Friday, 3 December 2021

 ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाश्यांसाठी आणखी कठोर निर्बंध 

            मुंबई, दि. 2 :- दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही राष्ट्रांमध्ये कोविड-१९ चे ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमिवर तसेच त्या विषाणूंना “चिंतेची बाब” (Variant of concern) म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घोषित केल्याने महाराष्ट्र शासनाने हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहे.

            यासंदर्भात नवीन निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत -

            अ -भारत सरकारने वेळोवेळी लादलेले निर्बंध व निर्गमित केलेली मार्गदर्शक सूचना हे न्यूनतम निर्बंध म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत हवाई प्रवाशांसाठी लागू असतील.

            ब- दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि झिंबाब्वे या राष्ट्रांना “हाय रिस्क” अर्थात उच्च जोखीम असलेले राष्ट्रांच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे

            क -उच्च जोखीम असलेले राष्ट्रांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय हा ओमायक्रॉन विषाणू आढळल्यानंतर सध्या परिस्थितीच्या आधारे घेण्यात आलेला असून महाराष्ट्र शासनाला आवश्यकतेनुसार त्याचे अद्यतन करता येईल.

            ड -खालील वर्गात मोडणाऱ्या हवाई प्रवाशांना उच्च जोखीम असलेले हवाई प्रवासी म्हणून घोषित करण्यात येईल-

उच्च धोका असलेल्या राष्ट्रांमधून महाराष्ट्रात दाखल होणारे सर्व हवाई यात्रेकरू.

असे हवाई प्रवासी की ज्यांनी महाराष्ट्रात दाखल होण्याच्या अगोदर 15 दिवसात उच्च जोखीम असलेल्या राष्ट्रांना भेट दिलेली आहे.

            ई -भारत सरकारने पूर्वीच लादलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त केवळ उच्च धोका असलेल्या हवाई यात्रेकरूंसाठी खालील निर्बंधही लागू असतील:-

      “उच्च जोखीम असलेले हवाई प्रवाशांना प्राधान्यक्रमाने स्वतंत्र काउंटरवर उतरण्यासाठी वेगळी व्यवस्था तेथील विमानतळ व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत केली जाऊ शकेल, जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या तपासण्या आणि पडताळणी करणे सोपे व्हावे. अशा सर्व हाय रिस्क हवाई प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच तात्काळ आर टी पी सी आर चाचण्या कराव्या लागतील आणि सात दिवस सक्तीच्या संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. त्यांची दुसरी आर टी पी सी आर चाचणी सात दिवसाच्या कालखंडानंतर करण्यात येईल.

            या चाचणीत जर कोणीही पॉझिटिव्ह आढळलयास अश्या हाय रिस्क प्रवाशांना कोविड उपचाराच्या सुविधा असलेल्या इस्पिताळात दाखल करण्यात येईल आणि जर सातव्या दिवशी घेतलेल्या आर टी पी सी आर चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास अशा उच्च जोखीम असणाऱ्या हवाई यात्रेकरूंना सात दिवसांसाठी गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल.”

            फ- उपयुक्त (इमिग्रेशन) तसेच एफ आर आर ओ यांना असे निर्देश देण्यात आले आहे की, विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाद्वारे येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांनी मागील पंधरा दिवसात ज्या- ज्या देशांना भेटी दिलेल्या आहे, त्यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करावे.

            त्याचप्रमाणे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एम आय ए एल) ला ही असे निर्देशित करण्यात आले आहे की, त्यांनी मागील पंधरा दिवसात हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती सर्व एयरलाईन्सकडेही द्यावी जेणेकरून या प्रवाशांच्या यात्रेसंबंधी माहितीची पडताळणी करणे सोपे होईल. प्रवाशांनी जर चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005 च्या विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल.

            ग- देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्या सर्व यात्रेकरूंना पूर्णपणे लसीकरण केले असणे आवश्यक आहे. असे नसेल तर त्यांच्याजवळ आगमनाच्या ७२ तासाअगोदरचे आर टी पी सी आर ‘निगेटिव’ अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.


