महाराष्ट्राच्या चौफेर विकासाची सर्वसमावेशक मांडणी करणारा अर्थसंकल्प असून, ग्रामीण विकासासोबतच नागरी भागातील सर्व घटकांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
२०४७ पर्यंत ७० टक्के लोकसंख्या नागरी भागातील असेल हे सूत्र लक्षात घेऊन राज्यात दहा ठिकाणी नागरी शहरी विकास प्राधिकरणे स्थापन करण्यासोबतच एक हजार लोकसंख्या असलेली गावे कॉंक्रिट रस्त्याने जोडण्याचा महत्वाकांक्षी रस्ते निर्मिती प्रकल्प म्हणजे शहरी व ग्रामीण भागाचा नियोजनबद्ध विकास करण्याची मुहूर्तमेढ आहे.
ज्यांनी आपला महाराष्ट्र घडविला, माणुसकीचा संस्कार आपल्यावर केला अशा थोर समाजसुधारकांच्या स्मरणार्थ येणारे वर्ष 'सामाजिक समता व समरसता वर्ष' साजरे करण्यात येणार आहे, ही या अर्थसंकल्पाची सामाजिक जाणीवेची महत्वाची बाजू आहे.
No comments:
Post a Comment