Friday, 22 May 2026

समाजसुधारणेचा दीपस्तंभ : राजा राममोहन रॉय

 समाजसुधारणेचा दीपस्तंभ : राजा राममोहन रॉय

 

राजा राममोहन रॉय हे भारतीय पुनर्जागरणाचे अग्रदूत मानले जातात. आधुनिक भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक सुधारणांचा पाया घालणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाची जयंती म्हणजे समाजप्रबोधनाच्या कार्याची आठवण करून देणारा प्रेरणादायी दिवस होय.एकोणिसाव्या शतकात त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाज सुधारणांसाठी केलेले प्रयत्न,त्यासाठी उभारलेला सनदशीर लढा आणि कायद्याची मदत घेऊन केलेल्या समाजसुधारणा आजही प्रेरणादायी आहेत.

त्यांनी अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकाच्या संक्रमणकाळात भारतीय समाजाला नव्या विचारांची दिशा दिली. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजात आधुनिकतेची पहाट उगवली. राजा राममोहन रॉय यांचा जन्म २२ मे १७७२ रोजी बंगालमधील राधानगर येथे झाला. त्यांचे वडील रामकांत रॉय आणि आई तारिणी देवी हे धार्मिक वृत्तीचे होते. बालपणापासूनच त्यांना संस्कृत, फारसी, अरबी, बंगाली आणि इंग्रजी भाषांचे ज्ञान प्राप्त झाले. विविध धर्मग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. वेद, उपनिषदे, कुराण आणि बायबल यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी मानवतेचा व्यापक दृष्टिकोन स्वीकारला. त्यांचा उत्कर्ष हा भारतातील सामाजिक आणि वैचारिक संक्रमणाच्या काळात झाला.

त्या काळात भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता होती. इंग्रजांचे राजकीय वर्चस्व वाढत असताना भारतीय समाज मात्र अनेक अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा आणि कालबाह्य चालीरीतींमध्ये अडकलेला होता. स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. सतीप्रथा, बालविवाह, बहुपत्नीत्व, स्त्रीशिक्षणावरील बंदी, विधवांचा होणारा छळ, जातिभेद आणि अस्पृश्यता या सामाजिक विकृतींनी समाज पोखरला होता. धर्माच्या नावाखाली कर्मकांडांना अधिक महत्त्व आले होते. समाजात विवेकापेक्षा अंधश्रद्धेचे वर्चस्व वाढले होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi