Tuesday, 1 March 2022

 जगातील युद्धजन्य परिस्थितीत आचार्य तुलसींचे अणुव्रत महत्वाची

-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 01 : आज जगात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असताना तसेच वैयक्तिक स्तरावर मनुष्य अशांत असताना जैन आचार्य तुलसी यांनी सुरु केलेली अणुव्रत चळवळ शांतीच्या पुनर्स्थापनेसाठी अतिशय महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

       आचार्य तुलसी यांनी सन १९४९ मध्ये सुरु केलेल्या अणुव्रत आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त 'शंखनाद अणुव्रताचा' हा कार्यक्रम राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन अणुव्रत समिती मुंबईतर्फे करण्यात आले होते.

            यावेळी आचार्य महाश्रमण यांचे शिष्य मुनिश्री डॉ अभिजित कुमार, मुनिश्री जागृत कुमार, अणुव्रत विश्वभारतीचे अध्यक्ष संचय जैन, अणुव्रत समिती मुंबईच्या अध्यक्षा कंचन सोनी, समाजसेवक रविंद्र संघवी व राजकुमार चपलोट आदी उपस्थित होते.

            राज्यपाल श्री कोश्यारी म्हणाले, दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बमुळे प्रचंड नरसंहार झाला त्यावेळी आता विश्वशांतीसाठी ॲटम बॉम्ब नाही तर आत्मभान आवश्यक असल्याचे आचार्य तुलसी यांनी जगाला पटवुन दिले. या पार्श्वभूमीवर जनसामान्यांना करता येईल असे अणुव्रत म्हणजे शांततेसाठी लघुसंकल्प करण्यास त्यांनी सांगितले होते. आज जगभर युद्धाची परिस्थिती उद्भवली असताना सर्वांनी शांततेच्या दिशेने लहानसाही प्रयत्न केला तर एक निरोगी समाज व सुखी जग निर्माण करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

            राज्यपालांच्या हस्ते यावेळी 'उत्थान गीत' तसेच पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. 

            मुनिश्री जागृत कुमार यांनी तणाव मुक्त जगण्याचे सूत्र सांगितले तर मुनी डॉ अभिजित कुमार यांनी संबोधन केले.

            कंचन सोनी व संचय जैन यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार चपलोट यांनी सूत्रसंचालन केले तर वनिता बाफना यांनी आभार प्रदर्शन केले. 

0000 



 कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चा राष्ट्रीय व्यापार शिरोमणी पुरस्कार ललित गांधी यांना*

-----------------------------------

*केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान*

-----------------------------------

नवी दिल्ली ः भारतातील 8 कोटी व्यापार्‍यांची शिखर संस्था असलेल्या ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट) या संस्थेचा *राष्ट्रीय व्यापार शिरोमणी पुरस्कार* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर के अध्यक्ष ललित गांधी यांना प्रदान करण्यात आला.

कॉन्फेडरेशन च्या राष्ट्रीय कार्यकारीणी बैठक प्रसंगी नवी दिल्ली येथे केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती स्मृती ईराणी यांच्या हस्ते शानदार समारोहात पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी कॉन्फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया, राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल, सौ. जया गांधी, कु. मुक्ति गांधी व्यासपीठावर उपस्थित होते.

व्यापारी, उद्योजकांची संघटनात्मक बांधणी, व्यापारी उद्योजकांच्या संरक्षणासाठी व न्याय हक्कासाठी विविध लढ्यांचे व आंदोलनाचे केलेले यशस्वी नेतृत्व, स्थानिक पातळीपासुन राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत व्यापार्‍यांच्या प्रश्‍नांसाठी केलेला संघर्ष व पाठपुरावा या क्षेत्रातील गेल्या 35 वर्षातील केलेले उल्लेखनीय कार्य, विशेषतः कोरोना काळात लॉकडाउन मधील व्यापार्‍यांच्या हक्कासाठी दिलेला आक्रमक लढा याची दखल घेउन त्यांची या पुरस्कारासाठी निवड केल्याचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी नमुद केले.

