्या दिव्याचा मिणमीणता प्रकाश.
सावित्रीबाई पांघरूण अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत..
ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळा वर हात ठेवतात.
",सावित्री. !" ज्योतीराव उद्गारले, "अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला ? "
"आहो, एवढं काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." सावित्रीबाई.
"अग पण ही कण-कण वाढली तर आपल्या शाळेचं कसं होईल? ,
मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........
ते काही नाही,उद्याच वैद्यांना बोलावतो,
तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील." -- ज्योतीराव.
"आहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई.
"मग?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न.
" तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी
अजून एक लुगडं देऊ शकलात
तर हा ताप आपोआप जाईल." सावित्रीबाई.....
ज्योतीराव काहीशा नाराजीने दुस-या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.
त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........
मग सावित्री असे का बरं बोलली?..........
तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?...........
आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ....
बायकोच्या लुगड्या करिता नव्हे ............
पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार...........
विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.
दुस-याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबाई्च्या हातावर नवे लुगडे ठेवले.
बाईंच्या डोळ्यात पाणी आलं...........
लुगड्यासाठी खर्च करायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार,
कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता......
सावित्रीबाई पक्के जाणून होत्या.
त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.
ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कसं काय.".........
लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच............
ज्योतीरावांनी सावित्रीबाईंचे शाळेतील सहाय्यक होते, त्यांची भेट घेतली. आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.
त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.
बाई शाळेत आल्यावर अंगावरील लुगड्यावरचे शेण चिखलाचे डाग धुऊन ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवितात.
त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.
परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात .
त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."
आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं...|
*कारण त्यांच्यामुळेच् आजच्या स्त्रीयां ज्या कुठल्यही जातीच्या असो की धर्माच्या शिकु शकल्या ..!!*
कर्मयोग जगताना किती खोलवर विचार करावा लागतो.
सावित्रीबाईंच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला...!!
*त्या दोन्ही महान विभूतींस प्रणाम कोटी कोटी प्रणाम...*
🙏💐🙏💐🙏💐🙏
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...