Saturday, 11 December 2021

 महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रस्तावित शक्ती कायदा प्रभावी ठरेल

                                         - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

            मुंबई, दि. 10 : अनेक महिलांना आजही विविध संकटांना सामोरे जावे लागते. महिलांनी आपल्या अधिकार आणि हक्कांबाबत जागृत रहाणे गरजेचे आहे. महिलांचे अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी असणाऱ्या कायद्यांबाबत विविध पातळ्यांवर जनजागृतीची गरज आहे.या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रस्तावित शक्ती कायदा प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

          स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिला हिंसाचारविरोधी पंधरवड्यानिमित्त “महिला सक्षमीकरण व महिलांची सुरक्षितता” या विषयावर चर्चासत्राचा समारोप झाला. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शक्ती कायद्याबाबत चर्चा करण्यात आली, त्यावेळी डॉ.गोऱ्हे बोलत होत्या.

              उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, महिलांना उद्भवणाऱ्या कौटुंबिक समस्या व त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात त्यांना वेळोवेळी समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडीत महिलेचे काय म्हणणे आहे हे ऐकले पाहिजे.महिला जेंव्हा अन्यायाबाबत सांगत असतात तेंव्हा याबाबत कोणत्या कायद्याद्वारे त्यांना न्याय, आधार मिळू शकतो, याबाबत कोणकोणत्या उपाययोजना करता येतील. यासंदर्भात त्यांना माहिती देणे गरजेचे असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

          प्रस्तावित शक्ती कायद्यांसंदर्भात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, समाज माध्यमांमधुन महिलांना धमकावणे व बदनामी करणे, समाजमाध्यम, इंटरनेट व मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे, यासारखे गुन्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. शिक्षेचा कालावधी वाढविला आहे. गंभीर प्रकरणी मृत्युदंड प्रस्तावित केला आहे. फौजदारी प्रक्रियेमध्ये बदल सुचविले आहे. या कायद्यामुळे महिलांना सुरक्षितपणे जगण्यासाठी न्यायाची शक्ती मिळणार आहे. साक्षीदारांना संरक्षण, मनोधैर्य योजनेची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी याद्वारेही प्रस्तावित शक्ती कायदा प्रभावी ठरेल असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

            या चर्चासत्रात स्त्री आधार केंद्राच्या अपर्णा पाठक यांनी केशरी दिवस संस्कृती व कार्यपद्धती याबाबत माहिती दिली.पोलीस अधिक्षक सोलापूर (ग्रामीण) तेजस्वीनी सातपुते यांनीही महिलांविषयी कायदे याबाबत माहिती देतानाच स्त्रियांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. आश्विनी शिंदे, प्रज्वला,गौतमी धावरे यांनी अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी कांबळे यांनी केले तर अनिता शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले.


00000



 ८.७२ आणि ६.९२ टक्के कर्जरोखेची परतफेड ११ जानेवारी रोजी

            मुंबई, दि. 10 : शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.७२ टक्के कर्जरोखे २०२२, व ६.९२ टक्के शासन कर्जरोखे २०२२ ची परतफेड दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती वित्तीय सुधारणाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

            वित्त विभागाच्या अधिसुचनेनुसार ६ जानेवारी २०१२ अनुसार ८.७२ टक्के आणि ६.९२ टक्के शासन कर्जरोखे २०२२ अदत्त शिल्लक रकमेची दिनांक १० जानेवारी २०२२ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल. या दिनांकास शासनाने सुट्टी जाहीर केल्यास कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी अधिदान कार्यालय करेल. या कर्जावर ११ जानेवारी पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरूपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागराकडे किंवा भारतीय स्टैट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जी त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास किंवा त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापि बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी ८.७२ टक्के आणि ६.९२ टक्के शासन कर्जरोखे २०२२ च्या धारकांनी लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावीत.

            भारतीय स्टेट बँक किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोख प्रमाणपत्राच्या स्वरूपात असल्यास ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेत.

            रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असले त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात किंवा उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करतील, असेही प्रधान सचिव यांनी कळविले आहे.


००००



 *मणिपूर चक्र आणि रामरक्षा---*                     

              *एक अभ्यास*                                                                         

हे चक्र नाभिस्थानाजवळ असते.                

ह्याला दहा पाकळ्या असून *सत्वगुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णु* याची अधिष्ठात्री देवता आहे.

२) शरीराचा मध्य बिंदू अर्थात *गुरुत्वमध्य* ह्याच चक्रात असतो. 

३) ह्या चक्रावर *धारणा* केल्याने चित्तात सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते.

४) *धारणा म्हणजे काय?* चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा...

*धारणा, ध्यान आणि समाधी या तीन्ही भिन्न गोष्टी आहेत.*

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर *धारणा म्हणजे concentration*... किंवा *एकाग्रता*

५) *चित्त शरीरांतील एखाद्या भागावर स्थिर ठेवण्याचा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय*

६) *महत्त्वाचं*--- एकदा आपल्याला आपल्या चक्रांचं शरीरातील स्थान माहीत झाले की त्या स्थानावर धारणा केली (त्या स्थानावर आपलं चित्त एकाग्र केलं) की त्या *चक्रावर ती धारणा* केली असं म्हणतात.

७) ज्या नाडीचक्रावर आपण चित्त स्थिर केलं (धारणा केली) की *त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे व्यापार सुसूत्रपणे चालू लागतात.*

उदाहरणार्थ , आपल्या शरीरातील खालील अवयव/ग्रंथी *मणिपूर चक्राच्या नियंत्रणाखाली असतात*(आणि याचे आपल्याला अजिबात ज्ञान नसते) ..

-Liver 

-Pancreas

-Small Intestine

-Kidney

- *Adrenal Gland*

-Gall bladder

*आता मणिपूर चक्र बिघडलं की त्यासंबंधीत होणारे रोग पाहू या*-----

-Indigestion

-Diabetes

-Acidity

-Ulcer

-Cholitis

-Appendicitis

-Kidney Stone

-Nephropathy.

मी वर उल्लेख केला आहे Adrenal Glands चा आणि त्याला bold केलं आहे... 

या glands खूप महत्त्वाचे हॉर्मोन्स निर्माण करतात त्यांचं नाव आहे--- adrenaline आणि  cortisol...  Adrenaline च़ level बिघडलं की खालील परिणाम होतात---- 

High Blood Pressure

High Blood Sugar

Depression

एखादी वाईट बातमी आली की आपले हृदयाचे ठोके वाढतात, बीपी वाढतं, भीति वाटते, excitement वाढते, anxiety वाढते.... *ते कश्यामुळे ?????* तर त्यावेळी आपल्या Adrenal Glands खूप उत्तेजित होतात म्हणून. *यालाच आपण म्हणतो पोटात खड्डा पडला किंवा छातीत धस्सं झालं.*

*हा आघात आपल्या मणिपूर चक्रावर होतो*, हृदयावर नाही... *पण त्याचे परिणाम हृदयावर होतात*

*मग ते pressure release करायला लगेचच आपल्या systems activate होतात... काही लोकांना लगेच urine pass होतं , काही लोकांना तर लगेच शौचास जावे लागते... *असं झालं की समजावं की तुमच्या systems व्यवस्थित काम करत आहेत.*

अश्या परिस्थितीत आपण लगेच *रामरक्षा स्तोत्र* म्हणायला सुरुवात करतो.... *खरं ना ?????*

*तर रामरक्षा च कां?*

मणिपूर चक्राचं बीज अक्षर आहे *रं*

*रं* चा वारंवार उच्चार केल्याने आपलं मणिपूर चक्र आहत होतं आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व इंद्रिये / ग्रंथी उत्तेजीत होतात... सोप्या भाषेत सांगायचे तर charge होतात व त्यातून निघणारा स्त्राव regulated/ नियंत्रित होतो... परंतु नुसतं एकसारखे *रं* म्हणत राहिलो की कंटाळायला होईल.... आपल्या ऋषीमुनींना याचं पक्क ज्ञान होतं.... *म्हणून त्यांनी रामरक्षा स्तोत्राची रचना केली*..

*रामरक्षेत किती वेळा *र* अक्षर येतं ते मोजून पहा... त्याची आवर्तनं केलीत तर किती वेळा *र* चा उच्चार होईल याची कल्पना करा !!!! मग किती वेळा आपलं मणिपूर चक्र आहत होईल याचा विचार करा. 

*परंतु आपण यांत्रिक पणे रामरक्षा म्हणत राहतो त्यामुळे जितका फायदा व्हायला हवा तितका होत नाही* ...... कारण आपण आधीच बघितलं आहे की कुठल्याही चक्राला *activate करायचं असेल तर त्याच्यावर *धारणा* करायची असते... 

*आपण रामरक्षा म्हणताना डोळे मिटून मणिपूर चक्रावर आपलं चित्त एकाग्र केलं तर निश्र्चितच आपलं चक्र activate होईल आणि सतत *र* अक्षराच्या उच्चाराने *निर्माण होणारी energy , त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे शुद्धीकरण व बळकटीकरण करेल... परिणामी त्याला संलग्न असलेले आजार पण मिटतील.*

यापुढे  रामरक्षा म्हणण्यापूर्वी -

*१)एका जागी स्वस्थ बसा*

(घरात इकडे तिकडे डुलत डुलत, घरातली कामं करताना, स्वयंपाक करताना रामरक्षा म्हटली तर त्याचा मणिपूर चक्रावर काहीच सकारात्मक परिणाम होणार नाही)

*२) डोळ्यासमोर श्रीरामाची मूर्ती आणा ,*

*३) मणिपूर चक्रावर चित्त एकाग्र करा...*

*४)  नंतर रामरक्षा पठण सुरु करा*

*५) ९० दिवसांत आपल्या मणिपूर चक्राशी संबंधित organs वर काय positive फरक वाटतोय ते observe करा....*

*टीप: ---* 

*योग, मेडीकल सायन्स आणि अध्यात्म असा हा समन्वय आपणास कुठल्याही पुस्तकात रेडीमेड मिळणार नाही..*. परत परत हा लेख वाचून समजून घ्या आणि अंमल करा....🙏🏻🙏🏻🙏🏻 

*दत्त प्रभु आपणास सर्वांना उत्तम स्वास्थ्य देवो हीच माझी प्रार्थना*

*श्री गुरुदेव दत्त*.                                                                                     🖕माझ्या वाचनात आलेली सुंदर माहिती...‌‌.

Friday, 10 December 2021

 'दिलखुलास' कार्यक्रमात

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची मुलाखत

            मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित - 'दिलखुलास' या कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या अॅपवर सोमवार दि. १३, मंगळवार दि. १४ आणि बुधवार दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शासनाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षातील सामाजिक न्याय विभागाची वाटचाल, विद्यार्थी व दिव्यांगांसाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय, बार्टी या संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम, सफाई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, ग्रामीण व शहरी भागातील गाववाड्यांना समताधिष्ठित नावे देण्याचा निर्णय तसेच ज्येष्ठ नागरिक व तृत्तीयपंथीयांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय आदी विषयांची सविस्तर माहिती मंत्री श्री. मुंडे यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.


०००००

 पर्यटन अनुभव संस्मरणीय करण्यासाठी एमटीडीसी सज्ज

            मुंबई, दि. 10 : वातावरणातील गारवा आणि पर्यटकांची ओढ लक्षात घेऊन नववर्षानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदीरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, आयुर्वेदीक आणि नैसर्गिक अप्रतिम खाद्यपदार्थांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ सज्ज झाले आहे. कोविडसंदर्भातील शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून पर्यटकांच्या आरोग्याचीही खबरदारी घेण्यात येत असल्याने पर्यटकांनी महामंडळाच्या साथीने मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा प्रसंग संस्मरणीय करावा, असे आवाहन महामंडळाच्या पुणे प्रादेशिक विभागामार्फत करण्यात आले आहे.

            पर्यटनासाठी पूरक वातावरण पाहता पर्यटक निसर्गाकडे धाव घेत आहेत. त्यांच्या सोयीसाठी महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे / रिसॉर्ट खुली असून पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्यासाठी तत्पर आहेत. योगा आणि वेलनेसची शिबिरे घेण्याचे प्रस्तावित असून स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपरिक खेळ इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

            पर्यटक निवासांमध्ये छोटेखानी मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम पर्यटकांच्या सेवेत सादर करण्याचाही महामंडळाचा मानस आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर महामंडळाने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून जवळपास दोन वर्षानंतर पर्यटकांना निखळ पर्यटनाचा, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांचीही माहिती वेबसाईट, फेसबूक आणि व्हॉट्सॅप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

            पर्यटक निवासांमध्ये निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना अव्याहतपणे सुरू असून निवास, उपहारगृहे आणि अनुषंगिक बाबींची काटेकोरपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे, ऑक्सीमिटर, मुखपट्टी, हातमोजे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महामंडळाच्या पर्यटक निवासांना पर्यटक प्राधान्य देत असून डिसेंबरमध्ये महामंडळाच्या पर्यटक निवासांचे 90 टक्के आरक्षण झाले आहे.

            पर्यटकांनी निसर्गाचे आणि कोविडविषयक भान ठेवून पर्यटनाचा, नववर्ष स्वागताचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.


०००००







Loksanskuti


 


 

Featured post

Lakshvedhi