सदर समारंभाप्रसंगी कॅट चे राष्ट्रीय चेअरमन महेंद्र शहा,वरिष्ठ उपाध्यक्ष बृजमोहन अगरवाल, राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, कॅट चे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र बाठीया, कार्याध्यक्ष दिलीप कुंभोजकर,सचिन निवंगुणे यांच्यासह देशभरातील सर्व राज्यांचे प्रमुख व व्यापारी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना ललित गांधी यांनी कॉन्फेडरेशनने या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त करून हा पुरस्कार हा सर्व सहकार्‍यांच्या सामुहीक प्रयत्नांमुळे मिळाला असल्याचे त्यांच्या वतीने स्विकारत असल्याचे नमुद करून देशभरातील व्यापारी, उद्योजकांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे सांगितले व आयुष्याच्या अखेरपर्यंत व्यापारी व उद्योजकांच्या विकासासाठी कार्यरत राहु असे अभिवचन दिले.

 युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील 72 विद्यार्थी आतापर्यंत दिल्लीत दाखल

· महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे ४६ विद्यार्थी स्वगृही सुखरूप परतले. 

            नवी दिल्ली, दि. 28 : युध्दजन्य युक्रेन देशात अडकलेले महाराष्ट्रातील एकूण ७२ विद्यार्थी आतापर्यंत पाच विशेष विमानांनी दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून यातील ४६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.

               सध्या युक्रेनमध्ये युध्द सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत रविवार मध्यरात्रीपासून सोमवारी सायंकाळपर्यंत एकूण पाच विमानांद्वारे जवळपास १२५० भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील ७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

थोडक्यात तपशील

           एयर इंडियाच्या विशेष विमानाने बुखारेस्ट (रोमानिया) येथून रविवारी मध्यरात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विशेष विमान दाखल झाले. यात, महाराष्ट्रातील २८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानंतर, रविवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विशेष विमानांनी महाराष्ट्रातील प्रत्येकी १८ आणि १२ विद्यार्थी दाखल झाले. सोमवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विशेष विमानांनी प्रत्येकी १० आणि ४ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले.

महाराष्ट्र सदनाद्वारे ४६ विद्यार्थी स्वगृही सुखरूप परत

             युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे,यासाठी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव समीरकुमार बिस्वास यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाच्या अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत. या कक्षाद्वारे गेल्या दोन दिवसात ४६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहे.

सहकार्य कक्षामध्ये एकूण २५ अधिकारी-कर्मचारी अहोरात्र कार्यरत

           महाराष्ट्र सदनाद्वारे दिल्ली विमानतळावर स्थापन सहकार्य कक्षात ५ अधिकारी- कर्मचारी तर ५ वाहन चालक कार्यरत आहेत. विमानतळाहून महाराष्ट्र सदनामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १२ कर्मचारी कार्यरत आहेत.

सहकार्य कक्षाद्वारे असे सुरु आहे कार्य...

                दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजिकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी या कक्षाद्वारे विमानाचे तिकीट काढून देण्यात येत आहे.विमानतळाहून कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सदनात ने-आण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना उपलब्धतेनुसार विमानाद्वारे सुखरुप स्वगृही पोहचविण्यात येत असून आतापर्यंत ४६ विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले आहेत.

          युक्रेनमधून दिल्लीत परतणाऱ्या भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांना आप-आपल्या राज्यात सुखरुप पोहचता यावे यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.


                                                              0000


                                                        



 




 


 



 

 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

💥🧿#महाशिवरात्री🧿💥

■■■■■■■■■■■

"भगवान" श्री महादेवांना "महाकाल" असे संबोधले जाते.!! "महाकाल" अर्थात ! 'शिव' हे भक्तांचे संकट निवारण करतातच परंतु भूत, पिशाच्च, करणी व बाधा आदी दुष्ट शक्तींना भक्तांच्या जवळही फटकू देत नाहीत.!!

 (१):-मित्रांनो! आपल्या कडून देहाने ,वाचेने,मनाने, व कर्माने कळत-नकळत अनेक छोटे मोठे पापकर्म घडतच असतात!!

(२):-जागोजागी येणाऱ्या पिंपळ,वटवृक्ष आदीमध्ये देवतांचा वास असतो त्या वृक्षांची मुबलक प्रमाणाततोड केली जात असते.!!

 (३):-पितरांची श्राद्धकर्मे वेळेत केली जात नाहीत.!त्यांना अन्न दिले जात नाही. त्यांचे तर्पण केले जात नाही.!!

(४):-परमात्म्याचे पूजन केले जात नाही. कुलदेवतेचे कुलाचार केले जात नाहीत.!या आणि अशा अनेक घडलेल्या पापांचे निर्मुलन व्हावे ,असे अनेकांना वाटत असते.! कुंडलीतील दोषामुळे कृत व गतकर्माची फळे भोगावी लागतात.!! त्यापासून मुक्तता हवी असते.!पूर्ववत पुन्हा आपले कुलाचार सुरू करावयाचे असतात. तेंव्हा भूतकाळातील पापकर्म दोष-परिहार व्हावा म्हणून प्रायःश्चित्त करण्यासाठी अत्यंत सोपे व सर्वश्रेष्ठ "व्रत" म्हणजे """प्रदोष शिवरात्री व्रत".!!!!!

त्यातही सर्वश्रेष्ठ फलदायी म्हणजे" "#महाशिवरात्री" होय.

ही पर्वणी वर्षातून एक वेळेस येत असते.!!

येणारी शिवरात्री माघ वद्य चतुर्दशी तिथीला दि.1 मार्च-2022 रोजी मंगळवारी असून तिचा निषिथ काळ हा मध्यरात्री 12-26 ते 1 वाजून 15 मिनिटापर्यंत म्हणजे एकंदर 49 मिनिटाचा असेल. हा अत्यंत महत्त्वाचा काल आहे.! याच कालात भगवान शिवाचे अस्तित्व संबंध पृथ्वीवर असणाऱ्या शिवपिंडीत (शिवलिंगात) सक्रीय असणार आहे म्हणून या कालावधीत केल्या जाणाऱ्या शिवपूजनाचे कोटी पुण्यफल भक्तांना प्राप्त होते ! शिवाय अनेक जन्माच्या पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे.!!!!

धर्मसिंधू या ग्रंथामध्ये हे व्रत कसे करावे याबद्दल अतिशय उत्तम माहिती दिलेली आहे.!! 

 आपल्या सर्व माता भगिनी व बांधवांना ह्या व्रताची माहिती मी शिवाजी व्यास सोप्या भाषेत आपणास सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.- - - - !! याचा लाभ भक्तांनी जरूर घ्यावा !!

【१】--#संकल्प---

शिवरात्रीचे दिवशी अनशन व्रत(उपवास) घेतलेल्या भक्ताने शिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा. हा संकल्प बहुतांश लोकांना माहिती असतोच.!

महादेवाची पूजा करण्यापूर्वी 

देहशुद्धी करून मनोमन पुढील संकल्प करावा!!!

---◆◆◆""● हे महादेवा!! माझ्या काया वाचा व मनाने जाणते अजाणतेपणी घडलेल्या पापांची निवृत्ती व्हावी!! तसेच ग्रहपीडा, पितृपीडा,अनिष्टशक्ती पीडा यांचा परिहार होऊन तुझी शुद्ध भक्ती मला प्राप्त व्हावी म्हणून हे "महाशिवरात्री" व्रताचे अंतर्गत पूजन मी यथा ज्ञानाने , यथा शक्तीने,यथा उपचारांने करत आहे !!!"" !!!●

 संकल्प झाल्यावर खालील दोन (ऋचा) म्हणाव्या.!!----

("रात्रीं प्र पदये जननीं सर्वभूतनिवेशनीम् । 

भद्रां भगवतीं कृष्णां 

विश्वस्य जगतो निशाम् ।।

संवेशिनीं संयमिनीं ग्रहनक्षत्रमालिनीम् । प्रपन्नोहं शिवां रात्रीं भद्रे पारमशीमहि ।।)

[समस्त प्राणीमात्रांना मातृतुल्य (मातेप्रमाणे) आधारभूत, कल्याणकारक समस्त जगताला आच्छादन करणारी,आणि कृष्णवर्णीय अशा रात्रीदेवीला मी शरण जातो. हे! सर्वाचा आधार असणारी, नियमबद्ध , ग्रहनक्षत्रस्वरूप अलंकार धारण करणारी शुभ आणि कल्याणप्रद रात्रीदेवी, शरणागत भक्तांना तू संकटपार पोहोचव !!]

【२】💥--- #पूजा---💥

 संध्याकाळी कपाळी त्रिपुंड आणि हाती रुद्राक्षमाळा धारण करून शिवभक्तांने शिव मंदिरातील शिवलिंगांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यावेळी खालील ध्यान श्लोक म्हणावेत.!!

