Saturday, 23 October 2021

 *🙏बेवारस झेंडू आणि आमचा आबा🙏-:** *आबा तसा आमचा जिद्दी शेतकरी*.दोन वर्षे कोरोनात गेली पण गडी कधी थकला नाही.बापानं करुन ठेवलेलं सोसायटीचं कर्ज, खासगी सावकाराचं देणं असून पण कुणाला गडी भिला नाही. लॉकडाऊन मधे रानात थोडे  माळवं-भाजीपाला पिकवायचा आणि  सायकल वर तर कधी मोटार सायकल वरून लांब शहरा पर्यंत भाजीपाला विकाय जायचा.लॉकडाऊन मधे कोणी पकडलं तर त्याला किलो दोन किलो वांगी- दोडकं देवून जाग्यावर सेटलमेंट पण  करायचा.*लय जुळलं नाही तर खिशातल्या डायरीतून  माझा मो. नंबर काढून आमच्या वकील साहेबांशी बोला,पुण्याला मोठं वकिल साहेब आहेत म्हणायचा.** एकदा एकाच पोलिसाला दोन  वेळा लॉकडाऊन मधे सापडला. मग आबाला पोलिस चौकीतच  बसवून ठेवला.शेवटी मी जाऊन चौकीतून  सोडवुन बाहेर आणला, भाबडेपणा ने आबा वळुन परत चौकीत गेला आणी सगळ्याला वांगी तंबाटी देवून आला.तिथले पोलिस अधिकारी चांगले होते आबाला त्याचा भोळेपणा पाहुन मालाचे पैसेही दिले .असा आमचा भोळा भाबडा आबा.

*यंदा मात्र आमचा शेतकरी आबा रडला हतबल झाला.**दसरा नवरात्रात झेंडू फुलाला चांगली मागणी असते म्हणून आबाने आगोदरच झेंडू लागवड केली होती.परवा त्याच्या गावाला गेल्या वर मला आवर्जून घरी घेवुन गेला.शेना मातीनं सारवलेलं घर,हातरुनाव पडलेला बाप,बाजरीचं दळण निवडत बसलेली म्हतारी आई, दोन ठिकाणी शिवलेला फ्रॉक घालुन बसलेली पोरगी व ठिगळानी जोडलेली हाफ चड्डी घालुन बसलेला पोरगा अभ्यास करत होता.आबा ने मला फिरुन त्याची झेंडूची शेती दाखवली.आबाच्या बायकोनं तेवढ्यात डोक्या वरचा पदर सावरत कोरा चहा फुलपत्रात आमचे समोर ठेवला.आबानं पोरीला जवळ करत तीची शाळेची वही मला कौतुकाने दाखवली.*आबा म्हणाला या वेळी झेंडू विकला की पोरांना चांगली कपडे हडपसर वरुन घेवुनच येतो.**मला निरोप देताना आबा म्हणाला साहेब या वेळी तुमच्या हडपसरच्या ऑफीस समोर उड्डाण पुलाच्या खाली जागा धरतो झेंडू विकायला.

तिथं पैशे चांगले होतील.ठरल्या प्रमाणे आदल्या दिवशी आबाच्या सगळ्या कुटुंबाने अगदी आनंदाने झेंडूची फुले तोडली, भाड्याने बारका टेंपो घेतला, म्हतारीला आणी पोटच्या लेकीला मदतीला घेवुन पहाटे साडे तीनला  हडपसरच्या पुला खाली जागा पटकावुन दसराच्या दिवशी छान दुकान थाटलं.फुलाचे दोन ढीग केले एकीकडे म्हतारी व पोरगी व दुसरी कडे आबा बसला.मला सकाळी 8 वाजता फोन केला.*जाम खुश होता गडी त्यावेळी.झेंडू घ्या झेंडू जोरात ओरडायचा.*

पण सकाळी नऊ नंतर झेंडू ची आवक मोठ्या प्रमाणात पुलाखाली वाढली.खुप माल घेऊन विक्रेते वाढले. 150 रुपये किलो चा झेंडू तासा भरात 30 रुपया वर आला,दुपारी 12 नंतर 20 रुपये किलो झाला. 2 वाजता तर एक पण गिराईक  येईना.आबानं रडवला चेहरा करत शेवटी प्ल्यास्टीक क्यारी बैग भरून 5 रुपये किलो दर केला.घसा बसो पर्यंत झेंडू घ्या झेंडू ओरडायचा. .पण गिराईक फीरकत पण न्हवते.शेजारी म्हतारी धीर देत होती. *पण आबाच्या डोळ्यासमोर पोरांची सनासुदी साठीची नवी कापडं सारखी दिसत होती.**समोरच्या बाजूचे लहान मुलांचे कपड्या च्या दुकानावर त्याची सारखी नजर जात होती.शेवटी या कोरोनाला- लॉकडाऊनला न घाबरणारा आमचा आबा संध्याकाळी मात्र हतबल झाला..*शेजारचे झेंडू विक्रेते कधीच फुले तशीच बेवारस सोडून, ढिग सोडून निघुन गेली होती.आबाचं तर अजुन टेम्पो चे भाडे पण वसुल झाले न्हवते .**मला समोर बघीतल्याव आबा धायमोकलून  रडायला लागला.सकाळ पासुन माय लेकराने अन्नाचा घास खाल्ला न्हवता.पोरगी सुधा भुकेली होती.सोडून द्या आता उठा म्हणत मी त्या तिघांना माझे ऑफिस शेजारच्या हॉटेलात घेवुन गेलो.पोटाला खायला घातले.त्यांना चहा ची ऑर्डर देवून मी पाच मिनिटात आलो म्हणत  समोरच्या कपड्याच्या दुकाना गेलो. आबाच्या पोराला-पोरीला नवीन ड्रेस विकत घेतला.*आबाच्या हातावर मी नविन ड्रेस ठेवताच आबा  परत रडायला लागला.**धीर देत गाडी भाड्याचे  पैसे मी देऊ लागलो तर नको, हायती थोडं फार जमल्यात म्हणाला.पोरीचा हात पकडून आबा, म्हातारी आई जात असताना मी किती तरी वेळ पाहत होतो.

*कष्टाने पिकवलेल्या सोन्या सारख्या झेंडुंच्या फुलांना निरोप देवून एक हतबल शेतकरी राजा परतीच्या वाटेने निघाला होता..** उद्याच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी या काळ्या आईच्या कुशीत पुन्हा नव्याने सोने पिकवण्यासाठी..जय किसान 🙏🚩

*वैभव धायगुडे-पाटील विधीज्ञ जिल्हा परिषद  पुणे**-:9822760659

(कृपया लेखकाच्या नावा सह पोस्ट शेअर करावी.)

शेतकरी जेव्हा त्याचा माल बाजारात  विकायला येईल त्यावेळी फार घासा घिस करु नका.खुप स्वप्ने दडलेली असतात.

 मैत्रिणींना विनंती...आपल्या साड्या सांभाळून ठेवा... पुरुषांच्या साठी नवीन फॅशन आली आहे...👆


 लोकसहभागातून मतदार जागृती मोहिम यशस्वी करा

                                             - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

                                                                ·         नागपूर विभागाचा निवडणूक विषयक आढावा

 

        नागपूर दि. 22 : 1 नोव्हेंबरला प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात येत असून या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यात नवमतदारदिव्यांग मतदारांची नोंदणी प्राधान्याने करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकसहभागातून मोहिम यशस्वी कराअशा सूचना प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण झालेले युवक-युवतींना मतदार यादीत समाविष्ट करण्याचे त्यांनी सांगितले.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात नागपूर विभागाचा निवडणूक विशेष पुनर्रीक्षण कार्यक्रमाचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर.मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकरविभागीय उपायुक्त आशा पठानमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशीउपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकरतहसिलदार राहूल सारंग तसेच जिल्ह्यातील विभागाचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते.

