सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 2 December 2021
*तवा माणूस माणसात होता*
घरात टि.व्ही चं खोकं नव्हतं...💐
मोबाईल मध्ये डोकं नव्हतं...💐
काचा कवड्याचा खेळ होता..
गुटक्यानं भिती रंगत नव्हत्या...💐
ब्युटी पार्लरमध्ये झिंगत नव्हत्या...💐
ओठांवर ओरीजनल लाली होती...💐
चंद्राची खळी गाली होती...💐
पोरी मोबाईलवर गात नव्हत्या...💐
शाळेतुन पळून जात नव्हत्या...💐
वाकडा भांग पाडत नव्हत्या...💐
तोंड बांधून हिंडत नव्हत्या...💐
वाघासारखा लेक होता...💐
तवा बाप माणसात होता...💐
राजकारणात निष्ठा होती...💐
खरं बोलणाऱ्याची चेष्टा नव्हती...💐
पैशावर पुढारी फुटत नव्हतं...💐
तत्वाशिवाय गटत नव्हतं...💐
प्रेम-माया अटत नव्हती...💐
चांगली माणसं तुटत नव्हती...💐
चहा-चिवड्याला रडत नव्हती...💐
*चोरुन पिल्याबिगर चढत नव्हती*...💐
आडाणी नेता भानात होता...💐
तळातला कार्यकर्ता मनात होता...💐
सोसायटीचा चेअरमन रानात होता..
तवा माणुस माणसात होता...💐
गावा शेजारी बार नव्हता...💐
रस्त्यावर दारुड्याचा कार नव्हता...💐
पाठीवर दफ्तराचा भार नव्हता...💐
अनवाणी पायाला रस्ता गार होता.💐
हातावर छडीचा मार होता...💐
शाळेचा मास्तर दिलदार होता...💐
तवा पैशाला किंमत नव्हती...💐
आयुष्य म्हणजे गंमत नव्हती...💐
घासाघासात कस होता...💐
माणसाच्या वागण्यात रस होता...💐
*तवा माणुस माणसात होता...*
👆 🙏🙏🙏🙏
Gele te din gele
सारे सारे निघून गेलेत.....
*कहीं दूर, कहीं दूर*
लता,आशा आता गात नाहीत..
भीमसेन, कुमारचे सूर हरवलेत..
शिवकुमार, हरिप्रसाद ही आता केव्हातरी..
आर डी, लक्ष्मी-प्यारे शांत झालेत..
कपिल, गावस्कर, तेंडुलकर आता खेळत नाहीत..
प्राण, कादर खानची दादागिरी संपली आहे..
अमिताभही आता फाइटिंग करत नाही..
रेखा, हेमा, झीनत, सा-यांचं सौंदर्य संपून गेलंय..
अटलजींचं ओघवतं हिंदी..
बाळासाहेबांची शिवाजी पार्कवरची गर्जना..
इंदीवरच्या गाजलेल्या मैफिली..
जगजीत, मेहंदीचा दर्दभरा आवाज..
रफी, किशोरची हृदयातली साद..
मुकेशचं कारुण्य, मन्ना डेचा पहाड़ी सूर..
सारे सारे निघून गेलेत
*"कहीं दूर, कहीं दूर"*
रेश्माची तानही विरून गेली आहे..
तलतची मखमल विरून गेली आहे..
पुलंचं मिश्किलपणे गोष्टी सांगणं..
बापट, विंदा, पाडगावकरांचं कविता ऐकवणं..
शंकर पाटीलांच्या गावरान गप्पा व दमांची मिरासदारी संपलीय..
हृदयनाथ, ग्रेसच्या अविस्मरणीय मैफिली..
पल्लेदार संवादांनी जिवंत झालेला काशीनाथ घाणेकरांचा संभाजी..
कडक, शिस्तप्रिय तरीही प्रेमळ, हवासा सतिष दुभाषींचा प्राध्यापक..
आणि भक्ति बर्वेंची 'ती फुलराणी'..
नंदू भेंडेंने जिवंत केलेला
पु.लंचा 'तीन पैशाचा तमाशा'..
डॉ. आगाशेंचा 'घाशीराम कोतवाल'..
विजयाबाईंचं 'हमिदाबाईची कोठी' व 'बॅरिस्टर'..
जब्बारची 'अशी पाखरे येती' आणि 'सिंहासन'..
सिंहासनमधली लागू भटांची जुगलबंदी..
सामनामधली लागू फुलेंची आतिशबाजी..
'पुरुष' मधला राकट नाना..
चिमणराव प्रभावळकर
आणि गुंड्याभाऊ कर्वे..
'गज-या'तले आपटे..
'प्रतिभा आणि प्रतिमा'ची सुहासिनी मुळगावकर..
आकाशानंदांचा 'ज्ञानदीप',
तबस्सुमचं 'गुलशन गुलशन'..
'आवाज़ की दुनिया का दोस्त' अमीन सयानीचा दर बुधवारचा *आज पहली पायदान पर हैं*
म्हणत हृदयाला हात घालणारा आवाज..
रविवारचा विविधभारती वरचा 'एस. कुमार का फिल्मी मुक़दमा'..
आणि रेडियो सीलोन वरचा सैगलचा समारोप स्वर..
दर एक तारखेला न चुकता लागणारं किशोरचं 'दिन हैं सुहाना आज पहली तारीख हैं' म्हणून आठवण करून देणं..
तल्यारखान, लाला अमरनाथचा कानात प्राण आणून ऐकलेला क्रिकेटचा *आँखों देखा हाल*..
आणि black and white मध्ये बघितलेली 1983 ची क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल..
कॉलेज बंक करुन पाहिलेले मिथुनचे हाऊसफुल्ल पिक्चर..
झीनतची कुर्बानी..
अमिताभ-शत्रुचा दोस्ताना..
धर्मेन्द्रचा ओरिजिनल ढाई किलो का हाथ..
जीतेन्द्र-श्रीदेवीचे आचरट विनोद..
अमजद-कादर-शक्तिकपूरची विचित्र विनोदी व्हिलनगिरी..
राजेश खन्नाचा रोमँटिक अंदाज..
थिएटरमधली वीस वीस आठवडे ओसंडणारी गर्दी,
ब्लॅकमधे टिकिट घेताना
केलेली मारामारी..
सर्व काही आता इतिहासजमा होऊन गेलं,
आठवणींच्या कप्प्यात मात्र सुरक्षित राहून गेलं..
ऊर फाटेस्तोवर धावून
*फर्स्ट डे फर्स्ट शो* पाहणं नाही..
आता सतराशे साठ चॅनल्सवरुन चोवीस तास सिनेमे आणि मनोरंजन कोसळत असतात..
पण त्यामधे आता ती पूर्वीची हूरहूर अन् अप्रूप नाही..
खूप वेळ प्रयत्न करुन एकदाचा *तिने* उचललेला फोन नाही..
तिच्या बापाने नाहीतर भावाने फोनवरुन दिलेल्या शिव्या नाहीत..
फेसबुक, व्हाट्सएप, एस एम् एस आणि मोबाइलच्या जमान्यात टेलीफोनची गम्मत नाही..
तासनतास बिल्डिंगखाली उभं राहून वाट पाहणं नाही..
मनातलं कळवण्यासाठी
रात्र रात्र जागून पत्रं लिहिणं नाही..
सेकंदात फेसबुकवर अपडेट होण्याच्या जमान्यात पत्राची वाट पाहण्यातली आतुरता आणि मजा नाही..
हातातून निसटून गेलेल्या वाळूच्या कणांसारखं हे सारं केव्हा निसटून गेलं ओंजळीतून खरं तर कळलंही नाही..
पण आयुष्याच्या उत्तरार्धात हे सारं आठवताना खुदकन हसतो भूतकाळाच्या हिंदोळ्यावर कितीतरी काळ झुलत राहतो..
खरंच तो काळ किती सुंदर होता !
सारं काही साधं, सरळ नि सोपं होतं... यंत्र आणि माणसंसुद्धा !
आता माणसांचीच यंत्र झालीत आणि यंत्रं माणसांसारखी वागू लागलीत..
प्रेम, स्नेह, आदर, जिव्हाळा हे शब्द आता फक्त शब्दकोशातच सापडतात..
तरीही जुनी मित्र मंडळी भेटली की तेवढ्यापुरते जिवंत होतात..
सारे सारे निघून गेलेत
*कहीं दूर, कहीं दूर*........
कोव्हिड-19 आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास
सानुग्रह सहाय्यसंदर्भात अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित
मुंबई, दि. 1 : कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्यात बाबत सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय (क्र.सीएलएस/2021/प्र.क्र.254/म-3, दि. 26.11.2021) प्रसारीत केला आहे.
या शासन निर्णयाच्या अनुषंगाने Online web portal विकसित करण्यात आले असून, याद्वारे कोव्हिड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in यावर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे.
अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोव्हिड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोव्हिड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.
जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभाग, न्यायिक-2021/प्र.क्र.488/आरोग्य-05, दिनांक 13 ऑक्टोबर, 2021 अन्वये जिल्हास्तर/महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील.
अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.
सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणेकरुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे.
‘माविम’ संचलित बचतगटांचे महासंघ देशपातळीवर अव्वल
· ठाणे जिल्ह्यातील आनगाव येथील क्रांतीज्योती सीएमआरसीला देशपातळीवरील प्रथम पुरस्कार
· विभाग पातळीवर उत्कर्ष सीएमआरसी गोंदिया आणि तेजस्विनी सीएमआरसी भंडारा अनुक्रमे द्वितीय आणि तृतीya
मुंबई, दि. 1 : नाबार्ड आणि महिला अभिवृध्दी सोसायटी, आंध्रप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील बचत गटांच्या महासंघांसाठी झालेल्या सर्वंकष मूल्यमापनात महाराष्ट्रातील महिला विकासाची शिखरसंस्था असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ, (माविम) संचालित बचतगटांच्या महासंघाने अव्वल स्थान पटकावले आहे.
नाबार्डचे अध्यक्ष श्री.जी आर चिन्ताला आणि मुख्य महाव्यवस्थापक श्रीमती विजयालक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत ‘माविम’च्या ठाणे जिल्ह्यातील क्रांतीज्योती सीएमआरसी आनगावला एक लाख रू.रकमेच्या रोख पारितोषिकासह देशभरातून प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले. तर विभाग पातळीवर ‘माविम’च्या उत्कर्ष सीएमआरसी गोंदिया आणि तेजस्विनी सीएमआरसी भंडारा यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावत ‘माविम’च्या सातत्यपूर्ण यशात उल्लेखनिय भर टाकली. या पुरस्काराची रक्कम प्रत्येकी रु. २०,०००/- आहे. भारतातील पात्र 120 हून अधिक SHG महासंघांपैकी 13 महासंघांची निवड करण्यात आली.
यावेळी ''व्हीजन 2030'' अंतर्गत भारतातील बचत गट व बचतगटांच्या महासंघांचे पुनरूज्जीवन या विषयावर झालेल्या परिसंवादात ‘माविम’च्या महाव्यवस्थापक श्रीमती कुसूम बाळसराफ यांनी माविमसह महासंघांची भविष्यकालीन उपयुक्तता यावरही प्रकाश टाकला.
या कार्यक्रमासाठी व पुरस्कार स्विकारण्यासाठी क्रांतीज्योती लोकसंचलित साधनकेंद्र, आनगावचे अध्यक्ष सौ शुभांगी शशिकांत जाधव, सौ अंजली कमलाकर ठाकरे – खजिनदार, श्रीमती - अरुणा विजय गायकवाड – व्यवस्थापक, गोंदिया जिल्ह्यातील उत्कर्ष लोकसंचलित साधन केंद्राचे श्रीमती मोनीता राणे, व्यवस्थापक व श्रीमती तुलसी चौधरी अध्यक्षा व भंडारा जिल्ह्यातील तेजस्विनी लोकसंचलित साधनकेंद्राचे श्रीमती भारती झंझाड – अध्यक्षा, श्रीमती वनमाला बावनकुळे – व्यवस्थापक हे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीमती कुसुम बाळसराफ, महाव्यवस्थापक (प्रकल्प), माविम यांनी पॅनलिस्ट म्हणून सहभाग घेतला. श्रीमती शितल लाड, विकास अधिकारी व श्रीमती अस्मिता मोहिते, जिल्हा समन्वय अधिकारी, ठाणे ह्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
देशपातळीवरील ‘माविम’च्या या अभूतपूर्व यशाबद्दल ‘माविम’ अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे यांच्यासह माविम टीमवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
००००
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...