Saturday, 4 September 2021

 कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना

महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देईल

                                      -  कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

·       महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा शुभारंभ

·       राज्याच्या विविध भागातील २६३ युवक-युवतींचा सहभाग

 

            मुंबईदि. ३ : शांघाय (चीन) येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्किल्स चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे कौशल्य विकासरोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनविताना महाराष्ट्र त्यात महत्वपूर्ण योगदान देईलअसे कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक यांनी यावेळी सांगितले.

            कुर्ला येथील डॉन बॉस्को आयटीआय येथे हा उद्घाटन सोहळा झाला. कौशल्य विकासरोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्माकौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहकौशल्य विकास विभागाच्या सहसचिव सुवर्णा खराततंत्रशिक्षण संचालक दिगंबर दळवीराष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सिनियर हेड जयकांत सिंहडॉन बॉस्को संस्थेचे प्रशासक फादर मॅकएन्रो लोपेज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ब्युटी थेरपीकुकींगसायबर सिक्युरीटीग्राफीक डिझाईनहेअर ड्रेसिंग

अशा विविध ४५ क्षेत्रातील कौशल्ये सहभागी

            राज्यातील युवक-युवतींमधील कौशल्य आणि नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत २० हजार ०९० उमेदवारांनी सहभाग घेतला होता. त्यातील जागतिक पातळीवर चांगली कामगिरी दाखवू शकतील अशा निवडक उत्कृष्ट २६३ युवक-युवतींची या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आता यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे युवक-युवती पुढे राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. या युवक-युवतींनी विविध ४५ क्षेत्रातील कौशल्यावर चमकदार अशी कामगिरी दाखवली आहे.  इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशनऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीसीएनसी मिलिंगसीएनसी टर्निंगइलेक्ट्रॉनिक्सफॅशन टेक्नॉलॉजीहेल्थ आणि सोशल केअरआयटी नेटवर्क केबलमेकॅनिकल इंजिनिअरींगप्लंबिंग आणि ॲम्प हिटींगरेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगवेल्डींग३ डी डीजीटल गेम आर्टऑटोबॉडी रिपेअरऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीबेकरीब्युटी थेरपीब्रुकलेयींगकॅबिनेट मेकींगकार पेंटींगकारपेन्ट्रीक्लाऊड कॉम्पुटींगसीएनसी मिलींगकॉन्क्रींट कन्स्ट्रक्शन वर्ककुकींगसायबर सिक्युरीटीफ्लॉरिस्ट्रीग्राफीक डिझाईन टेक्नोलॉजीहेअर ड्रेसिंगइंडस्ट्रीयल कंट्रोलज्वेलरीजॉईनरीलँडस्केप गार्डनिंगमेकॅट्रॉनिक्सप्लंबिंगप्रिंट मेडीया टेक्नॉलॉजीप्रोटोटाईप मॉडेलिंगरेस्टॉरंट सर्व्हीसवॉटर टेक्नॉलॉजीवेब टेक्नॉलॉजी या सेक्टरमध्ये हे युवक-युवती आपले कौशल्य दाखवत आहेत.

ऑलिम्पिकच्या पद्धतीने युवकांची तयारी

            कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक म्हणाले कीज्याप्रमाणे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी करुन घेतली जातेत्याच पद्धतीने या स्पर्धेत सहभागी युवक-युवतींची जागतिक स्पर्धेत यशस्वी होण्याच्या दृष्टीने तयारी करुन घेतली जाईल. यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत आवश्यक ते सर्व पाठबळ या युवकांना दिले जाईल. स्पर्धेत सहभागी तरुणांनीही जिद्दीने जागतिक स्पर्धेत यश मिळविण्याचे ध्येय्य ठेवावे. २०२३ मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या स्पर्धेसाठीही आतापासूनच तयारी सुरु करावी. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचे नाव उज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक-युवती महत्वपूर्ण योगदान देतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या कीराज्यातील सर्व स्पर्धक विविध कौशल्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. या स्पर्धकांनी राज्यातील इतर युवक-युवतींनाही तयार करण्याच्या अनुषंगाने काही मौलिक सूचना द्याव्यातत्याची निश्चित अंमलबजावणी करण्यात येईल. राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल. उर्वरित विद्यार्थ्यांनाही त्यांच्यातील कौशल्याला चालना देण्याच्या अनुषंगाने कौशल्य विकास विभाग संपूर्ण मदत करेलअसे त्यांनी सांगितले.

            कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह म्हणाले कीजागतिक स्पर्धेसाठी तयारी करण्याबरोबरच या युवक-युवतींना विविध नामवंत उद्योगांशी कशा पद्धतीने जोडता येईल यासाठी विभाग प्रयत्न करेल. स्पर्धेत यश मिळविण्याबरोबरच या युवकांना त्यांच्यातील नवसंकल्पना आणि कौशल्याचा उद्योजकतेसाठी वापर करता येईल. कौशल्य विकास सोसायटीमार्फत यासाठी चालना देण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

            ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून ज्युरींमार्फत छाननी करुन रविवारी (५ सप्टेंबर रोजी) परेल येथील आयएसएमई स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रिनरशीप येथे होणाऱ्या समारोप कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे.

००००

 इंपिरिकल डेटा तयार करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत सहमती

 

          मुंबई, दि. 3 : ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्यादृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करावायासंबंधीचे निर्देश राज्य मागास वर्ग आयोगास देण्यात यावेत यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत एकमताने सहमती देण्यात आली.

            ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरातसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळजलसंपदा मंत्री जयंत पाटील,  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,  बहूजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार,परिवहन मंत्री अॅड.अनिल परबविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरविधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसखासदार इम्तियाज जलील, आमदार नाना पटोले, कपिल पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते सर्वश्री विनायक मेटे,जोगेंद्र कवाडे,  शैलेंद्र कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

            इंपिरिकल डेटा तयार करण्याच्या सूचना राज्‍य मागासवर्ग आयोगाला देण्यात येऊन त्यांना लवकरात लवकर हा डेटा तयार करण्यासंदर्भात निर्देश देण्याबाबत तसेच यासंबंधात महाधिवक्ता यांचे अधिक मार्गदर्शन घेण्यात यावे. आयोगाकडून इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करण्यात यावा व  हा अहवाल येण्यास  उशीर होत असल्यास अशावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रस्तावित निवडणूका काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात याव्यात असेही  बैठकीत एकमताने निश्चित करण्यात आले.

            बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटेग्राम विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेइतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्तानगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठकविधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 कोरोना काळात मातृशक्तीचे योगदान विशेष उल्लेखनीय’: राज्यपाल कोश्यारी

 

            मुंबई, दि. 3 : कोरोना काळात डॉक्टर्सदानशूर व्यक्तीपोलीसस्वच्छता कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांनी मनोभावे काम केले. मात्र रुग्णांजवळ कुणीही जाण्यास धजावत नसताना डॉक्टर्स, निवासी डॉक्टर्सनर्सेस व रुग्णसेवक या लोकांनी जीवावर उदार होऊन जनसेवा केली. मातृशक्तीने कोरोना काळात दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 34 डॉक्टर्सऔषध निर्माण कंपन्यांचे प्रतिनिधी,  पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच समाजसेवकांना शुक्रवारी (दि. 3) राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे महाराष्ट्र स्टेट चॅम्पियन ऑनर्स’ प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 

            ह्युमॅनिटरियन वेल्फेअर ॲन्ड रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने कोरोना योद्ध्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या अध्यक्षा क्रिस्टीन स्वामिनाथन व आरती नोटीयाल व्यासपीठावर उपस्थित होत्या.

