Thursday, 19 March 2026

कोकणातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मदत जाहीर करण्यात येणार

 कोकणातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी

सभागृहात मदत जाहीर करण्यात येणार

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       आंबा व काजू प्रश्नाबाबत बैठक

 

मुंबईदि.17 : आंबा व काजू हे कोकणची ओळख आहे. कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या आंबा व काजू फळ पिकाचा मोहोळ गळून पडल्यामुळे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात ही मदत जाहीर करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबा व काजू प्रश्नाबाबत विधान भवनात आयोजित बैठकीत सांगितले. 

 

बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारमाजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणेउद्योग मंत्री डॉ. उदय सामंतकृषिमंत्री दत्तात्रय भरणेमत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेरोहयो व फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेगृह राज्यमंत्री योगेश कदमखासदार सुनील तटकरेआमदार सर्वश्री प्रवीण दरेकरदीपक केसरकरभास्कर जाधवमहेंद्र दळवीनिलेश राणेराजेंद्र गावितप्रसाद लाडकिरण सामंतज्ञानेश्वर म्हात्रे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांनी बैठकीत सहभाग घेतला

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi