Saturday, 14 August 2021

 अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे शालेय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

ऑनलाईन प्रवेशप्रक्रीया राबविण्यासाठी सज्जता

          मुंबईदि.१४: अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणेपुणेनागपूर, अमरावती आणि नासिक शहरातील सुमारे साडे पाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन  प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत.

          पहिल्या फेरीची सुरूवात आजपासून होणार असून २२ ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. दि. १७ ते २२ ऑगस्ट या दरम्यान सिट ची उपलब्धता बघता येईल त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम भरता  येणार आहे.  दि. २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मेरिट लिस्ट लागेल. दि. २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.
दुसऱ्या फेरीची प्रक्रिया दि. ३१ ऑगस्टलातिसरी फेरी दि. ५ सप्टेंबरलाचौथी फेरी दि. १२ सप्टेंबरला होणार आहे. विद्यार्थ्यांना 
https://11thadmission.org.in
या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे.

०००० 

 महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

         

          मुंबईदि. 14 : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे 2019 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

          राज्य शासनाच्यावतीने विकास वार्तांकनासाठी पत्रकारांना दिले जाणारे विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. विकास वार्तांकनासाठी 2019 साठीचा राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार हा दै. युथ सकाळचे संदीप काळे यांना जाहीर करण्यात आला. मुंबईत लवकरच होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

          51 हजार रुपयेप्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे.

पुरस्कार खालीलप्रमाणे :

वर्ष-2019 –

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)- संदीप काळे, संपादक, दै.युथ सकाळ. मुंबई.

अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) – अंजया अनपरतीविशेष प्रतिनिधी, दै. टाइम्स ऑफ इंडिया. नागपूर

बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) – राजन पारकर, वार्ताहर, दै.दोपहर का सामना. मुंबई

मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर) – फरहान हनीफ, उपसंपादक, दै. उर्दू न्यूज, मुंबई.

यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर) – प्रवीण टाकेजिल्हा माहिती अधिकारीचंद्रपूर.

पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)- वेदांत नेबप्रतिनिधी, एबीपी माझा, मुंबई.

तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)- प्रशांत खरोटे, वरिष्ठ छायाचित्रकार, दै. लोकमतनाशिक.

केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.) (राज्यस्तर)-रोहीत कांबळे, छायाचित्रकार, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर.

सोशल मीडिया पुरस्कार (राज्यस्तर)- राहुल झोटे, संपादक, सिंदखेड राजा मिरर.इन (वेब), बुलढाणा.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)-प्रतिभा राजे, उपसंपादक, दै. पुढारीसातारा.

 

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार- रोहिणी खाडिलकर-पोतनीस, संपादक, दै. संध्याकाळ, मुंबई. (51 हजार रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गांवकरीने पुरस्कृत केले आहेत.)

दादासाहेब पोतनीस पुरस्कारनाशिक विभाग- मनोज शेलारवरिष्ठ उपसंपादक,

दै. लोकमतनंदुरबार, नाशिक.

अनंतराव भालेराव पुरस्कारऔरंगाबाद विभाग (लातूरसह)- महेश जोशीविशेष प्रतिनिधी, दै. दिव्य मराठीऔरंगाबाद.

आचार्य अत्रे पुरस्कारमुंबई विभाग –सचिन लुंगसेवरिष्ठ वार्ताहर, दै. लोकमतमुंबई.

नानासाहेब परूळेकर पुरस्कारपुणे विभाग – चैत्राली चांदोरकर, वरिष्ठ पत्रकार,

दै. महाराष्ट्र टाइम्सपुणे

शि. म. परांजपे पुरस्कारकोकण विभाग – हर्षद कशाळकरजिल्हा प्रतिनिधी,

दै. लोकसत्तारायगड.

ग. गो. जाधव पुरस्कारकोल्हापूर विभाग – एकनाथ नाईक, उपसंपादक, दै. पुढारीकोल्हापूर.

लोकनायक बापूजी अणे पुरस्कारअमरावती विभाग – जयंत सोनोनेवार्ताहर, 

दै. दिव्य मराठी, अमरावती.

ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कारनागपूर विभाग – योगेश पांडेउपमुख्य उपसंपादक-वार्ताहर, दै. लोकमतनागपूर.

