Monday, 30 August 2021

 सोमवार

जन्माष्टमी


भगवान श्री कृष्णा बद्दल उत्कृष्ट माहिती


1) श्रीकृष्णाचा जन्म *5252 वर्षांपूर्वी झाला *

2) *जन्मतारीख *: *18 जुलै, 3228 ईसा पूर्व *

3) महिना: *श्रावण *

4) दिवस: *अष्टमी *

५) नक्षत्र: *रोहिणी *

6) दिवस: *बुधवार *

7) वेळ: *00: 00 सकाळी *

8) श्री कृष्ण *125 वर्षे, 08 महिने आणि 07 दिवस जगले. *

9) *मृत्यूची तारीख *: *18 फेब्रुवारी 3102 ईसा पूर्व*

10) जेव्हा कृष्ण * 89 वर्षांचे * होते; महायुद्ध * (कुरुक्षेत्र युद्ध) * झाले.

11) कुरुक्षेत्र * युद्धानंतर 36 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.

12) कुरुक्षेत्र युद्ध *मृगशिरा शुक्ल एकादशी, 3139 रोजी सुरु झाले होते.

12) 21 डिसेंबर 3139  ईसा पूर्व रोजी "दुपारी 3 ते संध्याकाळी 5" दरम्यान *सूर्यग्रहण होते; जयद्रथच्या मृत्यूचे कारण.*

13) भीष्म *2 फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), 3138 ईसा पूर्व *मरण पावले *


14) कृष्णाची पूजा केली जाते:

(a) कृष्ण *कन्हैया *: *मथुरा *

(b) *जगन्नाथ *:- *ओडिशा मध्ये *

(c) *विठोबा *:- *महाराष्ट्रात *

(d) *श्रीनाथ *: *राजस्थान मध्ये *

(e) *द्वारकाधीश *: *गुजरात *मध्ये

(f) *रणछोड *: *गुजरात *मध्ये

(g) *कृष्णा *: *कर्नाटकातील उडुपी *

h) *केरळमधील गुरुवायुरप्पन *


15) *पिता *: *वासुदेव *

16) *आई *: *देवकी *

17) *दत्तक पिता *:- *नंदा *

18) *दत्तक आई *: *यशोदा *

19 *मोठा भाऊ *: *

*बलराम*

20) *बहीण *: *सुभद्रा *

21) *जन्म ठिकाण *: *मथुरा *

22) *धर्मपत्नी *: *रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मण *

२३) कृष्णाने त्याच्या आयुष्यात फक्त ४ लोकांना ठार मारल्याची नोंद आहे.

(i) * चानूर *; पैलवान

(ii) * कंस *; त्याचे मामा

(iii) & (iv) * शिशुपाल आणि दंतवक्र *; त्याचे चुलत भाऊ.

24) जीवन त्यांना अजिबात योग्य नव्हते. त्याची *आई *उग्रा कुळातील *होती, आणि *वडील * *यादव कुळातील, .

25) श्याम वर्णीय. संपूर्ण गोकुळ गाव त्यांना; *कान्हा* म्हणून बोलवायचे.काळा, लहान आणि दत्तक असल्याबद्दल त्याची खिल्ली उडवली गेली आणि त्याची छेड काढण्यात आली. त्याचे बालपण जीवघेण्या परिस्थितीने घडले.

26) *'दुष्काळ' आणि "जंगली लांडग्यांचा धोका" त्यांना वयाच्या 9 व्या वर्षी 'गोकुळ' वरून 'वृंदावन' मध्ये हलवले

27) तो 10 वर्षे 8 महिने *पर्यंत वृंदावनात राहिले. त्याने मथुरा येथे वयाच्या 10 वर्षे आणि 8 महिन्यांच्या वयात आपल्याच काकांना ठार मारले, त्यानंतर त्याने आपल्या आई आणि वडिलांना सोडले.

२)) ते पुन्हा कधीही वृंदावनात परत ले नाही.

29) सिंधू राजाच्या धमकीमुळे त्याला मथुरेहून द्वारकाला स्थलांतर करावे लागले; कला यावना.*

30) त्याने गोमंतक टेकडीवर (आता गोवा) 'वैनाथेय' जमातींच्या मदतीने जरासंधाचा पराभव केला. *

31) त्याने *द्वारकाची पुनर्बांधणी केली *.

३२) त्यानंतर ते १ age ~ १ age वयाचे शालेय शिक्षण सुरू करण्यासाठी * उज्जैन येथील सांदीपनीच्या आश्रमात गेले.

33) त्याला आफ्रिकेतील समुद्री चाच्यांशी लढावे लागले आणि त्याच्या शिक्षकांच्या मुलाला सोडवावे लागले; पुनारदत्त*; प्रभासाजवळ * कोणाचे अपहरण झाले होते; गुजरातमधील समुद्री बंदर.

34) शिक्षणानंतर त्याला वनवासच्या आत्ये भावांच्या नशिबाची माहिती मिळाली. '' वॅक्स हाऊस '' मध्ये तो त्यांच्या मदतीला आला आणि नंतर त्याच्या आत्ये भावांनी * द्रौपदीशी लग्न केले. * या गाथेत त्यांची भूमिका प्रचंड होती.

३५) मग, त्याने आपल्या आत्ये भावांना इंद्रप्रस्थ आणि त्यांचे राज्य स्थापन करण्यास मदत केली.


36) त्याने *द्रौपदीला लाजिरवाण्यापासून वाचवले. *


३)) तो त्याच्या आत्ये भावांना त्यांच्या वनवासात उभा राहिला.

38) तो त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि *त्यांना कुरुक्षेत्र युद्ध जिंकून दिले. *


३)) त्याने *आपले प्रिय शहर पाहिले, द्वारका वाहून गेला. *

40) त्याला जवळच्या जंगलात * एका शिकारीने (जरा नावाने) ठार केले.

41) त्याने कधीही चमत्कार केले नाहीत, त्याचे आयुष्य यशस्वी नव्हते. असा एकही क्षण नव्हता जेव्हा तो आयुष्यभर शांत होता. प्रत्येक वळणावर त्याला आव्हाने आणि त्याहूनही मोठी आव्हाने होती.

42) त्याने *प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येकाचा जबाबदारीच्या भावनेने सामना केला आणि तरीही तो अटळ राहिला. *


43) तो एकमेव व्यक्ती आहे, ज्याला भूतकाळ आणि भविष्य माहित होते; तरीही तो नेहमी त्या वर्तमान क्षणी जगला.*


44) तो आणि त्याचे जीवन खरोखरच *प्रत्येक मनुष्यासाठी एक उदाहरण आहे. *


*जय श्री कृष्ण*

 जरूर वाचा...

भाजीवाली रोजच्या सारखी दुपारी दारात आली आणि ओरडून विचारले, "भाजी घ्यायची का मावशी?"

आई आतून नेहमी सारखी ओरडली, "काय आहे भाजीला?"


"गवार हाय, तंबाटी, पालक,...." एवढे बोलताच आई म्हणाली, "थांब आले"


दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, "पालक कसा?"


रुपयाची गड्डी - भाजीवाली

पन्नास पैशाला दे, चार घेते - आई

नाय जमणार मावशी - भाजीवाली

मग राहुदे - आई


भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. "बारा आण्याला दिन - भाजीवाली

नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते - आई

नाय जमणार - भाजीवाली

आणि पुन्हा गेली


थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तीला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून परिक्षण करुन चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले. भाजीवाली भारा उचलायला लागताच तीला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, "जेवली का नाही?"


नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेउन , मग सैपाक, मग जेवण - भाजीवाली


थांब जरा. बस इथं. मी आणते." म्हणत आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळ दिले. पाणी पिऊन भाजीवाली गेली.


मला राहवलं नाही. मी आईला विचारले, "तु एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केली पण नंतर जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तीला खायला दिले."*


आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले...


व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये

 राज्यात विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करतांना

स्थानिकांसाठी रोजगार संधी

                                                                                                              - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       गुंतवणूकदारांना आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

 

            मुंबई दिनांक 26: राज्यातील प्रादेशिक वैशिष्ट्येसाधनसामग्रीची उपलब्धता लक्षात घेऊन कोणत्या विभागात कोणते उद्योग सुरु करता येतील,  हे निश्चित करण्यासाठी राज्याचा विभागनिहाय ‘उद्योग मॅप’ तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या असून या आरखड्याची निश्चिती झाली की आवश्यक त्या सोयी सुविधा उद्योगांना उपलब्ध करून देण्यात येतीलया माध्यमातून स्थानिकांसाठीच्या रोजगार संधीचा मार्गही प्रशस्त केला जाईल असे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी राज्यशासन गुंतवणूकदाराच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि भविष्यातही राहील अशी ग्वाहीही यावेळी दिली.

            एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरु असलेल्या राज्याच्या औद्योगिक प्रगतीचात्या प्रगतीस पूरक ठरणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी दै. लोकसत्ताने इंडस्ट्रीयल कॉन्क्लेव्ह 2021 चे आयोजन केले होते, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उद्योग मंत्री सुभाष देसाईउद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरेसीआयआयचे अध्यक्ष टी.व्ही नरेंद्रनलोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरयांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर तसेच अधिकारी उपस्थित होते.

            स्थानिकांना विश्वासात घेऊन आणि तिथे उभारण्यात येणाऱ्या उद्योग व्यवसायांची माहिती देऊन हे काम केले जाईल असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की,  दै. लोकसत्ताने अतिशय गरजेच्यावेळी या परिसंवादाचे आयोजन केले आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. कोरोनाच्या आजच्या संकटकाळात आपण आपले जीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत असलो तरी आपल्यासमोर यातून अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत त्यापैकी एक रोजीरोटीचे आहे. महाराष्ट्राने या आव्हानाचे संधीत रुपांतर करतांना कोरोनाच्या काळातही उद्योग व्यवसायांना दिलासा देण्याचे काम केल्याचे व अनेक नवनवीन उपक्रम सुरु केल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे म्हणाले, आज कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झालेला  दिसत असतांना आपण हळुहळु काही गोष्टी सुरु केल्या आहेत. हा मधला काळ मागे वळून पाहण्यासाठीचा आहे. आपण काय केले आणि काय केले पाहिजे या धोरणात्मक बाबींच्या निश्चितीसाठी हा वेळ उपयोगी लावला जात असून महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी  आपलेपणाची भावना घेऊन पुढे आला आहे. हे राज्य आपल्यापैकी काही जणांची जन्मभूमी आहे पण अनेकांची कर्मभूमीही आहे.  या कर्मभूमीची सुबत्ता वाढवण्याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. त्यांनी महाराष्ट्राला आपलं समजून या राज्यात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने देश आणि जगाच्या पातळीवर या राज्याचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून काम करावे अशी अपेक्षाही श्री.ठाकरे यांनी व्यक्त केली.

            राज्यात उद्योगस्नेही वातावरणाची निर्मिती करण्याला शासनाने प्राधान्य दिल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी उद्योगांना देण्यात येत असलेल्या सुविधांची तसेच यासंबंधाने घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. एक खिडकी योजनाउद्योग मित्रांची नियुक्तीकुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. उद्योगांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणेवीजेचे दर कमी करणे यासारख्या विषयांवरही शासन काम करत आहे परंतु असे निर्णय घेतांना राज्याचा समतोल विकास होईल याकडेही लक्ष द्यावे लागतेसर्वसामान्य नागरिकांसह अनेक क्षेत्रांकडेही लक्ष देणे गरजेचे असते याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

            मुख्यमंत्र्यांनी पर्यटनक्षेत्रात अमाप रोजगार संधी दडल्या असल्याचे सांगतांना पर्यटनक्षेत्राला आदरातिथ्य उद्योगाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती दिली. काळाप्रमाणे रोजगाराची अनेक क्षेत्र उदयाला येत असून त्याकडेही लक्ष देण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

कोरोना कालावधीत सक्षम नेतृत्व - उद्योगमंत्री सुभाष देसाई

            मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या कठीण कालावधीमध्ये राज्याला सक्षम आणि आर्थिक विकासाचा विचार करणारे नेतृत्व दिले असे उद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काढले.

            श्री देसाई म्हणालेजीवन वाचविण्याचे लक्ष आपल्यासमोर आहे. अचानक टाळेबंदी जाहीर झाल्यानंतरच राज्यातील उद्योजकांची बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेण्यात आले आणि राज्याचे अर्थचक्र सुरळीत ठेवण्यात आले.

राज्यात नवे उद्योग राज्यात

            राज्यातील प्रस्थापित उद्योगांसोबतच नवे उद्योग राज्यात सुरू होत असल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, आयुष्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनाने औषधी वनस्पतीवर आधारीत उद्योग कुडाळ येथे सुरू होत आहे. नासिक येथे रिलायन्सची जैविक विज्ञानावर आधारित संशोधनासाठी साडेपाच कोटीची गुंतवणूक झाली आहेयवतमाळ येथे 60 हजार 500 कोटी रूपयांचा विटाल ग्रुपचा वीज प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याचबरोबर गेल इंडिया ‘ ने अलिबाग जवळ सिएनजी व इंधन निर्मितीच्या प्रकल्पाची सुरूवात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

            ऑक्सिजन क्षेत्रात सक्षम होण्यासाठी प्राणवायु निर्मीतीचे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आतापर्यंत सुमारे 60 कंपन्यांची भूखंड मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दुर्गम भागांत काम करू इच्छिणाऱ्या उद्योगांवर दिडशे टक्के परतावा देण्यात येणार असल्याचे श्री देसाई यांनी सांगितले.

            तळेगाव पार्क जवळ इलेक्ट्रॉनिक्स पार्क तयार होत आहे,राज्यात डेटा सेंटर तयार होत आहेमिहान मध्ये एअरबस प्रकल्प येऊ घातला आहेऔरंगाबादमध्ये बिडकीन येथे अन्नप्रक्रिया उद्योग सुरू होणार आहे.त्याचप्रमाणे राष्ट्राच्या सकल उत्पन्नात भर टाकणारा मोठा असा सेवा उद्योग क्षेत्रात गुंतवणूकीसाठी अनेक मोठे उद्योग राज्यात येण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचा उद्योग विभाग सज्ज आहे.

            खादी ग्रामोद्योगमहिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून तयार होणारे ग्रामिण कलावंतांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तुंना फ्लिपकार्ट, ॲमेझॉनइकाई सारख्या सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून दिली आहे.

            राज्यातील 60 टक्के नागरिक हे 35 वर्षाखालील आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारी आहे. यासाठी महाजॉब पोर्टल सारख्या माध्यमातून रोजगारासाठी सहकार्य करण्यात येते. राज्य हे खऱ्या अर्थाने मॅग्नेटिक महाराष्ट्र आहे. असेही उद्योगमंत्री म्हणाले.

रोजगार निर्मितीसह प्राण वाचविणारा विभाग - अदिती तटकरे

            राज्याचे अर्थचक्र सुरू ठेवण्याबरोबरच ऑक्सिजन निर्मीती करून लोकांचे प्राण वाचविण्याचे काम उद्योग विभागाने केले आहे.असे उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या.

            राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, राज्यात टाळेबंदी असतांना देखील उद्योगक्षेत्र अहोरत कार्यरत होते. आरोग्यविभागाच्या बरोबरीनेच कोविड रुग्णांसाठी उद्योग विभाग आणि उद्योजकांनी कार्य केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरही राज्यावर उद्योजकांनी विश्वास ठेवला आणि ५६ सामंजस्य करारआणि सुमारे १ लाख ३० हजार कोटीची गुंतवणूक राज्यात झाली. राज्यातील औद्योगिक विकासात महिलांचे योगदान वाढावे यासाठी विशेष प्रोत्साहन देणारी योजना राज्यातर्फे राबविली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक महागाथेचाऔद्योगिक प्रगती आणि तिला पूरक पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी लोकसत्ताच्या वतीने इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ चे आयोजन करण्यात आले आहे. या बहुसत्रीय परिषदेत राज्याच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेतला जात असून रूपरेखा मांडली जात आहे. या परिसंवादातून औद्योगिक क्षेत्रातील बदल व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे याचा आराखडा समोर आणण्याचा प्रयत्न आहे.

