टाकळी ढोकेश्वर सौर ऊर्जा प्रकल्पामुळे २,०३३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.१८ : टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर जि. अहिल्यानगर) येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी टाकण्यात आलेल्या लाईनचा लाभ या परिसरातील शेतकऱ्यांना होत असून या प्रकल्पामुळे २०३३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.
सदस्य सत्यजित तांबे यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पारेषणच्या लाईन्सखाली शेती करणे अवघड ठरत असल्याने संबंधित शेतकऱ्यांची परवानगी घेऊन त्यांना जोखमीच्या मोबदल्यापोटी सुमारे ३० टक्क्यांपर्यंत भरपाई दिली जात आहे. वितरण लाईन्स बाबत मात्र वेगळी तरतूद असून ही लाइन टाकताना स्वतंत्र परवानगीची आवश्यकता नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पारगाव परिसरातील जमिनीबाबतही प्रशासनास सूचना देण्यात येत असून आवश्यकतेपेक्षा अधिक घेतलेली जमीन परत देण्याबाबत आदेश दिले जातील. तसेच सामाजिक वनीकरण विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या समन्वयातून या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येईल.
No comments:
Post a Comment