Friday, 24 September 2021

 

 🩸 *तब्येती का बिघडतात ?*


मनांत खूप साचलं की

कुणाजवळ तरी बोला,

ऐकणाऱ्याचा खांदा

होऊ द्या की ओला.


धरण पूर्ण भरल्यावर

जसे दरवाजे उघडतात,

माणसं तसं वागत नाहीत

म्हणून तब्येती बिघडतात.


त्यामुळेच आग्रह आहे

मन मोकळं करा,

एखाद्या तरी मित्राचा

हात हातात धरा.


जे वाटतं ते बोलून टेन्शन

करा कमी,

व्यक्त होण्यातच

आरोग्याची हमी.


जर कुढत बसाल तर

विपरीत परिणाम होणारच,

बीपी, शुगर, ECG

कमी जास्त होणारच.


दुःख सांगायला कोणी नसणे

जागतिक समस्या आहे,

अनेक रोगाचं कारण हे

कुढत बसणं आहे.


रडायला जर जागा नसेल

लावा प्रॉपर्टीला काडी,

काय करायचं सोनं चांदी

बंगला फ्लॅट गाडी.


हजार वेळेस सांगितलं

माणसं जोडायला शिक,

तुला वाटतं पैसा करील 

सगळं काही ठीक.


जे होईल ते होईल म्हणून

झुगारून टाका भीती,

प्रत्येक क्षण जगून घ्या

नका म्हणू 

*'आत्ता उरले किती ' ?*🙏

      ********

 मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .

मी विचारले *"काय भाव आहे ?*

त्यांनी सांगितले  : *"60 रूपये  किलो ."*

त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती.  मी विचारले: *" याचा काय भाव आहे "*

तो बोलला  : *"20 रूपये किलो"*

मी विचारले :"इतका कमी भाव .? 

तो बोलला :"साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!! 

पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे 

तेव्हा मला कळाले

जो व्यक्ती  *मित्र..समाज* आणि  *परिवार* याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...

कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण *परिवार, संघटन* आणि *मित्र* यांच्याशी सतत जोडून रहा...

मैत्रीला वेळ द्या.

🌹🌹🙏🙏🌹🌹सुप्रभात🌹🌹


 


 

 एकदा मी चालत घरी येत 

होतो. 

रस्त्यात एका विजेच्या खांबावर एक कागद लावला 

होता. 

जवळ जाऊन बघितलं तर 

त्यावर लिहिलं होतं,"ह्या 

रस्त्यावर काल माझी एक 

पन्नास 

रुपयाची नोट हरवली 

होती.

मला डोळ्यानं नीट्स दिसत नाहीये.

ज्याला कोणाला पन्नास 

रुपयाची नोट मिळाली असेल त्याने ती कृपया खालील 

पत्त्यावर 

आणून द्यावी.”

हे वाचल्यावर का कुणास 

ठाऊक त्या पत्त्यावर 

जाण्याची इच्छा 

झाली.

मी त्या पत्त्यावर गेलो,

घरात कोणी आहे का,

म्हणून विचारल्यावर 

एक म्हातारी काठीचा 

आधार घेत बाहेर 

आली.

घरात ती एकटीच राहत 

होती.

तिला डोळ्यानं नीट दिसत देखील नव्हतं.

मी तिला म्हटलं,"आज्जी,

तुमची हरवलेली ५० 

रुपयाची नोट मला 

मिळाली,

ती मी द्यायला 

आलोय.

घ्या तुमची ही नोट."

हे ऐकून म्हातारी रडू 

लागली.

म्हणाली,"बाळा,अजूनपर्यंत जवळजवळ ५०-६० लोक 

मला ५० रुपयाची नोट देऊन 

गेलेत. 

मी अशिक्षित आहे.

मला नीट दिसत देखील 

नाही.

माझी ही अशी अवस्था बघून मला मदत करण्याच्या 

उद्देशाने कोणी ते लिहिलंय 

मला 

माहित नाही."

खूप आग्रह केल्यावर 

आज्जीने पैसे 

घेतले.

पण मला एक विनंती 

केली 

की,"बाळा,ते मी नाही 

लिहिलंय.

माझी दया आली असेल 

म्हणून कोणीतरी 

लिहिलं 

असेल.

जातांना तू तो कागद फाडून टाक.”

मी हो म्हणून ते टाळलं खरं;

पण माझं अंतर्मन मला सांगू लागलं की हेच ५०-६० 

लोकांना 

पण तिने सांगितलं 

असणार.

अद्याप कोणीच तो कागद फाडला नाही. 

ज्याने कोणी त्या वृद्ध 

महिलेला मदत म्हणून हा 

उपाय शोधून काढला त्या व्यक्तीप्रती 

माझं मन कृतज्ञतेनं 

भरून आलं. 


एखाद्याला मदत करण्याचे 

अनेक मार्ग आहेत;

पण अशा प्रकारची सेवा करण्याची कल्पना 

माझ्या मनाला 

स्पर्शून गेली. 

मी देखील तो कागद न 

फाडता घरी गेलो.

मदत करण्याचे मार्ग 

अनेक आहेत;

फक्त कर्म करण्याची 

तीव्र इच्छा 

हवी.!


(माझ्या वाचनात आलेला सुंदर लेख मनात घर करून गेला.)

Featured post

Lakshvedhi