            यावेळी डॉ.वर्नोन वेल्होडॉ. श्रीनिवास चव्हाणडॉ. विनायक सावर्डेकरडॉ.भूषण वानखेडेडॉ. दिनेश कुडवा आणि डॉ. चंद्रिका कुडवाडॉ. अनिरुद्ध अर्जुन माळगावकरडॉ. आशुतोष खटावकरडॉ. भरत पाठकडॉ. पल्लवी सिंगश्री. दारा पटेलश्री. सौरभ कुमार गुप्ताश्रीमती छाया अविनाश कुबलडॉ. अनिल के मुरारकाश्री. सुरेश अग्रवालश्री. रोहित वर्माश्री. भालचंद्र बर्वेश्री. एस के सिंगश्री. विकास शर्माश्री. पराग छापेकरश्री. सुभाष शंकर पुजारीश्री. योगेश आधार शिवडेश्री. मुकुंद परशुराम काळेश्री. सखाराम धुरीश्री. रायझन स्वामीनाथनश्रीमती सुप्रिया विजय वाघमारेश्रीमती प्रेमलता लक्ष्मीकांत मौर्यश्री. शशांक धनंजय रावलेश्री. संतोष भागवत राऊतश्री. प्रदीप (राजू) मोरेश्री. सुनील नारायण पाटीलश्री. अजित अनिल कुलकर्णीश्रीमती सीमा एम. अडसूळ यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

००००

 

 


Friday, 3 September 2021

 सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा – इंडिया स्किल्स महाराष्ट्र 2021 ची

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली घोषणा

शांघाय येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स चॅम्पियनशिपसाठी राज्यातील युवकांची तयारी

 

·        3 ते 5 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे आयोजन

·        जिल्हास्तरीय स्पर्धेत २० हजार ९० युवकयुवतींचा सहभाग

·        राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार 263 उमेदवार

 

            मुंबईदि. 02 : शांघाय (चीन) येथे ऑक्टोबर 2022 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स चॅम्पियनशिपसाठी राज्यातील युवक-युवतींची तयारी करुन घेण्यात येत आहे. यासाठी राज्यात आयोजित स्पर्धेला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २० हजार ९० जणांनी यात सहभाग घेतला. जिल्हा आणि विभागीय स्तरावर यांची स्पर्धा झाली असून आता राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 263 उमेदवार सहभागी होत आहेत. तरुणांमधील नवसंकल्पना आणि उद्योजकतेला चालना देणारी इंडिया स्किल्स महाराष्ट्र 2021 ही सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा असून कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

            मंत्रालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्माकौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहराष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सिनियर हेड जयकांत सिंह उपस्थित होते.

            प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजीलँडस्केप गार्डनिंगइंडस्ट्रियल कंट्रोलएअरक्राफ्ट मेंटेनन्सआयटीअॅग्रीकल्चरफ्लोरिस्ट्री यासारख्या कौशल्य व्यवसायांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कौशल्य स्पर्धेची अंतिम फेरी 45 कौशल्य श्रेणींमध्ये 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता कुर्लामुंबई येथील डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे होणार आहे. तर रविवार 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता लोअर परेलमुंबई येथील आयएसएमई स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप येथे समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. येथे राज्यस्तरीय चॅम्पियन्सना रोख बक्षीसे आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईलअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

            या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेमुळे युवक-युवतीमधील नवसंकल्पना आणि त्यांच्यातील उद्यमशीलता यांना चालना मिळेलअसा विश्वास मंत्री श्री. मलिक यांनी व्यक्त केला.

            स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2018 मध्ये झालेल्या राज्य कौशल्य स्पर्धेच्या 2400 इतक्या नोंदणी तुलनेत यंदाची संख्या 700 टक्के पेक्षा जास्त आहे. स्पर्धेचे नियोजन तीन फेऱ्यांमध्ये करण्यात आले. लेव्हल 1 ची स्पर्धा जिल्हास्तरावर 17 ऑगस्टपासून झाली. ही फेरी सर्व जिल्ह्यांतील विविध आयटीआय आणि प्रशिक्षण केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या फेरीनंतर 263 उमेदवार अंतिम फेरीसाठी पात्र झाले आहेत. हे अंतिम स्पर्धक आता राज्यस्तरीय अंतिम फेरीत 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान मुंबईपुणे आणि इतर शहरांमधील विविध कौशल्य प्रशिक्षण अकादमी तथा केंद्रांवर स्पर्धेत सहभाग घेतील.

            महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेतील जवळपास 100 विजेत्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इंडिया स्किल्स 2021 विभागीय स्पर्धेत आणि पुढे डिसेंबर 2021 मध्ये इंडिया स्किल्स राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. इंडिया स्किल्स 2021 मधील विजेत्यांना वर्ल्ड स्किल्ससह विविध आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. ऑलिम्पिकच्या बरोबरीने कौशल्यामध्ये वर्ल्ड स्किल्स ही व्यावसायिक कौशल्यांची जागतिक स्पर्धा आहे आणि दर दोन वर्षांनी जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आयोजित केली जाते. वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनलची पुढील आवृत्ती ऑक्टोबर 2022 मध्ये चीनच्या शांघाय येथे आयोजित केली जाणार आहे ज्यामध्ये 60 हून अधिक देश सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

            यापुर्वी रशियाच्या काझान येथे आयोजित वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनल 2019 स्पर्धेमध्ये भारतीय संघाने एक सुवर्णएक रौप्य व दोन कांस्य आणि १५ उत्कृष्ट सादरीकरणाची पदके अशा एकूण १९ पदकांवर आपले नाव कोरून ६३ देशांमधून तेराव्या स्थानी येण्याचा बहुमान पटकावला होता. महाराष्ट्राने १ कांस्य आणि ३ उत्कृष्ट सादरीकरणाची अशी एकूण ४ पदके मिळविली होती. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतही राज्यातील अधिकाधिक युवकयुवतींना संधी मिळावी यासाठी विविध स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

००००

कौशल विकास मंत्री श्री नवाब मलिक ने राज्य की सबसे बड़ी

कौशल प्रतियोगिता इंडिया स्किल्स महाराष्ट्र 2021 की घोषणा की;

शंघाई 2022 में होने वाली वर्ल्डस्किल्स चैंपियनशिप के लिए

युवाओं को प्रतिस्पर्धा के लिए तैयार करना

 

·       महाराष्ट्र राज्य कौशल प्रतियोगिता 3 से 5 सितंबर 2021 तक आयोजित की जाएगी

·       45 कौशल श्रेणियों में प्रतिस्पर्धा के लिए 263 फाइनलिस्ट

 

            मुंबई, 02 सितंबर, 2021: मुंबई में आयोजित एक संवाददाता सम्मेलन मेंमाननीय कौशल विकासरोजगार और उद्यमिता मंत्रीश्री नवाब मलिक ने घोषणा की कि राज्य की सबसे बड़ी कौशल प्रतियोगिता - इंडियास्किल्स महाराष्ट्र 2021 युवाओं को विश्व कौशल अंतर्राष्ट्रीय प्रतियोगिता के लिए प्रतिस्पर्धा करने के लिए तैयार कर रहा है जो अक्टूबर 2022 में शंघाईचीन में आयोजित की जाएगी।

            श्री नवाब मलिक ने यह भी कहा कि महाराष्ट्र राज्य कौशल प्रतियोगिता का फाइनल राज्य भर में कई स्थानों पर 3 से 5 सितंबर तक 45 कौशल श्रेणियों में आयोजित किया जाएगा।

            महाराष्ट्र के कौशल विकासरोजगार और उद्यमिता मंत्री श्री नवल मलिक ने कहा किमहाराष्ट्र राज्य कौशल प्रतियोगिता युवाओं को शंघाई (चीन) में अगले साल की विश्व कौशल प्रतियोगिता में भाग लेने का अवसर देती है। इस प्रतियोगिता ने राज्य के युवाओं को अपने कौशल का प्रदर्शन करने के लिए एक मंच प्रदान किया है। यह देखना उत्साहजनक है कि प्रतियोगिता में राज्य भर से लगभग 20,090 युवाओं ने भाग लिया है। प्रत्येक चरण के योग्य उम्मीदवारों को सरकार द्वारा मुफ्त प्रशिक्षण और नकद पुरस्कार दिया जाएगा।

            इस वर्ष प्रतियोगिता के लिए राज्य को जबरदस्त प्रतिक्रिया मिली हैजिसमें सभी 36 जिलों से 17-25 वर्ष आयु वर्ग के युवाओं से 20,090 पंजीकरण हुए हैं। यह 2018 में अंतिम राज्य कौशल प्रतियोगिता की तुलना में 700% से अधिक की वृद्धि हैजिसमें 2,400 पंजीकरण हुए थे।

            महाराष्ट्र की सबसे बड़ी कौशल प्रतियोगिता 17 अगस्त से जिला स्तर पर लेवल-1 से शुरू होकर तीन राउंड में आयोजित की गई है। यह राउंड सभी जिलों के विभिन्न आईटीआई और प्रशिक्षण केंद्रों पर आयोजित किए गए थे। 23-24 अगस्त को दूसरे स्तर के दौर के बाद, 263 प्रतिभागियों ने अंतिम दौर के लिए क्वालीफाई किया है और अंतरराष्ट्रीय मानकों के अनुसार अभिविन्यास और कौशल प्रशिक्षण से गुजर रहे हैं। ये फाइनलिस्ट अब 3 से 5 सितंबर तक मुंबईपुणे और अन्य शहरों में विभिन्न कौशल प्रशिक्षण अकादमियों / केंद्रों में राज्य स्तरीय फाइनल में प्रतिस्पर्धा करेंगे।

            महाराष्ट्र राज्य कौशल प्रतियोगिता के लगभग 100 विजेताओं को सितंबर-अक्टूबर में होने वाली इंडिया स्किल्स 2021 क्षेत्रीय प्रतियोगिता और बाद में दिसंबर 2021 में इंडिया स्किल्स राष्ट्रीय प्रतियोगिता में भाग लेने का अवसर मिलेगा।

            महाराष्ट्र राज्य कौशल विकास सोसाइटी (MSSDS), कौशल विकासरोजगार और उद्यमशीलता विभागमहाराष्ट्र सरकार के मार्गदर्शन में राज्य में कौशल पहलों को लागू करने के लिए एक नोडल एजेंसी है जिसने 15 उच्च आर्थिक विकास क्षेत्रों में 45 कौशल में महाराष्ट्र राज्य कौशल प्रतियोगिता का आयोजन किया है। ये कौशल प्रतियोगिताएं फ्लोरिस्ट्रीप्रिंट मीडिया टेक्नोलॉजीलैंडस्केप गार्डनिंगइंडस्ट्रियल कंट्रोलएयरक्राफ्ट मेंटेनेंसआईटीएग्रीकल्चर जैसे स्किल ट्रेड्स में आयोजित की गई हैं।

            इंडिया स्किल्स 2021 के विजेताओं को वर्ल्ड स्किल्स सहित विभिन्न अंतरराष्ट्रीय कौशल प्रतियोगिताओं में देश का प्रतिनिधित्व करने का अवसर मिलेगा। कौशल में ओलंपिक के समकक्षवर्ल्ड स्किल्स व्यावसायिक कौशल की विश्व चैंपियनशिप हैऔर दुनिया के विभिन्न हिस्सों में हर दो साल में आयोजित की जाती है। वर्ल्ड स्किल्स इंटरनेशनल का अगला संस्करण अक्टूबर 2022 में शंघाईचीन में आयोजित होने वाला हैजिसमें 60 से अधिक देशों के भाग लेने की उम्मीद है।

            इंडिया स्किल्स प्रतियोगिताएं राष्ट्रीय कौशल विकास निगम (एनएसडीसी) द्वारा आयोजित की जाती हैंजो कौशल विकास और उद्यमशीलता मंत्रालय (एमएसडीई) के तत्वावधान में काम करने वाला एक शीर्ष कौशल विकास संगठन है। एनएसडीसी 2011 से वर्ल्ड स्किल्स अंतर्राष्ट्रीय प्रतियोगिताओं में भारत की भागीदारी का प्रतिनिधित्व कर रहा है। रूस के कज़ान में आयोजित वर्ल्ड स्किल्स इंटरनेशनल 2019 मेंभारत ने एक-एक स्वर्ण और रजत पदकदो कांस्य और 15 उत्कृष्टता पदक जीते हैं। 63 देशों में भारत 13वें स्थान पर है।

0000


 

Minister for Skill Development Shri Nawab Malik announces state’s biggest skill competition - IndiaSkills Maharashtra 2021

Preparing youth to compete for WorldSkills championship to be held in Shanghai 2022

Maharashtra State Skill Competition will be held from 3 to 5 September 2021

 

            Mumbai, September 02, 2021:  At a press conference held in Mumbai, Hon’ble Minister for Skill Development, Employment and Entrepreneurship, Shri Nawab Malik announced that the state’s biggest skill competition – IndiaSkills Maharashtra 2021 is preparing the youth to compete for WorldSkills International Competition that will be held in October 2022 in Shanghai, China.

