Wednesday, 26 January 2022

             महाराष्ट्राला तीन ‘परम विशिष्ट सेवा पदक’

राज्याच्या एकूण 14 सेना व नौदलाच्या अधिकारी-जवानांना‘शौर्य पदक’

               नवी दिल्ली, दि. 25 : लष्कराच्या सेनाधिकारी व महाराष्ट्रकन्या ले.जनरल माधुरी कानिटकर(सेवानिवृत्त) ,ले.जनरल मनोज पांडे तसेच नौदलाचे व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले असून मुळचे महाराष्ट्राचे असलेल्या अन्य 11 अधिकारी व जवानांना ‘शौर्य पदक’ जाहीर झाले आहेत.

          राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज लष्कराच्या एकूण 317 आणि नौदलाच्या एकूण 34 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘शौर्य पदक’ मंजूर केले आहेत. या पदकांमध्ये 22 ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम), 4 ‘उत्तम युध्द सेवा पदक’(युवायएसएम), 40 ‘अती विशिष्ट सेवा पदक’(एव्हीएसएम), 6 ‘शौर्य चक्र’, 84 ‘सेना पदक’ (शौर्य), 10 ‘युध्द सेवा पदक’, 40 ‘सेना



        ऊसतोड कामगारांची नोंदणी प्राधान्याने पूर्ण करा

-.                                       उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

          मुंबई, दि.25 : ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, कामगार विभाग तसेच विविध सामाजिक संस्था काम करत आहेत. स्थानिक पातळीवर या विभागांमार्फत राबविण्यात येणा-या योजनांची जनजागृती करून राज्यातील ऊस तोड कामगारांची नोंदणी सामाजिक न्याय विभागाने प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

             दूरदृश्यप्रणालीव्दारे ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी घेतलेल्या बैठकीतील निर्देशांबाबत केलेल्या अंमलबजावणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपसभापती डॉ.गो-हे बोलत होत्या. यावेळी बैठकीला सामाजिक न्याय विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी,सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे,साखर आयुक्त शेखर गायकवाड,सहकार आयुक्त अनिल कवडे,सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव विजय लहाने,कामगार विकास उपआयुक्त सुनिता म्हैसेकर, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे,महिला बालविकास विभागाचे उपसचिव श्री. ठाकूर, सामाजिक संस्था मकाम च्या (बीड) मनिषा टोकले व पल्लवी हर्षे, समता प्रतिष्ठानच्या शुभांगी कुलकर्णी, महिला आरोग्य परिषदच्या काजल जैन, एकल महिला संघटनाचे राम शेळके, साथीचे अभिजित मोरे व अरुण गद्रे, मासुमच्या निलंगी सरदेशपांडे ,आरोग्य अभियानाचे अभय शुक्ला, बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे श्रीधर आडे,नाशिकचे सिव्हिल सर्जन डॉ अशोक थोरात उपस्थित होते.

         उपसभापती डॉ.नीलम गो-हे म्हणाल्या, ऊसतोड कामगारांसाठी विविध विभागांच्या माध्यमातून योजना राबविल्या जातात. ऊसतोड कामगार महामंडळाच्या योजनांना विधी व न्याय विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. या योजनांची माहिती ऊसकामगारांना होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने जनजागृतीपर उपक्रम राबवावेत. आरोग्य तपासणी शिबीर,महिलांची तपासणी तसेच गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया (हिस्ट्रेक्टामी) करण्यासंदर्भात बीड आरोग्य विभागाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा. सार्वजनिक आरोग्य विभागानेही याबाबतची माहिती पडताळून पहावी. परजिल्ह्यात जावून कोणी ऊसतोड महिला शस्त्रक्रिया करत असतील तर त्याचीही माहिती नजिकच्या जिल्ह्यांकडून घेण्यात यावी. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सुटावेत यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या होत्या. सर्व विभागांनी केलेल्या सूचनांप्रमाणे त्यामध्ये नव्या बाबींचाही समावेश करण्यात येईल. सामाजिक संस्थांनीही ऊसतोड कामगारांसाठीच्य कामामध्ये अशाच प्रकारे सातत्य ठेवावे. अशा सूचना या बैठकीत उपसभापती डॉ. गो-हे यांनी दिल्या. ऊसतोड कामगारांसोबत महिला व बालविकास विभागाने बीड येथे बैठक आयोजित करावी. 15 फेब्रुवारी रोजी साखर आयुक्त व सहकार आयुक्त यांनी ऊस कारखान्यांच्या संचालकांना सहभागी करून ऊस तोड कामगांराबाबत कोणते निर्णय घेता येतील याबाबत सविस्तर माहिती सादर करावी. सामाजिक न्याय विभागाने ऊस तोड कामगारांची नोंद प्राधान्याने करावी जेणेकरून राज्यातील ऊस तोड कामगारांची माहिती उपलब्ध होईल, अशा सूचनाही उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

             समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे म्हणाले, राज्यातील उसतोड कामगारांसाठी विविध कल्याणकारी व आर्थिक सुधारणांचा लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.या महामंडळासाठी साडे तीन कोटी रूपये मंजूर झाले आहेत. या महामंडळाचे (पुणे) येरवडा येथे मुख्य कार्यालय होणार असून परळी येथे क्षेत्रीय कार्यालय सुरू होणार आहे. स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी कामगारांची संख्या अधिक असलेल्या तालुक्यांच्या ठिकाणी “संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना” राबविण्यात येते.सध्या मुलांची दहा व मुलींची दहा अशी २० वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. ऊसतोड कामगारांच्या नोंदणीची कार्यवाही लवकरच पूर्ण करणार आहे. ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण कार्यवाही सुरू आहे अशी माहिती डॉ.नारनवरे यांनी बैठकीत दिली.

       साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत सहकार आयुक्त व आम्ही संयुक्तपणे काम करत आहोत.सामाजिक न्याय विभागाशीही चर्चा करत आहोत. साखर कारखान्यांसोबत बैठक घेवून ऊसतोड कामगारांसाठी अन्य कोणकोणत्या सुविधा देता येतील याची माहिती घेण्यात येईल.

           महिला व बालविकास विभाग, जिल्हा आरोग्य विभाग बीड, कामगार विभाग यांनीही त्यांच्या विभागामार्फत ऊसतोड कामगारांसाठी सुरू असलेल्या कामांची माहितीही यावेळी दिली.        


      

 गृह मंत्री दिलीप वळसे - पाटील यांच्या अध्यक्षतेखाली

 खाजगी कोल्डस्टोअरेजमधील अनधिकृत फळ विक्रीबाबत बैठक

          मुंबई, दि. 25 : मुंबई बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या फळ,भाजीपाला कांदा - बटाटा व्यवसायासंदर्भात गृह मंत्री दिलीप वळसे - पाटील आणि सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.

          यावेळी आमदार शशिकांत शिंदे सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार, कामगार विभागाचे आयुक्त सुरेश जाधव, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग, मुंबई पोलिस सह आयुक्त विश्वास नांगरे - पाटील, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, संचालक संजय पानसरे, अशोक वाळुंज, शंकर शेठ पिंगळे, माजी संचालक बाळासाहेब भेंडे, बाजार समिती सचिव संदीप देशमुख, उपायुक्त श्रीमती लोखंडे, उपसचिव महेंद्र म्हस्के व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

          कोल्ड स्टोअरेजमध्ये केवळ कृषी माल साठविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.यामध्ये विना परवानगी कृषी उत्पन्नाची खरेदी विक्री करू नये, मुंबई बाजार समिती आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या कार्यक्षेत्रामधील बोरिवली, गोरेगाव,दहिसर,नागपाडा,दादर ,घाटकोपर, अश्या अनेक ठिकाणी अनधिकृत खाजगी विक्री सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे मुंबई शहरातील अनधिकृत खाजगी बाजार तात्काळ बंद करावे,असे निर्देश सहकार व पणन मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

