Friday, 21 January 2022

 मान. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या नाना पटोले यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा

आ. अतुल भातखळकर यांनी केली समतानगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल"

मुंबईदि. 18 जानेवारी (प्रतिनिधी)

            मान. पंतप्रधान यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या नाना पटोलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी तक्रार भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी समतानगर पोलीस स्टेशनला केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुतळा जाळल्या नंतर आ. भातखळकर यांना अटक करण्यात आलीत्यावेळी ते समता नगर पोलीस ठाण्यातून बोलत होते.

            तसेच पंजाब राज्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतीत घडलेल्या घटनेचा व नाना पटोले यांनी “मी मोदींना मारू शकतो” या केलेल्या विधानाचा काही संबंध आहे कायाची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने केलीच पाहिजे अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी केली.

            नाना पटोले यांनी सोमवार दि.१७ जानेवारीला देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालातरी महाभकास आघाडी सरकारने याविरोधात नाना पटोले वर कोणतीही कारवाई केली नाही. परंतु यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्या नंतर मात्र त्यांना अर्धा तासाच्या आत अटक करण्यात आली. त्यामुळे या राज्यात सत्ताधारीनी काहीही केलं तरी त्यांना वेगळ्या न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय अशा प्रकारची हुकूमशाही या राज्यात सुरू आहे अशी टीका आ.भातखळकर यांनी ठाकरे सरकार वर केली. कांदिवली मध्ये नाना पटोले यांचा पुतळा जाळल्या प्रकरणी पोलिसांनी आ. भातखळकर यांना अटक केली असता विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार ठाकरे सरकार करत असल्याची ही टीका त्यांनी यावेळी केली.

            आ. भातखळकर यांनी समता नगर पोलिस ठाण्यात नाना पटोलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी असे तक्रार पत्र देखील दिले आहे. तसेच जर नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे सुद्धा आमदार भातखळकर यांनी यावेळी संगितले.

 ```

अमेरिकेला English मध्ये America

म्हणतात.

जपानला पण English मध्ये Japan

म्हणतात.

भूतानलाही English मध्ये Bhutan

म्हणतात.

श्रीलंकेलाही English मध्ये

Sri Lanka च म्हणतात.

बांग्लादेशला पण English मध्ये

Bangladesh म्हणतात.

नेपाळला English मध्ये Nepal च

म्हणतात.

इतकेच काय

आपल्या जवळच्या पाकिस्तानला

English

मध्ये Pakistan च म्हणतात.  

पण मग भारतालाच English मध्ये

India का म्हणतात?

तर

Oxford Dictionary नुसार

India हा शब्द

कसा आला याची ९९%

लोकांना माहिती सुद्धा नाही...

I - Independent

N- Nation

D- Declared

I - In

A- August

म्हणून इंडिया (India)

हे नाव

Dr.B.R Ambedkar यांनी दिले आहे

ह्या पोस्टला कृपया इतके शेयर

करा की, जास्तीत जास्त

भारतीयांना हे कळेल...```

 🇮🇳🇮🇳🇮🇳

Tuesday, 18 January 2022

 उर्दू शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबत प्रस्ताव सादर करावेत

- शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

·       गळतीचे प्रमाण कमी करण्यावर भर

 

            मुंबईदि. 18 :अल्पसंख्याक समाजामधील मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे अल्पसंख्याक विकास समितीच्या काही सदस्यांनी सूचना केल्यानुसार जेथे सातवीपर्यंत शाळा आहेत अशा संस्थांमधील शाळांची १२ वी पर्यंत वर्गवाढ करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. जेथे तातडीने मान्यता देणे शक्य आहेअशा शाळांमधील वर्गवाढीस मंजुरी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

            शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने अल्पसंख्याक समाजासंदर्भात शैक्षणिक धोरण ठरविण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधीशैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आदींसमवेत चर्चा करून याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रा.गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

            बैठकीस शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकीराज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक देवेंद्र सिंगउपसचिव समीर सावंतशिक्षण संचालक महेश पालकरबालभारतीचे संचालक के.बी.पाटीलविवेक गोसावी आदी उपस्थित होते.

            मराठी प्रमाणेच उर्दू भा‍षिक शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून द्वैभाषिक पुस्तके लागू करण्याची सूचनाही करण्यात आली होतीत्यानुसार पहिल्या इयत्तेत उर्दू आणि इंग्रजी अशी द्वैभाषिक पुस्तके प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावीतअसे निर्देश प्रा.गायकवाड यांनी दिले. अल्पसंख्याक संस्थांमधील मान्यताप्राप्त रिक्त पदांवर शिक्षक भरतीशिक्षकांचे समायोजन याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावेतअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००००


 

वृत्त क्र. 171

राज्याच्या कलापरंपरेचा जागतिक स्तरावर गौरव

- मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

·       दी फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

 

            मुंबईदि. 18 : राज्याला विविध कलांची मोठी परंपरा लाभलेली आहे. चित्रकलाशिल्पकला आणि छायाचित्रकला अशा सर्व कलांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. या कलापरंपरेचा देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये गौरव झालेला आहेअसे गौरवोद्गार मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी काढले.

            फोर्ट भागातील जहांगिर कलादालनात दी फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाचा सदस्यांनी टिपलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी भाषामंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार नृपेन माधवाणीफोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सुनील व्यासराजेंद्र वाघमारेसहसचिव शशांक नरसाळेपुरस्कार विजेतेछायाचित्रकार आणि कला रसिक उपस्थित होते.

            कलाकरांना  कलाकृतीचे प्रदर्शन करण्यासाठी जहांगिर कलादालनाने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या कलादालनात कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी निवड झालेल्या कलाकरांचे अभिनंदन करुन मराठी भाषा मंत्री श्री.देसाई म्हणाले,  प्रदर्शनातील छायाचित्र ही स्तब्ध करणारी आहेत. ही छायाचित्रे टिपण्याऱ्या छायाचित्रकारांचा दृष्टिकोन नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्कृष्ट कला एकाच ठिकाणी पहायला मिळते याचाही आनंद आहे. कलेची परंपरा आणि साधना पुढेही सुरु ठेवावीअसेही श्री.देसाई यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगिर कलादालनात झाले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना शक्य नसले तरी छायाचित्रकार म्हणून ही छायाचित्रे पाहून त्यांना नक्कीच आनंद झाला असताअसे श्री.देसाई यांनी सांगितले.

            यावेळी श्री. देसाई यांनी छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी करतांना छायाचित्रांच्या वैशिष्ट्यांची माहितीही घेतली.

            या छायाचित्र प्रदर्शन कार्यक्रमात श्री. देसाई यांच्या हस्ते दी फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाच्या 2019 ते 2021 या वर्षातील विजेते मिलिंद जोशीअमोद कुमारराजेंद्र वाघमारेमहेश आम्ब्रेशेखर मानगावंकरआशिष परब यांना छायाचित्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच भास्कर आठवले यांना लॅंडस्केप ट्रॅाफी तर गणेश उत्सवातील छायाचित्रांसाठी प्रोत्साहन बक्षीस श्रीमती सायली यांना देण्यात आला.

            फोर्ट येथील जहांगिर कलादालनात सुरू असलेले छायाचित्र प्रदर्शन दि. 24 जानेवारी 2022 पर्यंत सर्व कलारसिकांसाठी खुले आहे.

०००


 


Monday, 17 January 2022

Cycle tour

 


 *येथुन पुढे धर्मादाय अंतर्गतील सर्व रुग्नालयांना धर्मादाय हा शब्द नावात वापरणे बंधनकारक*

कार्यसम्राट आरोग्यदुत आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त आरोग्य निधी मिळवणारे एकमेव आमदार अॅड. राहुलदादा कुल यांच्या प्रयत्नाला यश.

पुण्यातील 56 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार.

पुणे शहरातील *रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल* ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्‍तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते.मुळात ही सर्व मोठमोठी

धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरुन मागे फिरतात.

याच गोष्टीची जाणीव ठेऊन आमदार राहुलदादा कुल यांनी वेळोवेळी विधान सभेमध्ये प्रश्न उपस्थित करुन, वेळोवेळी पाठपुरावा करुन शासनाला जाग आणुन दिली आणि आज अखेर या प्रयत्नाला यश आले आहे. याचा फायदा संपुर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार आहे.

उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजने पासून वंचित राहतात. पुढील काळात असे होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पुण्यातील 56 धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे.

शहरातील अनेक मोठ्या रुग्णालयांसह अशा 56 रुग्णालयांचा धर्मादायमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर धर्मादाय कार्यालयाचे नियंत्रण आहे. म्हणूनच याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत पुणे हॉस्पिटल असोसिएशनला डिगे यांनी आदेश दिले आहेत. या 56 पैकी नऱ्हे येथील नवले_रुग्णालयाने त्याची अंमलबजावणी केली असल्याची माहिती धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी दिली.


*राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू*

धर्मादाय शब्द लावण्या बाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. राज्यात एकूण 430 धर्मादाय रुग्णालये असून त्यांतर्गत दहा टक्के खाटा या 1 लाख 80 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी तर आणखी दहा टक्के खाटा या निर्धन 85 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत. आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये 50 टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने 2003 मध्ये एका निकालाद्वारे केली आहे.

राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे "धर्मादाय' हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल. वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल.

Featured post

Lakshvedhi