            16 नोव्हेंबर रोजी राज्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच नवीन मतदारांची नोंदणीगावातील लग्न होवून बाहेरगावी गेलेल्या महिलांना यादीतून वगळणे तसेच लग्न होवून गावात आलेल्या महिलांची नोंदणी करणेत्यासोबतच दिव्यांगाची नोंदणी करणे व त्यांना चिन्हांकित करण्याचे काम या शिबिरात करण्यात येणार आहे. मतदार जागृतीसाठी पोस्टरहोर्डींगद्वारे विस्तृत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            2022 मध्ये नागपूर महानगर पालिकेची निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे. त्यामध्ये दिव्यांगतृतीयपंथी तसेच वारांगणा यांनाही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांची मतदार नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून मतदाराची टक्केवारी वाढेल. महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने समन्वयाने काम करून मतदार जागृती करावीतसेच लसीकरण केंद्रावरसुध्दा मतदार जागृती करावीअसे त्यांनी सांगितले. महानगर पालिका क्षेत्रात कर निरीक्षकाद्वारे मतदार जागृती करावी. कर निरीक्षकांनी घरोघरी जावून तक्रारी जाणून घ्यावा. तसेच माहितगार लोकांना मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी करावे. 13 व 14 नोव्हेंबर, 27 व 28 नोव्हेंबर रोजी शिबिराचे नियोजन करारहिवासी दाखलाछायाचित्रघोषणापत्रआदीबाबत नागरिकांना माहिती द्या व शिबिरात नोंदणी करून घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वंचित घटकांसाठी स्वयंसेवी संस्था अधिकारी यांची घोषणा पत्रानुसार प्रक्रियेत सहभागी करा. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित नियोजन करून मतदार जागृती करावी. यासाठी पोस्टरहोर्डींगद्वारे प्रसिध्दी करावी.

            सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदार यादीतील अडचणी दूर करण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून कामास गती द्यावी. तसेच सूचना व तक्रारीचे निराकरण करण्यास प्राधान्याने लक्ष द्यावेअसे त्यांनी सांगितले.

            व्होटर हेल्पलाईनद्वारे सुध्दा मतदारांना आपले नाव पाहता येईल.  शाळा व महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांद्वारे ग्रामीण भागात शिबिराद्वारे मतदार जागृतीबाबत जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शाळा महाविद्यालयात 25 पेक्षा  जास्त लोकांना  मोहिमेबाबत माहिती देवून मतदार यादीत नाव नोंदविल्यास त्यांचा जिल्हा व राज्य पातळीवर सत्कार करण्याचे योजना आखावी. आदिवासी दुर्गम भागातील जनतेला मतदार नोंदणी प्रक्रियेत सामावून घ्यावे.

 

 

            जिल्ह्यातील राष्ट्रीय पक्षांचे बैठका घेवून त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करा व मतदार जागृती मोहिमेची विस्तृत जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासोबतच अधिकार आहेयाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. नागपूर विभागात मतदार जागृती करून मतदारांची टक्केवारी वाढविण्यावर प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. नवमतदारांना मतदार नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांची नोंदणी करून घेण्याची त्यांनी सांगितले. या बैठकीत सहाही जिल्ह्याचे निवडणूक विषयक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

0000


                                        

 विविध विभागांच्या योजनांची सांगड घालून

व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करावा

                                                     - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

         ·         व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत 2021-22 च्या अर्थसंकल्पाला मंजूरी

 

            मुंबईदि, 22 : राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांचे व्यवस्थापन तसेच वाघ आणि अन्य वन्यजीवांसह संपूर्ण जैवविविधतेचे संवर्धन करताना स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालण्यात यावीअसे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात व्याघ्र संवर्धन नियामक मंडळाच्या बैठकीत 2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेगृह व वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाईआमदार सुधीर मुनगंटीवारआमदार आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सीताराम कुंटेमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेवन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डीप्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साईप्रकाशप्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमयेविविध व्याघ्र प्रकल्पांचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक तसेच मदत पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवारवन्यजीव मंडळाचे सदस्यवन विभागाचे वरिष्ठ अधिकारीमानद वन्यजीव रक्षक आदी मान्यवर दूरदृश्य माध्यमातून उपस्थित होते.

            मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणालेराज्यातील व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या रस्ता दुभाजकामुळे वाघांसहवन्यजीव अपघातात बळी पडत आहेतहे टाळण्यासाठी केंद्राच्या संबंधित यंत्रणेला तात्काळ कळविण्यात यावे.याचा पाठपुरावा करून वन विभागाने वाघांचा मार्ग मोकळा करावा.रेल्वे मार्गामुळे होणारे अपघात टाळण्यासाठीही प्रयत्न करावे. जंगलावर अवलंबून असणाऱ्यांना, वनक्षेत्र लगतच्या परिसरातील स्थानिकांना विविध विभागांच्या योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन द्यावे. पर्यटनाला चालना देण्यासाठी अंतर्गत रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यात यावीत, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

            बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात यावाअशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

            बैठकीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पनवेगाव -नागझिरा,  ताडोबा-अंधारीसह्याद्री व्याघ्र प्रकल्पपेंच-बोर व्याघ्र प्रकल्पांच्या संचालकांनी प्रकल्पांच्या वाटचालीचा आढावा तसेच आर्थिक बाबींची माहिती सादर केली. प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्थानिकांसाठीच्या योजना त्यामध्ये रोजगार संधीपर्यटन सुविधाजाणीव जागृतीनिसर्ग शिक्षण तसेच पायाभूत विकास कामेनाविन्यपूर्ण उपक्रम आदींची माहिती दिली.

            यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ताडोबा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

0000

 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेतील उमेदवारांच्या

मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रतदेण्यात आलेले गुण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

  पारदर्शकता ठेवण्यासाठी आयोगाचे महत्वाचे पाऊल

 

            मुंबईदि. 22 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा२०२० करिता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गाकरिताच्या गुणांची किमान सोमांकन रेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet या वेबलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

            वेबलिंकद्वारे उपरोक्त माहिती उपलब्ध करून घेण्याकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे: (१) आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet: लिंकवर क्लिक करावे. (२) उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी. (३) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाइल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करुन लॉगीन करावे. (४) लॉगीन केल्यानंतर गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेता येईल. विहित कार्यपध्दतीनुसार गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००१२३४२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल. उपरोक्त सुविधा ही वरील वेबलिंकवर दिनांक 10 नोव्हेंबर2021 पर्यंत उपलब्ध राहील.


 प्रवेशपत्राबरोबर ओळखपत्रही सोबत ठेवा

आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांचे उमेदवारांना आवाहन

 

            मुंबईदि. 22 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरतीच्या लेखी परीक्षेसाठी उमेदवारांनी प्रवेश पत्राबरोबरच आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. आरोग्य सेवा संचालक डॉ अर्चना पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

             राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने गट ‘क’ संवर्गातील भरतीसाठी 24 ऑक्टोबर 2021 रोजी तर गट ‘ड’ करिता 31 ऑक्टोबर 2021 रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. याबाबत डॉ. पाटील यांनी उमेदवारांना आवाहन केले आहे.

सहापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा

             त्यांनी आवाहनात नमूद केले आहे की, उमेदवारांनी प्रवेशपत्रावर आपले छायाचित्र चिकटवावे. त्यासोबतच पॅनकार्डपासपोर्टवाहन चालवण्याचा परवानामतदार ओळखपत्रछायाचित्र असलेले राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुकमूळ आधार कार्ड यापैकी एक ओळखपत्र म्हणून सोबत ठेवावे. सोबत निळ्या अथवा काळ्या शाईचा बॉलपेन घ्यावा. परीक्षेच्या वेळी मास्क वापरणे बंधनकारक आहे. प्रवेश पत्रावर नमूद वेळेपेक्षा एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

गैरप्रकार रोखण्यासाठी माहिती द्यावी

            परीक्षेच्या अनुषंगाने काही गैरप्रकारांची माहिती मिळाल्यावर तात्काळ ०२०-२६१२२२५६ या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ या वेळेत संपर्क साधावा. त्याचबरोबर नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी. याबाबत arogyabharti2021@gmail.com या ई-मेल वर माहिती द्यावीअसे आवाहनही त्यांनी केले आहे.

आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करा

            उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. परीक्षेबाबत वेळोवेळी संकेतस्थळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

0000


 गुन्ह्याला वाचा फोडण्यासाठीगुन्हेगाराला हमखास शिक्षेसाठी

फास्टट्रॅक डीएनए युनिट उपयुक्त ठरेल

                                     - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

         ·         निर्भया योजनेंतर्गत नव्या तीन फास्टट्रॅक प्रयोगशाळेचे उद्घाटन

         ·         नागपूरमध्ये वन्यजीवांच्या पहिल्या प्रयोगशाळेची सुरुवात

 

            नागपूर दि. 22 : महाराष्ट्र पोलीस दलाची जागतिक पोलीस दल म्हणून ख्याती आहे. नागपुरात आज उद्घाटन झालेल्या फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्यजीव डिएनए विश्लेषण विभागामुळे कायद्याला बळकटी आणण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध करणेगुन्ह्याला वाचा फोडणे व गुन्हेगाराला कडक शासन करणे या प्रक्रियेला गती मिळणार आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

            नागपूर येथे गृह विभागामार्फत रहाटे कॉलनीस्थित प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये देशातील वन्यजीवांच्या पहिल्या तर मानवी डिएनएच्या राज्यातील नव्या प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने केले. या कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊतपशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदारगृह विभागाच्या न्यायिक व तांत्रिक शाखेचे महासंचालक संदीप बिश्नोईप्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोग शाळेच्या संचालक संगीता घुमटकरउपसंचालक डॉ. विजय ठाकरे नागपूर येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवारपर्यटन मंत्री आदित्य ठाकरेगृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटीलगृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाईउपस्थित होते.  

            यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये भारतातील वन्यजीवांच्या पहिल्या तर निर्भया योजनेतंर्गत मानवी डिएनएच्या एकत्रित तीन प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना गृह खात्याच्या कामकाजाला बळकटी देत असल्याचा आनंद आहेअसे स्पष्ट केले. श्री.ठाकरे म्हणालेमहिला व बालके यांच्या संदर्भातील गुन्ह्यांचा तपास जलदगतीने करताना अडचण येते. या प्रयोगशाळेमुळे तपासाला गती येणार आहे. वन्यजीवांच्या हत्येप्रकरणी तस्करी रोखतानाअशा तस्करांवर कारवाई करताना आता ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार आहे.

            आपले तंत्रज्ञान हे गुन्हेगारांच्या पुढे असले पाहिजे. त्यामुळे जगातील बदल लक्षात घेऊन आज मुंबईनागपूरपुणे येथील फास्टट्रॅक प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले जात आहे. महाराष्ट्राचे पोलीसमुंबई पोलीस यांचा संपूर्ण देशात दरारा आहे. तपासामध्ये या नव्या प्रयोगशाळेचा निश्चितच लाभ होईलअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही संबोधित केले. राज्यात लवकरच महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात संमत होईलगृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. ते म्हणालेमहिला व मुलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी शक्ती कायदा तयार करण्यात आला आहे. हा कायदा लवकरच संमत केला जाईल. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा देण्यासाठी फास्टट्रॅक डीएनए युनिटची मोठी भूमिका राहणार आहेअसेही त्यांनी सांगितले.

            निसर्गातील समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे आवश्यक आहे. वाघासह इतर लहान-मोठ्या प्राण्यांची शिकार केली जाते. यामुळे निसर्गातील समतोलावर विपरित परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी व या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी वन्यजीव डीएनए विश्लेषण विभाग मोलाची भूमिका बजावणार असल्याचे श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.

            ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या प्रयोगशाळेमुळे तपास यंत्रणेच्या नव्या पर्वाला सुरूवात होत असल्याचा आनंद व्यक्त केला. मंत्री डॉ. राऊत म्हणालेया युनिटमुळे पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करण्यास लागणारा कालावधी कमी होणार आहे. एवढेच नव्हे तर तपासामध्ये अधिक अचुकता येणार आहे. महिलांची सुरक्षितता ही शासनाची प्राथमिकता आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करून कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

            या युनिटमध्ये वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागही सुरू होणार आहे. राज्यातील सर्वाधिक जंगल विदर्भात आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या कामात हे युनिट मोठी भूमिका बजावणार आहे, असेही ते म्हणाले.

            डीएनए विश्लेषण विभाग सुरू झाल्याने नागपुरातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिक अद्ययावत झाली आहेअसे पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

            श्री. केदार म्हणालेजे बघता येत नाहीजे दिसत नाहीते सर्व येथे पुरावा म्हणून पुढे येते. फास्टट्रॅक डीएनए युनिट व वन्य डीएनए विश्लेषण विभागामुळे पोलिस व वनविभागाच्या तपास यंत्रणेला नक्कीच लाभ होईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी संचालक संगिता घुमटकरसंचलन श्वेता शेलगावकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. विजय ठाकरे यांनी केले.

0000


Featured post

Lakshvedhi