           कोल्ड स्टोरेजमधून अवैद्यरीतीने होणाऱ्या सफरचंद विक्रीचा दाखला देत त्या पद्धतीने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई शहर, कांदिवली, बोरिवली, मालाड या ठिकाणी होणाऱ्या अवैध भाजी-पाला, फळ विक्रीमुळे बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे तसेच याचा विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांना हमखास भाव देणाऱ्या बाजार समित्यांवर होत असल्याने याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

          त्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे असे सांगून सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबत समिती स्थापन करून अवैध व्यवसाय करणाऱ्या कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस बरोबर मार्केटच्या बाहेरील अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करावी असे निर्देश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

          मुंबई आयुक्त, नवीमुंबई आयुक्त, पोलीस प्रशासन, पणन अधिकारी, व बाजार समितीचे अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

           ज्या व्यापाऱ्यांकडे लायसन्स नाहीत त्यांच्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दहा वर्षापासून फार मोठ्या प्रमाणावर विदेशी फळांची आयात होत आहे. काही वर्षापासून हा व्यवसाय अनधिकृतरित्या परस्पर कोल्ड स्टोअरेजमधून खरेदी-विक्री होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: अफगाणिस्तान आणि इराण या देशातील व्यापारी स्वतः नवी मुंबई कोल्ड स्टोअरेजमधून थेट व्यापार करत आहेत. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांचे घाऊक मार्केट बंद पडण्याचं मार्गावर आहे. नियमनमुक्तीचा फायदा घेऊन हे परदेशी व परप्रांतीय व्यापारी मुंबई येथे अनधिकृत रित्या व्यापार करीत आहेत या सर्व व्यापाराची कुठेच नोंद होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

            कोल्ड स्टोअरेजमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. जाहीर केलेल्या नियमाशिवाय कोणत्याही जागेचा उपयोग करता येणार नाही. तसेच वैध अनुज्ञप्तिशिवाय दलाल प्रक्रिया करणारा, तोलारी मापणारा सर्वेक्षक, वखारवाला या नात्याने किवा इतर कोणत्याही नात्याने काम करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

0000



 

               वंदे मातरम’ नित्यनूतन, प्रेरणादायी

                                           - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

               मुंबई, दि. 25 : वाल्मिकी रामायण तसेच तुलसीदासांच्या रामचरित मानसप्रमाणे बंकीम चंद्र यांचे वंदे मातरम हे काव्य व त्याचे सांगीतिक सादरीकरण कधीही जुने न होणारे असे नित्यनूतन व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिवंगत गायक-संगीतकार विनायक देवराव अंभईकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘संपूर्ण वंदे मातरम्’वर आधारित नव्या सांगीतिक रचनेचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी संपूर्ण वंदेमातरम रचनेचे गायक मंदार आपटे, गायिका स्वाती आपटे व अर्चना गोरे, निर्माते नचिकेत अंभईकर, दिवंगत विनायक अंभईकर यांचे कुटुंबीय, उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, एजियाज फेडरलचे उपाध्यक्ष राजेश आजगावकर, वन्दे मातरम् च्या नृत्य दिग्दर्शिका पूजा पंत, पखवाज वादक चंद्रशेखर आपटे, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

            'आनंदमठ' कादंबरी लिहिली गेली त्यावेळी बंकीम चंद्र यांनी त्यातील वंदे मातरम ही रचना अजरामर होईल अशी कल्पना देखील केली नसेल असे सांगून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात 'वंदे मातरम्' हे प्रेरणा गीत ठरले तसेच अनेक क्रांतिकारक 'वंदे मातरम' चा उद्घोष करीत वधस्तंभावर गेले असे राज्यपालांनी सांगितले.

            वंदे मातरम या गीताला शेकडो संगीतकारांनी संगीतबद्ध केल्याचे नमूद करून विष्णू सहस्त्रनामाप्रमाणे या रचना नेहमीच प्रेरणादायी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी मंदार आपटे व अर्चना गोरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे 'ने मजसी ने' हे गीत सादर केले.

०००००

Governor releases new musical version of ‘Vande Mataram’

       Governor Bhagat Singh Koshyari released the new musical composition 'Sampoorn Vande Mataram' at Raj Bhavan Mumbai on Tuesday (25 Jan). The musical rendition is based on the original musical composition of vocalist and musician late Vinayak Ambhaikar.

       Playback singers Mandar Apte, Swati Apte and Archana Gore, producer Nachiket Ambhaikar, businessman Ravindra Prabhudesai, Sr Vice President of Ageas Federal Rajesh Ajgaonkar, Chandrashekhar Apte, choreographer Pooja Pant, family members of late Vinayak Ambhaikar, cartoonist Shrinivas Prabhudesai and others were present. 

०००००



 

 पद्मविभूषण’ जाहीर झालेल्या डॉ. प्रभा अत्रे यांच्यासह

‘पद्म’पुरस्कार विजेत्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन


· उद्योजक सायरस पुनावाला व नटराजन चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण’ जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन

          मुंबई, दि. 25 :- महाराष्ट्रातील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मविभूषण’, उद्योग व व्यापार क्षेत्रातील कामगिरीसाठी सायरस पुनावाला आणि नटराजन चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण’, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. हिम्मतराव बावसकर, डॉ. भिमसेन सिंगल, डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर) यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी, सुलोचना चव्हाण आणि सोनू निगम यांना कलाक्षेत्रातील कार्यासाठी, अनिलकुमार राजवंशी यांना विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला असून सर्व ‘पद्म’पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

          प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पद्म’पुरस्कार जाहीर झालेल्या महाराष्ट्रातील तसंच देशातील सर्व मान्यवरांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं असून देशाच्या, समाजाच्या जडणघडणीत दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे माजी प्रमुख, जनरल बिपीन रावत यांना ‘पद्मविभूषण’, तर डॉ. बालाजी तांबे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी जनरल बिपीन रावत यांच्या देशसेवेबद्दल, तसंच डॉ. बालाजी तांबे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

00000



 🇮🇳

*15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक ...*

🇮🇳 🌹🌹🌹🌹

*1)* 15 ऑगस्ट ला *पंतप्रधान* झेंडा *फडकवतात* तर ... 26 जानेवारीला *राष्ट्रपती* *ध्वजारोहण* करतात. 

कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                     

************                                                              

*2)* 15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला *ध्वजारोहण (flag hoisting)* म्हणतात तर... 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा *फडकवला* जातो. त्याला *(flag unfurling)* म्हणतात. 

************   

*3)* 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला *ध्वजारोहण* म्हणतात. तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केल्या जातो, म्हणून त्याला *झेंडा फडकवणे* म्हणतात. ***************    

*4)* 15 ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर *ध्वजारोहण* होते तर, 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा *फडकवला* जातो. *************      

_आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे._


🙏 *वंदे मातरम*🇮🇳🚩

Tuesday, 25 January 2022

 आवडत्या चित्ररथाला आणि मार्चिंग तुकडीला मत देण्याची व्यवस्था

            नवी दिल्ली, 25 : यावर्षी डिजिटल नोंदणीव्दारे आपल्या आवडत्या चित्ररथाला आणि मार्चिंग तुकडीला मत देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

            प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष निमित्त राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात ब-याच अभिनव बाबींचा समावेश करण्यात आलेला. याचाच एक भाग म्हणून आणि सध्याची कोविड-19 ची पार्श्वभुमी बघता प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था कमी करण्यात आली आहे. मात्र, ऑनलाइन माध्यमातून थेट प्रक्षेपण बघता येईल.

            थेट प्रक्षेपण बघण्यासाठी MyGov पोर्टलवर (https://www.mygov.in/rd2022/) नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे. यासह प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या चित्ररथाला आणि मार्चिंग तुकडीला मतदान करता येईल, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.


०००००

Featured post

Lakshvedhi