Thursday, 19 August 2021

 Jai bharat,jai maharashtra✌️ *Relations Do Not Shine By Just Shaking Hands In The Best Time.*

*But*

*Relations Shine By Holding Hands, In Critical Times!!*

*Good morning 😊*

: "*NO & YES are two shortest answers which need a long thought.*

*Most of the things we miss in life is only because of saying,*

*NO too early & YES too late."*

*Good Morning *🚴‍♀️🚴‍♂️

 *माणूस*

आयुष्यात आपल्याला काय कमवायचंय हे कळलं पाहिजे! एकाच घरातील सहा-सहा लोक कोरोनाने गेले... माणसाची किंमत कळायला एवढे लोक जाणं गरजेचं होतं का?

       एकेकाळी चक्रवर्ती समजल्या जाणाऱ्या राजांची आज समाधी कुठे सापडत नाही आणि सापडलीच तर त्यावर फुल व्हायला माणूस सापडत नाही! कालचक्र खूप मोठं आहे, एक जिवंत व्यक्ती म्हणून आपली किंमत त्यापुढे एखाद्या धुलीकणापेक्षाही खूप छोटी आहे. कोरोनाने दाखवून दिलं की, कोणीही सहज मरू शकतो! श्रीमंत, गरीब, वृद्ध, तरुण, पुरूष, स्त्री, वयस्क, मूल, आई, वडील, भाऊ बहीण... जिवंत असलेला प्रत्येकजण अवेळी मरू शकतो हा संदेश या आजाराने दिला!

      या आजाराची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे, या लाटेची दाहकता आपण पाहिली आहे.‌ प्रत्येकाच्या जवळची किमान एक व्यक्ती या लाटेत गेली. पुढील तिसरी, चौथी आणि अशा अनेक लाटा याबद्दल अजूनही अनभिज्ञता आणि भीती आहेच, तरीही आपण 'मीच मोठा' या तोऱ्यात असू तर कुठेतरी चुकतोय. शंभर एकर जमीनीचा मालक दहा वीस मढ्यांसोबत एकाच सरणावर जळून गेला, शेकडोंच्या गोतावळ्यात जिचं तोंड दिसत नव्हतं ती माऊली वारस नसल्यासारखी गेली एकाकी गेली. ज्याच्या हाकेवर गाव‌ गोळा व्हायचा तो अॅम्ब्युलन्समध्ये एका कोपऱ्यात फक्त श्र्वास मिळावा म्हणून तडफडून मेला. असं बोललं जायचं की, याच्या सात पिढ्या बसून खातील तो मात्र पुर्वज आणि वंशज नसल्यासारखा एकटाच गेला!

     जर हे लोक एखाद्या दुर्धर आजाराने किंवा अपघाताने गेले असते तर विषय वेगळा असता, मनाने स्वीकार केला असता पण आठ दिवसांपूर्वी काहीही त्रास नसलेला, चालता-बोलता माणूस गेला ही भावनाच मनाला सहन होत नाही. बरं जी व्यक्ती गेली ती सहजासहजी नाही तर, ज्या गोष्टीची चहूबाजूला मुबलकता आहे अगदी आपल्या शरीराच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणात आहे पण घेऊ शकत नाही त्या अॉक्सिजन अभावी गेली हे किती दु:खद आहे!

     मी बघितलंय या सर्वांना शेवटचा श्वास घेताना, शेवटचा आचका घेताना या सर्व लोकांच्या मनात काय विचार आला असेल? आपली संपत्ती? नातेसंबंध? घर? जमीन? शरीर, कमाई, भविष्य, स्वप्नं... नाव, जात, धर्म? काय आठवलं असेल सर्वात शेवटी? 'फक्त एक... एकच संधी मिळावी, मी माणूस म्हणून जगेल!' असंच वाटलं असेल ना शेवटचा दीर्घ श्वास घेताना? 

     हे सर्व लिहीताना *मी आणि हे वाचताना तुम्ही जिवंत* आहात, आपल्याला अजून एक संधी मिळाली आहे मग आपण *माणूस म्हणून जगत आहोत का?* निसर्ग अधूनमधून माणसाला माणूसपण शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. या महाप्रलयातून आपण वाचलो आहोत आतातरी *माणुसपण शिकायला* काय हरकत आहे की अजून एखाद्या संकटाची वाट बघायचीय?

 अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी

                                      - अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

·       गैरव्यवहार करणाऱ्यांवर कडक कारवाई

·       तीन महिन्यात शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश

            मुंबई दि.18: अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी असे निर्देश मंत्रालयात झालेल्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी दिले.

            जळगाव तसेच नांदेड जिल्ह्यातील 2018 मध्ये उघडकीस आलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या धर्तीवर वाहतूक ठेकेदार यांच्याशी संगनमत करून धान्यांचा काळाबाजार चालू असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. कदम यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

            जळगाव जिल्ह्यातील वाहतूकदार यांनी गोदामांमध्ये पोहोच मालाच्या ई-1 रजिस्टरमधील अभिलेख, या अभिलेखाच्या विविध टोल नाक्यावरील असलेल्या नोंदी, जि पि एस यंत्रणे वापर वाहतूकदार नियमाप्रमाणे करत आहेत का? ठेकेदार यांची वाहने शासनाच्या निकषांची पूर्तता करत आहेत का याबाबत संबंधित परिवहन अधिकारी यांचा अहवाल, अन्नधान्य वितरण करण्यात येणाऱ्या वाहनांना नियमाप्रमाणे हिरवा रंग, PDS चे फलक लावण्यात आले आहेत काजळगाव जिल्ह्यातील धान्यांचे पूर्ण वाटप इ पॉस मशिनद्वारे झाले आहे का आदी बाबींचा डॉ कदम यांनी आढावा घेतला. जळगाव जिल्ह्यातील या बाबतीत अहवाल शासनाला तीन महिन्यात सादर करण्याचे निर्देश डॉ कदम यांनी दिले.

            राज्यमंत्री डॉ. कदम यांनी जिल्ह्यामधील अन्नधान्य वाहतुकीच्या वाहनांवर शासनाच्या निर्देशाप्रमाणे जी.पी.एस. यंत्रणा बसविलेली नसल्यास तसेच माल व्यपगत होण्याची प्रकरणे यासंदर्भात कडक कारवाईचे निर्देश दिले.

            पुढील 3 महिन्यांत सर्व संबंधित वाहतुक व्यवस्थेवर जी.पी.एस. यंत्रणा क्षेत्राची नावे तसेच गैरप्रकाराबाबत तपासणी करुन शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.

            बैठकीला जिल्हाधिकारी श्री. अभिजित राऊतसह सचिवसुधीर तुंगारसुनील सुर्यवंशीजिल्हा पुरवठा अधिकारीश्री,प्रशांत कुलकर्णी,सहायक पुरवठा अधिकारी,आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्याच्या

उपायांबाबत प्राधान्याने विचार करा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

·       भारतीय वनसेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद

 

          मुंबईदि. 18 : - मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळता येईलअशा उपाययोजनांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा. भारतीय वनसेवेत काम करण्याची वेगळी वाट तुम्ही निवडली आहे. त्यामध्ये काहीतरी वेगळे करायचे ध्येय्य ठेवाअसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय वन सेवेतील महाराष्ट्रात नियुक्त परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधला. या संवादादरम्यान मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.  

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणालेजंगलात राहणाऱ्यांचे जंगलावरील अवलंबित्व कसे कमी करता येईलयाचे प्रयत्न व्हायला हवे. त्यांचे पुनर्वसन करावे लागेल. मानव व वन्यजीव हा संघर्ष कसा कमी होईल यासाठीच्या उपाययोजना करायला हव्यात. त्यासाठी महसूलग्रामविकास आणि वनविभाग अशा विविध विभागांनी समन्वय राखावा लागेल. एकीकडे जंगल वाचविणे आणि दुसरीकडे त्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन याचा विचार करणे गरजेचे आहे. जंगल क्षेत्रातील विकासकामांच्या बाबतीत रस्तेरेल्वे मार्ग करताना वन्यजीवांचाही प्राधान्याने विचार करायला हवा. त्यांचे मार्ग सुरक्षित राहतीलअसे पूलउन्नत मार्ग असे पर्याय उभे करावे लागतील. भारतीय वनसेवेत दाखल होण्याचा तुमचा निर्णय वेगळी वाट चोखळणारा आहे. आयुष्यात नवे काही तरी करायचेअसे ठरवा आणि ते निश्चयपूर्वक करा, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले.

          मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वृक्षारोपणजंगल क्षेत्र वाढविण्याचे उपाय तसेच वन्यजीवांचे रक्षण याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेअपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारीराज्याचे मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटेतसेच सहा परिविक्षाधीन अधिकारी आदी उपस्थित होते.


Wednesday, 18 August 2021

 8.66 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे2021 ची परतफेड

 

            मुंबईदि. 18 : महाराष्ट्र शासनवित्त विभागअधिसुचना क्र.एलएनएफ-10,11/प्र.क्र.2/अर्थोपाय दि. 16 सप्टेंबर 2011 अनुसार 8.66 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे2021 अदत्त शिल्लक रकमेची दि. 20 सप्टेंबर,2021 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 21 सप्टेंबर,2021 रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल.परक्राम्य संलेख अधिनियम1881’ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यासराज्यातील अधिदान कार्यालयकर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 21 सप्टेंबर2021 पासुन व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

            सरकारी प्रतिभूती विनियम2007 च्या उप-विनियम 24(2) व 24(3) अनुसारदुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हेइलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करून त्याच्या बँक खात्याचे संबंधित तपशिलासह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठीअशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारकबँकेकड़े किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

            तथापिबँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावीनियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी 8.66% महाराष्ट्र शासन कर्जरोखे2021 च्या धारकांनी लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस खालीलप्रमाणे यथोचितरीत्या नमूद करून ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली

            भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यासते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करू नयेतयाची विशेष नोंद घेतली पाहिजे.

         रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील ठिकाणा खेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना रक्कम स्वीकारायची असेलत्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमा डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेतलोक ऋण कार्यालय हेमहाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील. असे प्रसिद्ध पत्रक वित्तीय सुधारणाचे प्रधान सचिव यांच्याकडून  21 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

0000


 समान काम समान वेतन देण्याबाबत

वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक

 वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

         

          मुंबईदि. 18 : कोविड काळात राज्यातील सर्वच पॅथी डॉक्टरांनी काम केले आहे. त्यामुळे या सर्वांना समान काम समान वेतन मिळावे याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असेासिएशन (निमा) च्या विविध प्रश्नांसंदर्भातील बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण संचालक सौरभ विजयआयुषचे संचालक डॉ. के.कोहलीडॉ. संजय लोंढेडॅा. शैलेश निकमडॉ. आशुतोष कुलकर्णीडॉ. राजेश उतानेडॉ. विनायक टेंभुर्णीकरडॉ.श्रीराम रागडसुहास जाधवमनोज देशमुखअनिल बाजरे आदी उपस्थित होते.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणालेसर्वच पॅथी डॉक्टरांना समान काम आणि समान वेतन मिळावे यासाठी विभाग आग्रही आहे. याशिवाय शासन अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालयाबरोबरच खाजगी आयुर्वेदिक महाविद्यालयातील आंतरवासिता विद्यार्थ्यांनाही समान विद्यावेतन मिळावे यासाठी आग्रह आहे. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असेासिएशन (निमा)वर प्रशासकही लवकरच नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

0000


 लहानग्या आदितीचे मंत्रिमंडळाने केले कौतुक;

पारितोषिकाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

 

            मुंबईदि. 18 : औरंगाबादला सातवी इयत्तेत शिकणाऱ्या आदिती दिपक जाधव या मुलीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तिला डॉ. होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेतली रौप्य पदकाची 2000 रुपयांची पारितोषिकांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली असून या संकटकाळात आपणही काही तरी मदत करावी या भावनेने ‘खारीचा वाटा’ उचलत असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात तिने म्हटले आहे.

            आदितीने आपल्या मदतीचा धनादेश पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे नुकताच दिला होता. मुख्यमंत्र्यांना तिने लिहिलेले पत्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाचून दाखवण्यात आले. यावेळी सर्व मंत्र्यांनी तिचे कौतुक केले.

            पत्रात आदितीने म्हटले आहे कीनुकताच राज्यात महापूर येऊन गेला. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपली धडपड पाहिली. यातून आपले नेतृत्व आणखी उठून दिसले.  जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं वाटलं. खरच अवघड आहे हे सगळंआपले काम पाहून वाटायचंआपण यात खारीचा वाटा उचलला पाहिजेपूरग्रस्तांना मदत केली पाहिजे. मला माहित आहे मी लहान आहेपण मला डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत मिळालेली बक्षीसाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी वाटली आणि म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहे.

            आदितीने दिलेली मदत अनमोल असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिला खुप सारे आशीर्वाद दिले आहेत तसेच  तुम्ही बालमंडळीच या देशाचा भक्कम आधारस्तंभ असल्याचेही म्हटले आहे.

-----०-----



Featured post

Lakshvedhi