या संदर्भात केंद्र शासनाच्या अटी व शर्तींचा विचार करून आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत शासन पातळीवर विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्या ठिकाणी लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत, त्या प्रकरणांची माहिती मिळाल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असेही मंत्री गोगावले यांनी सांगितले.
‘मनरेगा’ अंतर्गत प्रामुख्याने अल्पभूधारकांना वैयक्तिक कामांचा लाभ दिला जातो. काही ठिकाणी मंजूर कामांपैकी काहीच कामे प्रत्यक्षात सुरू असून उर्वरित प्रलंबित राहतात, याचीही दखल घेऊन कामांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश देण्यात येतील, असे मंत्री गोगावले यांनी नमूद केले.
0000
No comments:
Post a Comment