            देशातील औद्योगिक उत्पादनाच्या 15 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते आणि या क्षेत्रातून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी जवळपास 40 टक्के महसूल हा महाराष्ट्रातून मिळतो. स्वातंत्र्यानंतर सात दशके महाराष्ट्राने विविध उद्योगांच्या विकासाचे सारथ्य केले. अनेक मोठे उद्योग-हजारो लघु व मध्यम उद्योग व त्यात काम करणारे लाखो अधिकारी-कर्मचारी असा महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आहे. कोरोनाच्या काळात आता अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्य सरकार उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करत आहे आणि उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या याचा आढावा या कार्यक्रमात घेतला जाणार आहे.

००००

 

 एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा देवेंद्र फडणवीस यांचे पत्र

मुंबई, 30 ऑगस्ट

अनियमित वेतनामुळे एस. टी. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात असून स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून या कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावाअशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात कीएस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याने अनेक कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात आहेत. कुटुंबाचे अर्थचक्र संकटात सापडल्याने नाईलाजाने एस.टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे सुरू केले आहे. अहमदपूरतेल्हाराशहादाकंधार आणि साक्री अशा अनेक ठिकाणी एस.टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी गेल्यावर्षी सुद्धा जळगाव येथे वाहक मनोज चौधरी आणि रत्नागिरी येथे पांडुरंग गडदे या एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या झाल्यानंतर आपल्याशी पत्रव्यवहार केला होता. नाशिक आणि इतरही भागात त्यानंतर आत्महत्यांचे सत्र सुरूच राहिले. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे बेडसे या एसटी कर्मचार्याने  आत्महत्या करताना लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वेतन मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे स्पष्टच लिहून ठेवले आहे. असे असताना परिस्थिती नीट न हाताळता संताप व्यक्त करणार्‍या त्यांच्या संतप्त नातेवाईकांविरूद्धच पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या घटनेने राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

माझी आपल्याला विनंती आहे कीएसटी कर्मचाऱ्यांच्या या व्यथांकडे तातडीने हस्तक्षेप करीत आपण लक्ष द्यावे आणि वेतनाच्या समस्येवर तोडगा काढावा आणि राज्यभरातील या कर्मचार्‍यांना दिलासा द्यावा. केवळ कर्मचारीच नाहीततर त्यांचे कुटुंबीय सुद्धा प्रचंड मानसिक आणि आर्थिक तणावाखाली आहेत. त्यामुळे आपल्या स्तरावर या गंभीर प्रश्नाची तत्काळ सोडवणूक करावीअसे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

 टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत 'सुवर्णवेधघेणाऱ्या अवनी लेखरासह विजेत्या खेळाडूंचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

प्रत्येक भारतीयाला तुमच्या कामगिरीचा अभिमान

 - उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. 30 : टोकियो येथे सुरु असणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरुन अवनी लेखरा भारतासाठी पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. त्याचबरोबर थाळीफेक प्रकारात योगेश कथुनियाने रौप्यपदक तर भालाफेक प्रकारात देवेंद्र झाझारियाने रौप्यपदक आणि सुंदरसिंग गुर्जरने कांस्य पदक जिंकले. श्रीकृष्ण जन्माष्टमी दिनी भारतासाठी पदकांच्या विजयाची हंडी फोडणाऱ्या सर्व विजेत्या खेळाडूंचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

            उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात कीटोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात पदार्पणातच सुवर्णपदक जिंकण्यासह अवनी लेखराने नवे वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा प्रस्थापित केले. थाळीफेक प्रकारात योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले. त्याचबरोबर भालाफेक प्रकारात देवेंद्र झाझारियाने रौप्यपदक आणि सुंदरसिंग गुर्जरने कांस्य पदक जिंकत पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पदकांची लयलूट केली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये विजेत्या खेळाडूंनी पदके जिंकत देशाची मान उंचावली आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केलं आहेत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 *Vaishali* नावाचा अर्थ : *"अशी व्यक्ती आहे जी त्यांच्या शत्रूंवर देखील प्रेम करते."* 😀


अशा प्रकारे तुमच्या नावाचा खरा अर्थ शोधा

👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

*https://marathi.mallu.fun/name/?meaning*

 BHAGWAD GITA is a manual of life. Where KRISHNA teaches, that when we resolve our doubts uncertainties and confusions within,   we improve and enhance our own standards of excellence, and that inspires us to VALUE the SELF.  Happy Shri Krishna Jayanti 🌹🌹

Featured post

Lakshvedhi