****

Thursday, 2 December 2021

] Mahendra Gharat: मा. जिल्हाधिकारी रायगड, यांच्या सौजन्याने जिल्ह्यातील हुशार होतकरू परतुं आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा सर्व संवर्गातील युवक – युवतींकरिता शासकीय सेवांमध्ये प्रवेश सुलभ व्हावा याकरिता दीर्घकालीन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचे नियोजन आहे. सदर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे प्रत्यक्ष तसेच दूरस्थ दृक्श्राव्य माध्यमातून विविध सेवेमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी, विविध विषयांचे तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रस्तुत कार्यक्रम प्रत्येक आठवड्याच्या शनिवार आणि रविवार या दोन दिवसाकरिता असेल. सदर कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक गावात, दुर्गम वाडी वस्ती पर्यंत पोहचावा करिता. प्रत्येक तलाठी कार्यालयाने प्रस्तुत कार्यक्रमाची गावात प्रसिद्धी द्यावी, तसेच गावातील होतकरू युवक – युवतींचे नाव नोंदणी करावी.

[] Mahendra Gharat: *स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून पेण येथे "गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र" होणार सुरू*

*प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी व रविवारी हे केंद्र असणार सुरू*

 *अलिबाग,जि.रायगड,दि.1, (जिमाका):-* महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शनिवार, दि.4 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता "गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र" सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी व रविवारी हे मार्गदर्शन केंद्र सुरू असणार आहे. या मार्गदर्शन केंद्रामध्ये शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

     जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण येथील भाऊसाहेब नेने कॉलेज हॉल येथे हे केंद्र सुरु होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि.2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या मार्गदर्शन केंद्राचा लाभ मिळणार आहे.

    तसेच कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांना पेण येथील या केंद्रावर हजर राहणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांसाठी ते राहत असणाऱ्या तालुक्यातील तहसीलमध्ये दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय या स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी जिल्ह्यातून अधिक प्रतिसाद मिळाल्यास जिल्ह्यात अन्य तालुक्यांमध्येदेखील अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल, असा मानस जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे

     तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या केंद्रातील सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा raigadcomp@gmail.com या ईमेल वर अर्ज सादर करून या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.


00000

 शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा;


विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार


पीक विमा आढावा बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा इशारा

          मुंबई, दि. 2 : खरीप 2020 च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नावर शासन अतिशय गंभीर असून 'पाहू, करु' अशी भूमिका घेऊन चालढकल करणाऱ्या आणि विम्याचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्यास विमा कंपन्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही कृषिमंत्र्यांनी दिला आहे.

          प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये गेल्या तीन वर्षात विविध विमा कंपन्यांनी केलेल्या कार्यवाहीचा मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आढावा घेतला. या बैठकीला कृषि विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार यांचेसह आयसीआयसीआय लोम्बार्ड, रिलायन्स, इफ्को टोकियो, एचडीएफसी एर्गो, बजाज अलियांझ, एआयसी ऑफ इंडिया या विमा कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

          पीक विम्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 84 लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले असून त्यापोटी 2312 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. 1842 कोटी रुपये नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली असून त्यापैकी फक्त 994 कोटी रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली आहे. पिकांचे सर्वेक्षण झाले तरी नुकसानभरपाई निश्चित करणे बाकी असून सर्व विमा कंपन्यांनी याची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या. मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये विम्याच्या संदर्भात 23 जिल्ह्यांनी अधिसूचना काढल्या असून या जिल्ह्यात 425 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, ही नुकसानभरपाईची रक्कम तातडीने देण्याची कार्यवाही विमा कंपन्यांनी करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले. यावेळी कृषिमंत्री श्री.भुसे यांनी नाशिक आणि जळगावच्या जिल्ह्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

          खरीप 2020 च्या हंगामासाठी राज्यातील 1 कोटी 7 लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकरी आणि राज्य-केंद्र अनुदानाचा हिस्सा मिळून सुमारे 5 हजार 2017 कोटी रुपये विमा हप्ता द्यावयाचा होता, त्यापैकी साडेतीन हजार कोटी रुपयांचा प्रथम हप्ता विमा कंपन्यांना देण्यात आला आहे. या खरीप हंगामात नुकसान भरपाईची 1068 कोटी रुपये रक्कम निश्चित करण्यात आली असून 844 कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित 223.35 कोटी रुपये तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश कृषिमंत्री श्री. भुसे यांनी या बैठकीत दिले. या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे एनडीआरएफअंतर्गत केलेले पंचनामे गृहित धरुन विमा कंपन्यांनी विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची भूमिका श्री. भुसे यांनी यावेळी मांडली. रब्बी हंगामाची नुकसानभरपाई अद्याप निश्चित झालेली नसून वर्षभरात सुमारे 5 हजार 800 कोटी रुपयांचा विमा हप्ता भरल्याचेही त्यांनी सांगितले. बुलडाणा जिल्ह्यात विमा रक्कम मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या असून हा प्रकार अतिशय गंभीर आहे. संबंधित विमा कंपनीने याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी कृषिमंत्र्यांनी दिले.

विम्यासंदर्भातील कामकाजात सुधारणा करावी - कृषिमंत्री

          विमा कंपन्यांकडून पीक विम्याची रक्कम न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. विम्याच्या रकमेमुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्यास त्या जिल्ह्यातील संबंधित विमा कंपन्यांना जबाबदार धरण्यात येईल. त्याशिवाय नुकसानभरपाई देण्याच्या निर्देशांचे पालन केले

 *कोरोनामुळे मृत्यू: नातेवाईकांना सानुग्रह सहाय्याच्या ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ विकसित*


ठाणे, दि.२: कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता यावे याकरिता राज्य शासनाने वेब पोर्टल विकसीत केले असून अर्जदाराने mahacovid19relief.in वर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दि. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्देशानुसार कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याबाबत महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन निर्णय जाहिर केला. त्यानुसार ऑनलाईन वेब पोर्टल विकसित केले असून त्याद्वारे कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगईन करणे आवश्यक आहे. https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे. 

*अर्ज करण्याची प्रक्रिया आणि लागणारी कागदपत्रांची माहिती:* अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील त्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे अर्जदाराचा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगईन करता येईल.

कोरोनामुळे मृत्यू झाला अशी केंद्र शासनाकडे ज्यांची नोंद झाली असेल अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोरोना मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ट्यर्थ कागदपत्रे अर्जासोबत द्यावी लागतील. 

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावरअर्जदारास जिल्हा, महानगरपालिका स्तरावर गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील.

अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज सात दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधारसंलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.

००००

Bhartiya arithmetic

 *अद्भूत*


गणितात कोणतीही संख्या १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्याने भागता येत नाहीत, पण ही एक संख्या अशी विचित्र आहे की जगातले सर्व गणितज्ञ आश्चर्याने चकित झाले. ही संख्या भारतीय गणितज्ञांनी आपल्या अचाट बुद्धीने शोधली...!

ही संख्या - २५२० पहा. ही इतर अनेक संख्यांपैकी एक आहे असे दिसते पण वास्तव्यात मात्र तसे नाही, ही अशी संख्या आहे जगातील अनेक गणितज्ञांना थक्क करून सोडले !

ही विचित्र संख्या १ ते १० यापैकी प्रत्येक संख्येने भाग जाणारी आहे, ती संख्या सम वा विषम असली तरीही. ह्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी शून्यच रहाते. खरोखरच ही अद्भूत व अशक्य अशी संख्या वाटते ! आता पुढील टेबल पहा, वरील विधानाची सत्यता स्वतः अनुभवा.