          2019 च्या पुरस्कारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत पत्रकार नरेंद्र कोठेकर, विद्याधर चिंदरकर, रेनी अब्राहम, इंद्रकुमार जैन, शेख मोहम्मद अस्लम, रश्मी पुराणिक, रवींद्र आंबेकर, अशोक पानवलकर, अरुण कुलकर्णी, संचालक (माहिती)  यांचा समावेश होता.

००००

 

 -फसल सर्वेक्षण परियोजना देश के लिए बनेगी मार्गदर्शक

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

            मुंबई13 अगस्त: आने वाले समय में ई-फसल सर्वेक्षण मोबाइल एप (एप्लिकेशन) किसानों को अपना लगने लगेगाइस बाबत विश्वास है। पूरे राज्य में लागू होने वाली ई-फसल सर्वेक्षण परियोजना देश के लिए एक मार्गदर्शक साबित होगीऐसा भी विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने व्यक्त किया है।

            आने वाले स्वतंत्रता दिवस से राजस्व और कृषि विभाग द्वारा लागू की जाने वाली संयुक्त परियोजना ई-फसल सर्वेक्षण का उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के करकमलों द्वारा सह्याद्री गेस्ट हाउस में "ई-फसल सर्वेक्षण" ("ई-पीक पाहणी") परियोजना का ऑनलाइन लोकार्पण इलेक्ट्रॉनिक बटन दबाकर किया गया।

            मोबाइल एप का ऑनलाइन लोकार्पण करने के बाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि कुछ साल पहले किसानों को अपना सातबारा (7/12 इक्स्ट्रैक्ट) देखने के लिए काफी मेहनत करनी पड़ती थीलेकिन आज किसानों के लिए उनका सातबारा मोबाइल में देखना संभव हो गया है। समय के हिसाब से प्रकृति का नियम बदलता है। ऐसा हम कहते हैं। परंतु बदलाव के समय आधुनिक तकनीक की मदद से हम प्रयोग कर किसानों की कठिनाइयों को कम करने के साथ-साथ उन्हें सरल और सुलभ तरीके से आवश्यक दस्तावेज को उपलब्ध करानेफसलों की जानकारी मुहैया करने पर जोर दिया जा रहा है। इस बात की भी ख़ुशी है। किसी भी तरह का नया प्रयोग करते समय सफलता तभी मिलती है जब हम सभी लोग सामूहिक प्रयास करते हैं। हम सभी ने सामुहिक प्रयास किया है इसलिए अब हमारे किसान भाइयों की पीड़ा को कम करने में मदद मिलेगी।

कम से कम गारंटीकृत कीमत (एमएसपी) नहीं तो एक निश्चित कीमत (अशुर्ड प्राइस) देने पर जोर

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे ने कहा कि  जो बिकेगावही उगेगा’ (विकेल ते पिकेल) की संकल्पना को पूरे राज्य में लागू किया गया है। इसे लागू करते समय ही प्रत्येक जिले की विशेषताओं को पहचानते हुए एक जिलाएक फसल का ब्रांड तैयार करना आवश्यक है। तभी ही किसानों को उसकी फसल का कम से कम गारंटीकृत कीमत (एमएसपी) नहीं तो एक निश्चित कीमत मिलेगी।

          आने वाले दिनों में किसानों द्वारा उगाई जाने वाली सब्जियां ज्यादा दिनों तक कैसे चल सकेंगीइस बाबत प्रयास किया जाना आवश्यक है। महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और हरित क्रांति के प्रणेता वसंतराव नाइक ने कृषि में समय से आगे जाकर प्रयास किया है। उसी तरह से अब भी किसानों को नई बातों और तकनीक की मदद से उनका जीवन सरल और सुलभ करने पर जोर देना आवश्यक है।

                

 

ई-फसल सर्वेक्षण परियोजना को प्रत्येक परिवार से जोड़ा जाएगा

- बालासाहेब थोरात

            राजस्व मंत्री श्री. बालासाहेब थोरात ने कहा कि पूरे महाराष्ट्र में लागू किया गया भले ही यह एक पायलट प्रोजेक्ट है लेकिन आज का दिन ऐतिहासिक है। ई-फसल सर्वेक्षण परियोजना एक ऐसी परियोजना है जिसे हर परिवार को जोड़ा जाएगा। भले ही आज आयोजित किए गए कार्यक्रम का स्वरूप सीमित हैलेकिन इसका प्रभाव दूरगामी होने वाला है। शुरुआत में  टाटा ट्रस्ट के माध्यम से इस परियोजना को सिर्फ दो जिलों में एक पायलट परियोजना के रूप में शुरू किया गया थालेकिन अब इसे पूरे राज्य में लागू किया जाएगा। इस परियोजना की मदद से किसानों को उनके फसल की जानकारी स्वयं भरने में सक्षम करेगी। आज शुरू हुई इस परियोजना को राज्य स्तर पर लागू किया जाएगा। उसी तरह से अगले 15 दिनों में राज्य के किसानों को ऐप पर उन्हें उनके फसल का पंजीकरण कैसे करना हैइस बात प्रशिक्षण दिया जाएगा। ऑनलाइन सात बारा सुलभता से उपलब्ध होने के साथ-साथ अब 8 अ को भी ऑनलाइन किया गया है।

            कृषि मंत्री श्री दादा भूसे ने कहा कि ई-फसल सर्वेक्षण परियोजना को राज्य भर में राजस्व एवं कृषि विभाग द्वारा संयुक्त रूप से लागू किया जाएगा और इसका उद्देश्य 'जो बिकेगावही उगेगा’ (विकेल ते पिकेल) अभियान के माध्यम से किसानों की आय में वृद्धि करना है। किसान स्वयं अपनी फसल का पंजीयन करा सकेंगे और खेती के लिए फसल ऋण एवं फसल बीमा की सुविधा आसानी से उपलब्ध होने में मदद मिलेगी।

          राजस्व राज्य मंत्री श्री. अब्दुल सत्तार ने कहा कि चूंकि किसान को सात बारा अपनी फसल का स्वयं ही रिकॉर्ड कर सकेंगेइससे वे बुवाई और फसल की परिस्थिति का अनुमान लगा सकेंगे। ई-फसल सर्वेक्षण परियोजना के माध्यम से गांवतहसील (तालुका) और जिलावार तरीके से प्रत्येक फसल के क्षेत्रफल को अनुमान लगाया जा सकेगा।

 राष्ट्रध्वजाच्या योग्य वापरासंदर्भात मार्गदर्शक सूचना

 

             मुंबई दि. 13 : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत 1 जानेवारी 2015 रोजीच्या आदेशानुसार प्लॅस्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन कराव्यात असे सुचित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर अंधेरी, बोरीवली तसेच कुर्ला (मुलुंड) या तीन तालुक्यांसाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

            15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे व इतर राष्ट्रीय कार्यक्रम,महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा सामन्यांच्यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले मैदानात/रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका स्तरावर तहसिल कार्यालयात आणि जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय  संस्था तसेच इतर संघटनाना सुपुर्द करण्यात आले आहेत, असे मुंबई उपनगर उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

0000


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमिताने

आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे प्रश्न मंजुषा स्पर्धा

 

          मुंबई, दि. 13 :- भारतीय स्वातंत्र्याच्या प्रश्न अमृत महोत्सवानिमित्ताने आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागाने मंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाच्या बाबीविषयी समाजात औत्स्युक्य निर्माण व्हावेऐतिहासिक स्मृतींना उजाळा मिळावा आणि समाजमनात त्याचे स्थान कायम रहावेया उद्देशाने ज्ञान, प्रबोधनासाठी ही स्पर्धा 16 ऑगस्टपासून आयोजित करण्यात आली आहे.

          या स्पर्धेसाठी आकाशवाणीच्या बातमीपत्रातून दर सोमवारी एक प्रश्न विचारला जाईल. स्पर्धकांनी या प्रश्नाचे उत्तर आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागाकडे ई-मेलद्वारा पाठवायचे आहे. quiz75news@gmail.com या ई-मेलवर स्पर्धकांनी उत्तर पाठवावे सर्वप्रथम योग्य उत्तर देणाऱ्या यशस्वी स्पर्धकाचे नाव शुक्रवारच्या बातमीपत्रातून प्रसारित करण्यात येतील. आकाशवाणीच्या सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्मदरही फोटोसह हे प्रकाशित करण्यात येईल. तसेच प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात येईल.

