मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १८ : मुंबई शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, त्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले.
याबाबत सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
No comments:
Post a Comment