2520 ÷ 1 = 2520

2520 ÷ 2 = 1260

2520 ÷ 3 = 840

2520 ÷ 4 = 630

2520 ÷ 5 = 504

2520 ÷ 6 = 420

2520 ÷ 7 = 360

2520 ÷ 8 = 315

2520 ÷ 9 = 280

2520 ÷ 10 = 252

२५२० या संखेचे रहस्य [ ७ × ३० × १२ ] या गुणाकारात दडले आहे.

भारतीय हिंदू संवत्सरच्या अनुषंगाने या २५२० संखेचे कोडे उलगडते,जे या संखेचे गुणाकार आहे. 

एक आठवड्यांचे दिवस (७), एका महिन्याचे दिवस (३०) व एका वर्षाचे महीने (१२)

[७×३०×१२=२५२०]

हेच आहे भारतीय कालगणनेचे वैशिष्ट्य व श्रेष्ठत्व !

*भारतवर्षाने विश्वाला निरपेक्षतेने ज्ञान दिले नव्हे नव्हे ज्ञानभांडार दिले . विज्ञानाचा उत्तुंग अविष्कार म्हणजे भारतीय संस्कृती !! ज्ञानदानाने ज्ञान वाढते या दृढ विश्वासामुळे आपल्या ऋषीनी(शास्त्रज्ञानी *पेटंट्स* *घेतले नाहीत . म्हणुन त्यांचे महत्व कमी होते का? बील्कुल नाही . पुर्वसुरीनी हे आपल्यासाठी जे संचित ठेवलेय त्याचा नुसता पोकळ अभिमान न बाळगता या प्रगल्भ संस्कृतीचा प्रसार होणेसाठी या अशा बाबी शोधुन;अभ्यासुन ;वैज्ञानिक कसोट्यांवर पुन: एकदा घासुन/तपासुन प्रसारायला हव्यात .

भारतवर्ष जगाचा गुरु आहेच म्हणुन आपली जबाबदारीही वाढते हे लक्षात घेवुन दिवसातील किमान काही वेळ तरी संस्कृतीचा (काही लोक यास हिंदु/वैदिक धर्म असे संबोधुन त्यास मर्यादा घालतात) 

अभ्यास/ अध्ययन करावे ; बघा आनंद मिळेल .

साभार - 

अप्पा पाध्ये गोळवलकर ;

गोळवली;कोंकण .

@८७६७०७१७०५

 



 *ज्यांना* *ज्यांना* *आई* *आहे* *मग* *ती* *तरुण* *असो* *किंवा* *वृद्ध* *त्या* *सर्वांनी* *मुद्दाम* *खालील* *लेख* *वाचून* *तसे* *आचरण* *करण्याचा* *प्रयत्न* *करावा* *हीच* *अपेक्षा* *!*         

                                       

 पेशाने सर्जन असणा-या मुलाने लिहिलेला अतिशय सुंदर लेख -


              बीजांड ते ब्रह्मांड


वयोपरत्वे तोल जाऊन पडल्याने आई अंथरुणाला खिळली ती कायमच

सर्व अवयव नव्वदीतले. 

झिजलेल्या कंबरेवरचा मुक्कामार तिला कायमचा परावलंबी करून गेला. 

पाय उचलणं सुद्धा अशक्य झालं.

तिच्या संवेदना कमी झाल्याने सगळे सोपस्कारही कपड्यातच. 

वृद्धत्व सोडून दुसरा आजार नव्हता. 

पण म्हातारपण म्हणजे सुकून जिर्ण झालेलं बालपण. 

तोच हटवाद आणि वागणंही तसंच लहरी. 

सल्ला मसलतींचा पाउस पडला. 

लाख मोलाच्या आईसाठी काही हजाराची केअरटेकर... 

मनाला पटेना.

अनेक पर्यांयांचा उहापोह झाला. 

आम्हा दोघांची कामं अत्यावश्यक सेवेतली. 

सलग सुट्ट्यांचा दुष्काळ.

मग मीच ठरवलं केअरटेकर व्हायचं. चिडक्या हट्टी म्हातारबाळाची आई व्हायचं.

   लाळेरं लावून सकाळी चमच्याने पाजलेला चहा. 

दमदाटी करत भरवलेलेचे चिऊ काऊ चे घास. 

कधी ठसका, कधी मळमळ तर कधी उलटी... 

बहाणेच बहाणे.

पेशाने सर्जन, मलमुत्र रोगांशी जुनी दोस्ती. त्यामुळे संकोच सोडणं सोपं गेलं. 

डोळे मिटून घेण्याशिवाय तिच्या संकोचाला पर्यायच नव्हता.

वेळोवेळी डायपर बदलून, अंग पुसून, पावडर लावून कपडे घालण्यापासून तेल लावून वेणी फणी करण्यापर्यंत सगळं.

दिवसातून दोन तीनदा घर ते हाॅस्पिटल.

हाॅस्पिटल ते घर अप-डाऊन.

धावपळ होत होती; पण थकवा आला तरी जाणवत नव्हता. 

तिच्या प्रत्येक हाकेमुळे मनातल्या मनात माझाही पान्हा फुटत असावा. 

मनाच्या कुठल्यातरी पातळीवर कधीही न मिळालेलं समाधान अनुभवत होतो. 

*कुठल्याही कळा न सोसता मला तिचं आईपण मिळालं हे माझं किती मोठं भाग्य होतं.* 

पण फार काळ नाही. 

काही महिन्यांची सेवा आणि एका प्रसन्न सकाळी माझ्या हिरकणी ने गड सोडला.

मी माझं कर्तव्य समजून तिची सेवा केली. कुणीतरी म्हणालं पुण्य कमावलंस. 

त्यांचं खरं असेल तर हे छोटंसं पुण्य चित्रगुप्ताच्या डायरीतील माझं पान भरायला पुरेसं होईल.

देव आणि आई एकाच नाण्याच्या दोन बाजू.

देव खाली येऊ शकत नाही म्हणून आईला पृथ्वी वर पाठवलं। असं कुठंतरी वाचलेलं. त्या वाक्याचा प्रत्यय यावा अशी आपली आई.

रामची असो की शामची.

कैकयी असो की गांधारी.

आई सगळ्यांची सारखीच.

शरीराने आणि मनाने आपल्या गूढ देवराई तील शक्ती देवता. 

फक्त आपल्या भल्यासाठीच तिच्या ओंजळीतली माया रिकामी करणारी लक्ष्मी.

प्रत्येकाच्या छोट्याशा आकाशातील अढळ स्थानावरील ध्रुवतारा. तिचं गुरुत्वाकर्षण तर पृथ्वीपे‌क्षाही भारी. खालून वर नेणारं.

*बिजांडातून ब्रम्हांडात पोहचवणारं.*

तिच्या बिजांडात अंकुरलेला सुक्ष्म कोंब म्हणजे आपण.

एक दशांश मि.मि.पेक्षाही लहान. गर्भाशयाच्या भिंतीवर ‌मुळं पसरून, तिचंच रक्त शोषून तगणारं बांडगुळ.

मधेच केव्हातरी पारंबी फुटावी तशी नाळ फुटते बेंबीतून. 

त्यातून मिळणाऱ्या खतावर कोंबाचं रोपटं होण्याची सुरूवात होते.

चैत्राच्या पालवी सारखे हळूहळू फुटलेले कोवळे कोवळे अवयव. तिचीच उर्जा घेऊन सुरू झालेली इंजिनं... 

आदिपासून अंतापर्यंत अव्याहत पळणारी.

  नव्या फुफ्फुसाचा पहिला श्वास आणि नव्या ह्रदयाचा पहिला ठोका तिच्याच मालकीचा. 

नॅनोग्रॅम पासून ते किलोग्राम पर्यंतची वाढही तिच्याच कोठारातील.

कणाकणानं वाढणारं ओझं घेऊन तोल सांभाळणारा कणखर मणका. 

कितीही वाकला तरी पोटातल्या गोळ्याला सुरक्षित वाहणारा. 

लाथा मारणारं बाळ, आणि लाथा मारणारी परिस्थिती, दोघांना झेलत तारेवर झूलणारी डोंबारीण.

नऊ महिने नऊ दिवसांची कसरत. 

ढोलकं बडवायला नवरा आणि टाळ्या पिटायला ढिगभर जमाव. 

पण मदतीसाठी थाळी फिरवली की सगळ्यांचं घुमजाव.‌

बाळनिवासाच्या पायाभरणीत फिक्कट करणारे दिवस. 

धापा टाकत टाकत केलेलं रांधा वाढा, उष्टी काढा. 

सुजून जडावलेले पाय आणि वाढलेले श्वास म्हणजे घटीका भरल्याची नांदीच.

चंद्र, ग्रह, तारे बाळाच्या कुंडलीत स्थिरावले, कि सुरू झालेल्या प्रसव कळा.

खोल, गूढ,अगम्य कृष्ण विवरातील वादळ.

सुरुवातीला समुद्राच्या हळुवार लहरींचे हिंदोळे. 

नंतर याच लहरींवर स्वार झालेल्या भरतीच्या धडका. 

एकामागून एक. 

बाळाच्या ओढीने वाढलेल्या कळा जणू चंद्रासाठी उसळणाऱ्या पौर्णिमेच्या लाटा. काही सौम्य काही रौद्र. 

उरल्या सुरल्या शक्तीला मुठीत घट्ट आवळून घेतलेल्या, कळांवर कळा...

प्राण पुरवणारा वार जागा सोडण्यासाठी भिंतीपासून विलगू लागतो.

मुळापासून विस्थापित होण्याच्या भितीने बाळही अस्वस्थ होऊ लागते.

अशुभ संकेतांची टिटव्यांची टिवटिव.

गुदमरणाऱ्या बाळासाठी, खचलेला धीर मुठीत आवळून एक जोराची किंकाळी आणि निकराची एक शक्तीशाली कळ.

किनारा चिरणाऱ्या पाण्याच्या लोंढयात तरंगत आलेलं आणि दाईने झेललेलं गोंडस बाळ.

मातेने सोसलेल्या यातनांना बाळाने रडून दिलेली दाद, म्हणजे बाहेरच्या जगातला पहिला श्वास.

दुपट्यातल्या सुखाला उराशी कवटाळून अमृतकुंभाला शोधणाऱ्या अधाशी ओठांना कौतुकाने पाहणारे आईचे डोळे.

फुटलेल्या पान्ह्यातून गळणारे थेंब वेदनांचा निचरा करत बाळाच्या ओठांवर विसावले की, अमृताच्या अभिषेकात न्हाऊन तिच्या काळजाचा तुकडा झोपी जातो.

माता कुराणातील असो वा पुराणातील. तिचं वात्सल्य कुणालाही नतमस्तक करणारं.

अनुसया असो कि आदिती.

दिगंबराची असो किंवा पैगंबराची.

*आई शेवटी आईच असते.*

जन्माला आलेल्या बाळासाठी तिचं त्याचं नातं अद्वैत. 

तिने शुन्य बॅलन्स वापरून उधळलेली अनमोल ममता.

त्यामुळे त्याच्या उत्पन्नात वाढणारा प्रत्येक मोठा आकडा तिच्या ममतेशी गुणला की शुन्यच. 

जगभर फिरला, पण तिच्या उपकारांची परतफेड करणाऱ्या वस्तूंचा मॅाल नाही दिसला.

डेबीट कार्ड, क्रेडिट कार्ड, पास बुकं ही या नात्यात फक्त कागदं आहेत. 

आईचं कर्ज फेडण्या इतका त्यात बॅलन्स कुठे आहे ?

या ओझ्यातून किंचित मुक्त होण्याचा एक मार्ग... 

एक उतराई... 

शक्य असेल तर जरूर बना

                *आईची आई...*

-🍁🌹🍁🌹🍁🌹🍁🌹🍁

Featured post

Lakshvedhi