"ध्यायेनित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसम् ।

रत्नाकल्पोज्वलांगं परशुमृगवरा भीतीहस्तं प्रसन्नम् । पद्मासीनं समन्तात्सु तममरगणैव्याघ्रकृत्तिं वसानम्। विश्वाद्यं विश्ववंद्यम् निखिलभयहरं पन्चवक्त्रं त्रिनेत्रम् ।।

[ रौप्यपर्वतासमान श्वेतकांती असणार्या सुंदर चंद्राला आभूषण म्हणून धारण करणार्या, वस्त्रालंकारानी उज्वल.शरीरयुक्त बनलेल्या, स्वतःच्या हातात परशु,मृग,वर, आणि अभय धारण करणार्या , प्रसन्न, पुष्पासनावर बसलेल्या, स्तुतिस्तोत्रगायक , देवतागणांनी वेष्टिलेल्या , व्याघ्राजीन घातलेल्या, विश्वाचे आदिकरण आणि जगदुत्पत्तीचे बीज स्वरूप अशा समस्त भयांचे निराकरण करणार्या तसेच पंचमुख आणि त्रिनेत्र अशा महेश्वराचे प्रतिदिनी ध्यान करावे.]

【३】🏵️:-पंचामृतस्नान :-🏵️

 गायीचे दूध दही, तूप, मध,साखर हे एकत्रित करून किंवा फक्त दुधाने भक्तीपूर्वक स्नान घालावे. ।।शिवाय नमः।। या मंत्राचा उच्चार सतत चालू ठेवावा.!!

【】🌻-शुद्धोदकस्नान-🌻

 तांब्याच्या भांड्यातील शुद्ध पाण्याने वरील मंत्र म्हणत म्हणत शिवाला स्नान घालावे.!!

【५】♨️--#अभिषेक--♨️

 शुद्धोदक स्नान घातल्यानंतर चंदन, केशर आणि कापूर मिसळलेल्या पाण्याने शिवलिंगास अभिषेक करावा. (रुद्राध्याय, पुरुषसुक्त आदी मंत्राने) जमत नसल्यास --

।।ओम् नमःशिवाय ।।

 या सोप्या मंत्राने देखील अभिषेक कला तरी चालतो. शेवटी श्रद्धेचेच फळ मिळते.!

【६】🌞-- #तर्पण-- 🌞

 अभिषेक झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीसमवेत खाली दिलेल्या आठ नावाचा उच्चार करून तर्पण करावे.--!!!

(उदा:-ओम् भवाय तर्पयामि याप्रमाणे खालील नावाने)

(१)-भव (२)-शर्व (३)-ईशान (४)-पशुपति (५)-उग्र (६)-रुद्र (७)-भीम (८)-महादेव.

【७-- ☸️-- #जप : --☸️

तर्पणानंतर शिवलिंगास एकहजार आठ अथवा एकशेआठ बेलाची पाने

वहावीत.त्यावेळेस जमल्यास शिवसहस्रनाम स्तोत्र म्हणावे अथवा - ।।शिवाय नमः।। या मूलमंत्राचा यथाशक्ती जप करावा.!!

【८】❇️-अन्य उपचार-❇️

शिवलिंगाला नैवेद्य, तांबुल,आणि मंत्रपुष्पांजली समर्पित केल्यानंतर खालील नावाने बारा पुष्पांजली अर्पण कराव्यात.!!

(१)-शिव (२)-रुद्र (३)-पशुपति (४)-नीलकंठ (५)-महेश्वर (६)-हरिकेश (७)-विरूपाक्ष (८)-पिनाकिन्(९)-त्रिपुरान्तक (१०)- शंभू (११)-शूलिन् (१२)-महादेव.

【९】-- ✳️-#प्रदक्षिणा-✳️

 वरील प्रमाणे सर्व उपचार झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करून तसेच ।।शिवाय नमः।। या मूलमंत्राचा एकशेआठ वेळा जप करून पूजेची समाप्ती करावी.

शिवरात्रीचे हे व्रत भक्ताने बारा, चौदा अथवा चोविस वर्षे यथाशक्ती करून त्यानंतर या व्रताचे उद्यापन करावे या भक्तांना मनोवांछित फल तर मिळतेच पण अंतकाली शिवलोक प्राप्त होतो. असे व्रत करणारे या आजच्या काळात क्वचितच सापडतात. उपवास, दर्शन शिवलीला श्रवण एवढेच पालन सध्या च्या काळात होत असलेले दिसून येते. निदान प्रत्येक भक्ताने हे महाशिवरात्री व्रत अवश्य करावे.------!!!!


 🟦☸शिवाजी व्यास☸🟦

अध्यात्म--ज्योतिष अभ्यासक

   संपर्क 8217897287

Featured post

Lakshvedhi