            Shri Nawab Malik also said that the Maharashtra State Skill Competition finals, to be held in 45 skill categories, to be organised from 3 to 5 September at multiple locations across the state. 

            Shri Nawal Malik, Minister for Skill Development, Employment and Entrepreneurship, Maharashtra, expressed, “Maharashtra State Skill Competition gives an opportunity to the youth to participate in next year's World Skills Competition in Shanghai (China). The competition has provided a platform for the youth of the state to showcase their skills.  It is encouraging to see that nearly 20,090 youth from all over the state have participated in the competition. Eligible candidates from each stage will be given free training and cash prizes by the government.” 

            The state has received tremendous response for the competition this year, witnessing 20,090 registrations from the youth in the age group of 17-25 years, from all 36 districts. This is an increase of over 700% versus the last state skill competition in 2018, which saw 2,400 registrations. 

            Maharashtra’s biggest skill competition has been planned in three-rounds, beginning from level-1 at district level on 17 August. This round was held at various ITIs and training centres across all the districts. Post the second-level round on 23-24 August, 263 participants have qualified for the state-level competition and are undergoing orientation and skill training as per the international standards.  These finalists will now be competing at the state level finale from 3 to 5 September at various skill training academies/centres in Mumbai, Pune and other cities. 

            Nearly 100 winners of Maharashtra state skill competition will get a chance to participate at the IndiaSkills 2021 regional competition to be held in September-October and later at the IndiaSkills National Competition in December 2021.

            The opening ceremony of the state-level competition will be held on Friday, 3 September from 3:00 PM, at Don Bosco Industrial Training Institute, Kurla, Mumbai.  The closing ceremony will be organized on Sunday, 5 September, 4:00 pm onwards at ISME School of Management & Entrepreneurship, Lower Parel, Mumbai where the state-level champions will be awarded with a cash prize and certificate.  The audience will be able to watch the LIVE streaming of the opening and closing ceremonies on youtube @maha_sdeed and Facebook @ maha_sdeed

            Maharashtra State Skill Development Society (MSSDS), a nodal agency for implementing the skilling initiatives in the state, under the guidance of the Skill Development, Employment and Entrepreneurship Department, Government of Maharashtra, has organised Maharashtra state skill competition in 45 skills in 15 high economic growth sectors. These skill competitions have been organised in skill trades such as Floristry, Print Media Technology, Landscape Gardening, Industrial Control, Aircraft Maintenance, IT, Agriculture, among others. 

            The winners of IndiaSkills 2021 will further get an opportunity to represent the country at various international skilling competitions, including the WorldSkills.  The equivalent of Olympics in skills, WorldSkills is the world championship of vocational skills, and is held every two years in different parts of the world.  The next edition of WorldSkills International is scheduled to be held in October 2022 in Shanghai, China wherein 60+ countries are expected to participate.

            IndiaSkills Competitions are organised by the National Skill Development Corporation (NSDC), an apex skill development organisation working under the aegis of the Ministry of Skill Development and Entrepreneurship (MSDE).  NSDC has been representing India’s participation in the WorldSkills International Competitions since 2011.  At the WorldSkills International 2019, held in Kazan, Russia, India won one gold and silver medals each, two bronze and 15 Medallions of Excellence. India ranked 13th among 63 countries.

 गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीतमात्र नागरिकांनी गर्दी केली तर

पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय

                               -उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती व उपाययोजनांचा आढावा

  पुणेपिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यावर शासनाचा भर

 कोरोनाबाधित रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही

 पर्यटनस्थळी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश

 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात मोठे यश

            पुणेदि. 3 : पुणेपिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढीवर शासनाचा भर असून  प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावेअसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध लावण्यात येणार नाहीतमात्र नागरिकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेण्यात येईलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

            पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेजि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरेपुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळपिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरेखासदार गिरीश बापटआमदार ॲड. अशोक पवारआमदार चेतन तुपेआमदार भीमराव तापकीरआमदार सुनील टिंगरेआमदार सिध्दार्थ शिरोळेआमदार मुक्ता टिळक तसेच विभागीय आयुक्त सौरभ रावयशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगमपुणे मनपा आयुक्त विक्रम कुमारपिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटीलजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखमनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडेपोलिस आयुक्त अमिताभ गुप्तापोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशजिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुखजि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसादपिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदिंसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            पुणे जिल्ह्यातील कोविड लसीकरणाबाबत समाधान व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकोरोना प्रतिबंधक लसीकरण गतीने करण्यावर शासनाचा भर आहे. सामाजिक दायित्वातून क्रांतीदेवी बजाज ट्रस्टने दिड लाख लस दिलीहे कौतुकास्पद आहे. स्वंयसेवी संस्थांचे अशा कार्यातील योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय जेव्हा होईल तेव्हापर्यंत सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात मोठे यश आले आहे. खाजगी संस्थांमध्येही लसीकरणाचे प्रमाण वाढवाअसे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

          उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी आपण सर्वजण गत दीड वर्षांपासून सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. महानगरासह ग्रामीण भागात काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येऊ शकते. ही संभाव्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. मात्रतिसरी लाट येऊ नये यासाठी नियमांचे पालन अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कस्वच्छतासुरक्षित अंतर यांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

            विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत लहान मुलांची काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच रुग्णालयातील बेड उपलब्धता तसेच आरोग्य योजनाबाबतचा तपशीलसंपर्क क्रमांक याबाबत दर्शनी भागात फलक लावावेतअसे निर्देश त्यांनी दिले.

          खा.गिरीश बापट यांनी ग्रामीण भागात उपचाराच्या सुविधा सुसज्ज ठेवाजेणेकरून ग्रामीण भागातील रुग्णांना त्याठिकाणीच व्यवस्थितपणे उपचार मिळतीलअसे सांगितले.

          यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळपिंपरी चिंचवडच्या महापौर. उषा उर्फ माई ढोरे,  आमदार ॲड. अशोक पवारआमदार चेतन तुपेआ. भीमराव तापकीरआ. सुनील टिंगरेआमदार सिध्दार्थ शिरोळेआ. मुक्ता टिळक यांनीही महत्वाचे विषय मांडले.

          विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदरप्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनानागरिकांची नमुना तपासणीबाधित रुग्णरुग्णालयीन व्यवस्थापनलसीकरण सद्यस्थितीम्युकरमायकोसिसचा रुग्णदरमृत्युदर तसेच संभाव्या तिस-या लाटेचा धोका लक्षात घेत नियोजन याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

          पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त  राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

          जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्हयातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली.  बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 बृहन्मुंबई हद्दीत 24 सप्टेंबरपर्यंत

शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

 

          मुंबईदि. 02 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 (1) (2), कलम 2 (6) आणि कलम 10 (2) नुसार बृहन्मुंबई हद्दीत 24 सप्टेंबर 2021 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.

            या आदेशानुसार नागरिकांना शस्त्रसोटेतलवारीभालेपरवानेरहित बंदुकासुऱ्याकाठ्या- लाठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणेदगड किंवा अस्त्रसोडावयाची अस्त्रेफेकावयाची हत्यारेअग्नीशस्त्रे बरोबर घेणेजमा किंवा तयार करणेकोणतेही दाहक पदार्थ  किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणेव्यक्तीची अगर प्रेते किंवा त्याच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणेसार्वजनिक रितीने घोषणा करणेगाणी म्हणणेवाद्य वाजविणेसभ्यता अगर नितीविरुद्ध असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल अशी भाषणेहावभाव करणेसोंग आणणे अशी चित्रे - चिन्हेफलक अगर इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे अशा बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे.या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

                शासकीयनिमशासकीय किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये सेवा बजावत असताना कर्तव्याच्या स्वरुपामुळे वरील शस्त्रे बाळगणे आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना हा आदेश लागू असणार नाही. खाजगी सुरक्षा रक्षकगुरखाचौकीदार आदींना साडेतीन फूट लांबीपर्यंतची लाठी बाळगण्यास मनाई असणार नाहीअसेही एस. चैतन्य बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

000

Featured post

Lakshvedhi