Friday, 29 October 2021

 महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2033 अंतर्गत

3000 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

 

            मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र शासनाने 12 वर्षे मुदतीचे 3000 कोटी रुपयांचे 6.91 टक्के महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज 2033 ची रोखे विक्रीस काढले आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.

        रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या क्रमांक एलएनएफ/ 10.19/ प्र.क्र. 10/अर्थोपाय दिनांक 16 मे 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेत नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींच्या अधीन राहील. दि. 16 मे 2019 मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.                          

            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 1 नाव्हेंबर ,2021 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 1 नाव्हेंबर ,2021 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.

            यामध्ये स्पर्धात्मक बिडस संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते दुपारी 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 2 नाव्हेंबर ,2021 रोजी करण्यात येईल.

            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 2 नाव्हेंबर ,2021 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा  कालावधी 12 वर्षांचा असेल. रोख्यांचा कालावधी  दि. 15 सप्टेंबर 2021 पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक . 15 सप्टेंबर 2033 रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यावरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दि. 15 मार्च आणि 15 सप्टेंबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील अशी माहिती वित्त विभागाच्या 28 ऑक्टोबर 2021 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली

००००

Ali divali arogya sambhali

 दीवाली जवळ आली आहे

त्यामळे बाहेरची मिठाई किंवा इतर मिठाईच्या दुकानातील पदार्थ विकत घेताना विचार करा



आपल्यासाठी किती मेहनत करतात ते पाहा


 नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी

महाज्योतीच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करणार

- बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

 

            मुंबईदि. 28 : बहुजनांच्या शैक्षणिकसामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानासाठी महाराष्ट्र शासनाने महाज्योतीची निर्मिती केली आहे. या  महाज्योतीच्या माध्यमातून नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मागास बहुजन कल्याण मंत्री मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

            बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी नेत्रहीन आणि दिव्यांगांच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या श्रीरंग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. याप्रसंगी नेत्रहीन विद्यार्थ्यांनी स्वतः मंत्री विजय वडेट्टीवार यांचे रेखाटलेले छायाचित्र भेट स्वरूपात दिले. त्यावेळी ते बोलत होते.

            श्री. वडेट्टीवार म्हणालेश्रीरंग सेवाभावी संस्थेत कार्यरत असणाऱ्या तरुणांनी नेत्रहीन मुलांना गंधातून रंग ओळखून चित्र रेखाटण्याची कला शिकवली आहे. ही कला दुर्मिळ व अप्रतिम आहे.

श्रीरंग संस्था करत असलेले  कार्य उल्लेखनीय आहे. गंधातून रंग ओळखून चित्र रेखाटण्याची कला अवगत झाल्यास गरजू नेत्रहीनांच्या हाताला काम मिळू शकेल. त्यांना आधार मिळेल.  नेत्रहीन बांधवांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही कला विकसीत करून महाज्योतीच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

            नेत्रहीन विद्यार्थ्यांनी रंगांना गंधातून ओळखून चित्र रेखाटण्याची कला श्रीरंग सेवाभावी संस्थेचे डॉ. सुमित पाटील यांच्याकडून अवगत केली आहे. बहुजन समाजासाठी आणि दुर्लक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना प्रोत्साहन देऊन दृष्टी बाधित समाजासाठी भविष्यातील एक संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.  

            याप्रसंगी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे  चित्र रेखाटणारे प्रियदर्शिनी सालियन,प्रसाद बालम,आकांक्षा वाकडे ,प्रतिक्षा डोळस आणि शबनम अन्सारीश्रीरंग संस्थेचे डॉ. सुमित पाटील यांना  श्री. विजय वडेट्टीवार यांनी आर्थिक मदत केली. यासह संस्था करत असलेल्या कार्याबद्दल कौतुक केले.

००००


 

चेंबूर येथील संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी

 भोजन दरपत्रके मागविण्याबाबत आवाहन

 

            मुंबई, दि. 28 :- सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृहचेंबूर या वसतिगृहाच्या भोजन ठेक्याकरिता दरपत्रके  मागविण्यात आली आहेत.

              संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृहचेंबूर या वसतिगृहाची विदयार्थी संख्या १५०  आहे. या वसतिगृहाच्या विदयार्थ्यांना भोजन पुरवठा करण्याकरिता भोजनाची ठेका दरपत्रके मागविण्यात येत आहेत. तरी ज्या भोजन पुरवठादारांकडे भोजन पुरवठा परवाना  आहे अशा पुरवठादारांनी याकरिता सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगरप्रशासकीय इमारत४ था मजलाआर.सी.मार्गचेंबूर (पू.)मुंबई-७१ येथे संपर्क साधावा.असे पत्रकाव्दारे मुंबई उपनगरचे सहायक आयुक्तसमाज कल्याण, प्रसाद खैरनार यांनी कळविले आहे.

****


 मनोधैर्य योजनेची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 28 : महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य तसेच पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश  विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

            मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री. राजेंद्र भागवतमहिला व बाल विकासचे  आयुक्त श्री. राहुल मोरेविधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. एम. पी. धोटेगृह विभागाचे प्रधान सचिव श्री. संजय सक्सेना आदी उपस्थित होते.

               राज्यात या योजनेअंतर्गत सहाय्य मिळालेल्या पीडितांची संख्याआर्थिक सहाय्य प्राप्त होण्याचा कालावधी यासंदर्भातील माहिती सादर करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. महिलांना मदत मिळण्यास विलंब होत असेल,तर याचा सखोल अभ्यास करून त्रुटी दूर कराव्यात. योजनेस गती देण्यासाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दर महिन्याला मनोधैर्य योजनेबाबत आढावा बैठक घेण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

                 मनोधैर्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी व जास्तीत जास्त पिडीतांना कमी कालावधीत अर्थसहाय्य मिळावे यासाठी तत्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे. पिडीत महिलांना योजनेचे सहाय्य मिळण्यासाठी कमीत कमी कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. ट्रॉमा केअर पुनर्रचनेची गरज असून राखीव निधीतून या योजनेला निधी मिळावा. साक्षीदार संरक्षण कायद्यासंदर्भात अहवाल सादर करावा. सध्या जिल्हा समित्यांकडे किती अर्ज प्रलंबित आहेत याचीही माहिती तयार करावी. पीडित  महिलेचे त्यांना न्याय मिळेपर्यंत समुपदेशन  करावेअशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.

----------

 

Chotisi yatra

 *यात्रा बहुत छोटी है...*


एक बुजुर्ग महिला बस में यात्रा कर रही थी।


अगले पड़ाव पर, 

एक सुंदर मजबूत युवती बस में चढ़ गई और बुजुर्ग महिलाके पास बैठ गई...

और साथ में बैठी बुजुर्ग महिला को अपने साथ लिए कई बैगों से शरारतपूर्ण इरादे से छुआ। 


युवती ने देखा कि उसके शरारत करने के बावजूद बुजुर्ग महिला चुप है,

तो युवती ने उससे पूछा:-

मैंने आपके साथ शरारत की, फिर भी आप चुप हैं,

शिकायत क्यों नहीं की❓


 बुज़ुर्ग महिला ने मुस्कुराते हुए उत्तर दिया:-


असभ्य होने या इतनी तुच्छ बात पर चर्चा करने की कोई आवश्यकता नहीं है, क्योंकि आपके साथ मेरी यात्रा बहुत छोटी है और मैं अगले पड़ाव पर उतरने जा रही हूं। 


 यह उत्तर सोने के अक्षरों में लिखे जाने के योग्य है:-


 "इतनी तुच्छ बात पर चर्चा करने की कोई आवश्यकता नहीं है, क्योंकि हमारी यात्रा एक साथ बहुत छोटी है"


 हम में से प्रत्येक को यह समझना चाहिए कि इस दुनिया में हमारा समय इतना कम है कि इसे बेकार तर्कों, ईर्ष्या, दूसरों को क्षमा ना करने, असंतोष और बुरे व्यवहार के साथ काला करना समय और ऊर्जा की एक हास्यास्पद बर्बादी है.... 


किसी ने आपका दिल तोड़ा❓ शांत रहें,

यात्रा बहुत छोटी है... 


किसी ने आपको धोखा दिया, धमकाया, या अपमानित किया❓आराम करें, 

तनावग्रस्त न हों,

यात्रा बहुत छोटी है... 


किसी ने बिना वजह आपका अपमान किया❓शांत रहें, 

इसे नजरअंदाज करें,

यात्रा बहुत छोटी है.. 


किसी पड़ोसी ने ऐसी टिप्पणी की जो आपको पसंद नहीं आई❓शांत रहें,

उसकी ओर ध्यान न दें,उसे माफ कर दें, यात्रा बहुत छोटी है... 


हमारी यात्रा की लंबाई कोई नहीं जानता,

कोई नहीं जानता कि यह अपने पड़ाव पर कब पहुंचेगे❓

हमारी एक साथ यात्रा बहुत छोटी है... 


आइए, हम दोस्तों और परिवार की सराहना करें।

आइए हम आदरणीय, दयालु और क्षमाशील बनें... 


अपनी मुस्कान सबके साथ बांटिए क्योंकि...

हमारी यात्रा बहुत छोटी है!


*...सुप्रभात...*🙏🙏

 Christmas Island's mass red crab migration is one of the most incredible natural processes on Earth. Every year, hundreds of millions of these large crabs emerge from the rainforest and make their way to the ocean to breed. The migration starts with the first rainfall of the wet season. This is usually in October or November, but can sometimes be as late as December or January.

Vangelis.


 तृतियपंथीय व्यक्तींनी पोर्टलवर नोंदणी करावी

मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी

             

            मुंबईदि. 28 : नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स (National Portal For Transgender Persons) या संकेतस्थळावर जास्तीत जास्त तृतीयपंथी व्यक्तींनी स्वतःहुन पुढे येऊन ऑनलाईन अर्ज भरावाप्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करून घेऊन आपले अधिकार व हक्क यांचे जतन करावेअसे आवाहन  मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.

             जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर येथे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तक्रारीचे जलद गतीने प्रभावी नियंत्रण निवारण करण्याकरीता जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली.

         जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व उपस्थित स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांना https://transgender.dosje.gov.in या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर समाजातील तृतीयपंथी व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज भरुन तृतीयपंथीयांचे प्रमाणपत्र व ओळखपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी आवाहन केले. जिल्हा निवडणूक कार्यालयमुंबई उपनगर यांचेमार्फत जिल्ह्यातील तृतियपंथीय पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी अर्ज भरणे तसेच कागदपत्रांची आवश्यकता तसेच कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत विकसित तृतियपंथीय व्यक्ती नोंदणी पोर्टलवर प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तृतियपंथीय प्रमाणपत्र व ओळखपत्र ५ व्यक्तींना वाटप करण्यात आले.

       उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजित साखरेसहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर,प्रसाद खैरनार,अजित साखरेकिन्नरमा संस्थाहमसफर संस्था यांचे प्रतिनिधीजिल्हा नियोजन अधिकारी भुषण देशपांडे या बैठकीला उपस्थित होते.

*****


 

मनोधैर्य योजनेची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

 

            मुंबईदि. 28 : महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य तसेच पुनर्वसनासाठी राबविल्या जाणाऱ्या मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश  विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

            मनोधैर्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री. राजेंद्र भागवतमहिला व बाल विकासचे  आयुक्त श्री. राहुल मोरेविधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. एम. पी. धोटेगृह विभागाचे प्रधान सचिव श्री. संजय सक्सेना आदी उपस्थित होते.

               राज्यात या योजनेअंतर्गत सहाय्य मिळालेल्या पीडितांची संख्याआर्थिक सहाय्य प्राप्त होण्याचा कालावधी यासंदर्भातील माहिती सादर करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. महिलांना मदत मिळण्यास विलंब होत असेल,तर याचा सखोल अभ्यास करून त्रुटी दूर कराव्यात. योजनेस गती देण्यासाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दर महिन्याला मनोधैर्य योजनेबाबत आढावा बैठक घेण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

                 मनोधैर्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी व जास्तीत जास्त पिडीतांना कमी कालावधीत अर्थसहाय्य मिळावे यासाठी तत्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे. पिडीत महिलांना योजनेचे सहाय्य मिळण्यासाठी कमीत कमी कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. ट्रॉमा केअर पुनर्रचनेची गरज असून राखीव निधीतून या योजनेला निधी मिळावा. साक्षीदार संरक्षण कायद्यासंदर्भात अहवाल सादर करावा. सध्या जिल्हा समित्यांकडे किती अर्ज प्रलंबित आहेत याचीही माहिती तयार करावी. पीडित  महिलेचे त्यांना न्याय मिळेपर्यंत समुपदेशन  करावेअशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.

----------

 


Featured post

Lakshvedhi