          या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याच आवाहन आकाशवाणी मुंबईच्या वृत्तविभागप्रमुख सरस्वती कुवळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

0000

Friday, 13 August 2021

 -पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

            मुंबईदि.13:   येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे वाटेल याबद्दल विश्वास वाटतो. राज्यभरात राबविला जाणारा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

            येत्या स्वातंत्र्यदिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे "ई-पीक पाहणी" प्रकल्पाचे ऑनलाईन लोकार्पण इलेक्ट्रॉनिक कळ दाबून करण्यात आले. यावेळी  महसूल मंत्री बाळासाहेब थोरातकृषी मंत्री दादाजी भुसेमहसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तारऑनलाईन पध्दतीने कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदममुख्य सचिव सीतराम कुंटे,  महसूलनोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीरमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंहमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगेकृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजमाबंदी आयुक्त व संचालक निरंजन सुधांशूटाटा ट्रस्टचे मुख्य सल्लागार जयंतकुमार बांठियाटाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ नरसिंहनई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगतापयांच्यासह महसूल विभागाचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

            मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कीकाही वर्षांपूर्वी शेतकऱ्याला स्वत:चा सातबारा पहायला मिळण्यासाठी खूप कष्ट करावे लागत असेपण आज शेतकऱ्यांना आपला सातबारा मोबाईलमध्ये पाहणे शक्य झाले आहे.काळाप्रमाणे बदलणे हा प्रकृतीचा नियम आहे असे आपण म्हणतो मग बदलत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नवनवीन प्रयोग करुन शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याबरोबरच त्यांना सोप्या आणि सुलभ पध्दतीने आवश्यक असणारी कागदपत्रे मिळवून देणेपीकांची माहिती मिळवून देणे यावर भर देत आहोत याचा आनंद वाटतो.कोणताही नवीन प्रयोग करताना यश तेव्हाच मिळते जेव्हा आपण सर्वजण सांघिक प्रयत्न करतो. आपण सर्वांनी सांघिक प्रयत्न केल्यानेच आता आपल्या शेतकरी बांधवांचे कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे.

हमीभाव नाही तर हमखास भाव मिळेल यावरर भर

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीआज दररोज हवामानात बदल होतो आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अनेक अडचणी येतात कारण त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते. पण या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे.ई पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्याचे आयुष्य अधिक सोपे आणि सहज करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचा आनंद आहे. विकेल ते पिकेल ही संकल्पना राज्यभरात राबवित असताना आपापल्या जिल्हयाचे वैशिष्टय ओळखून एक जिल्हा एक पीक असा ब्रॅड तयार करणे आवश्यक आहे तरच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळेल. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला अधिक दिवस कसा टिकवता येईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेतीमध्ये काळाच्या पुढे जाणारे प्रयत्न केले तसेच आताही शेतकऱ्यांना नवीन गोष्टी आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यांचे जीवन सोपे आणि सुलभ करण्यावर भर देणे आवश्यक आहे. 

 

ई पीक पाहणी प्रकल्प प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा

-- बाळासाहेब थोरात

            महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात म्हणाले कीमहाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा पथदर्शी प्रकल्प असून आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे.  ई पीक पाहणी प्रकल्प हा प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा प्रकल्प आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे स्वरुप जरी मर्यादित स्वरुपातले असले तरी याचा होणारा परिणाम हा व्यापक स्वरुपातील आहे.टाटा ट्रस्ट मार्फत सुरुवातीला हा प्रकल्प अवघ्या दोन जिल्हयात पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरु करण्यात आला होता मात्र आता हा प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहजपारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असून यापुढील काळातही हा विभाग लोकाभिमुख करताना सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात पुढे राहील. आज लोकार्पण करण्यात आलेल्या प्रकल्पाची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे. तसेच पुढील 15 दिवसात राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पीकाची नोंद ॲपवर कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.ऑनलाईन सातबारामध्ये सुलभता आणण्याबरोरबच आता 8 अ सुध्दा ऑनलाईन करण्यात आला आहे.

            कृषी मंत्री श्री.भुसे म्हणाले कीई- पीक पाहणी प्रकल्प महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात राबविण्यात येणार असून विकेल ते पिकेल या अभियानाद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प असणार आहे. शेतकऱ्याला स्वत: पिकांची नोंद करता येणार असून शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा सुलभरित्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

महसूल राज्यमंत्री श्री. सत्तार म्हणाले कीशेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातील पिकांची सात बारामध्ये स्वत: नोंद करता येणार असल्याने पीक पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीचा अंदाज करता येणार आहे. ई पीक पाहणी प्रकल्पामुळे गावतालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजणारआहे.

            "ई-पीक पाहणी" प्रकल्पाचा राज्यव्यापी प्रत्यक्ष वापराचा शुभारंभ कार्यक्रम फेसबुकयूटयूब आणि ट्विटर या समाजमाध्यमांवर लाईव्ह प्रसारीत करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान या प्रकल्पासाठी मेहनत घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमहसूल मंत्री बाळासाहेब थोरातकृषी मंत्री दादाजी  भुसेमहसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला.

            महसूलमुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आभार मानले.

 स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिन सोहळ्याची

मंत्रालयात रंगीत तालीम

 

          मुंबई, दि. 13 : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट 2021 रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालय येथे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम उपसचिव तथा सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी उमेश मदन यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात झाली.

          कोरोना विषाणूची साखळी तोडण्याकरिता ब्रेक दी चेनअंतर्गत शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार गतवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यात स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावीअसे निर्देश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात आले आहेत.

          राजशिष्टाचार विभागाचे कक्ष अधिकारी सुधीर निखाळे, युवराज सोरेगांवकरराजशिष्टाचार अधिकारी भरत जैनअतिरिक्त पोलीस आयुक्त श्री.सिंघल, पोलीस उपायुक्त (मंत्रालय सुरक्षा) दीपक साकोरेपोलीस उपायुक्त निमित गोयल, पोलीस उपायुक्त श्री.मीना, पोलीस उपायुक्त (परिवहन) योगेश कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

00000

 


 राज्यात २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान सामाजिक ऐक्य पंधरवडा

- अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

·        २० ऑगस्ट रोजी साजरा होणार सद्भावना दिवस

 

            मुंबईदि. 12 : राज्यात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंतीदिन २० ऑगस्ट हा "सद्भावना दिवस" म्हणून तर २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ हा पंधरवडा "सामाजिक ऐक्य पंधरवडा" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकाविषयी ऐक्याची भावनासौहार्दभाव वृध्दींगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेतअशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

            कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करुन सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे व राज्यातील तसेच देशातील सामाजिक ऐक्यसौहार्दसद्भावना वाढीस लागण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावाअसे आवाहन श्री. मलिक यांनी केले. केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय यांच्या निर्देशानुसार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंती दिवस २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी "सद्भावना दिवस" म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या निर्देशास अनुसरुन "सामाजिक ऐक्य पंधरवडा" साजरा करण्यात येणार आहे.

            याअनुषंगाने शासन परिपत्रकाद्वारे विविध सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतरविषयक नियमांचे पालन करून सद्भावना दिवस साजरा करण्यात यावासर्व उपस्थितांना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यास सांगण्यात यावे. महसूल विभागाच्या आयुक्तजिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातून ऑनलाईनलाऊड स्पिकरमार्फत सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. कर्मचाऱ्यांनीअधिकाऱ्यांनी जागेवर उभे राहून किंवा प्रांगणात सामाजिक अंतरविषयक नियमांचे पालन करून सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घ्यावी. यावर्षी सद्भावना शर्यत आयोजित करू नये. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहाता यावा यासाठी वेबसाईटव्दारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करावे. बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषतः युवकांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्य संचालक यांनी सद्भावना या विषयावर वेबिनार इत्यादीव्दारा संवादमार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. विद्यापीठेमहाविद्यालये आणि शाळा बंद असल्याने तेथे यावर्षी कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीतअशा सूचना देण्यात आल्या आहेत. सामाजिक ऐक्य पंधरवडा" साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मुख्यालयात सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी वेबिनार इत्यादीव्दारा संवादमार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील प्रख्यात स्वातंत्र्य सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे. सांस्कृतिक कार्य संचालक यांनी पंधरवड्यामध्ये वेबिनार इत्यादीव्दारा संवादमार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेतअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi