कोकण विकासाला गती देण्यासाठी मत्स्य, पर्यटन, किनारपट्टी विकासाला प्राधान्य
- कोकणावरील अल्पकालीन चर्चेत मंत्र्यांचे उत्तर
मुंबई, दि. २४ : कोकणातील विकास, पर्यटन, मत्स्य व्यवसाय, शेती, पाणीपुरवठा आणि पर्यावरण या विविध मुद्द्यांवर विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला विविध विभागांच्या मंत्र्यांनी सविस्तर उत्तरे दिली. कोकणच्या ८७७ कि.मी. किनारपट्टीचा सर्वांगीण विकास, मच्छीमार व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, पर्यटनाला चालना देणे आणि पर्यावरण संतुलन राखणे या दिशेने राज्य शासनाने ठोस पावले उचलल्याचे विविध विभागाच्या मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोकणातील पर्यटन, मत्स्य विकास, रोजगार निर्मिती यासह कोकणाच्या विकासावर अल्पकालीन चर्चेला विविध विभागाच्या मंत्री यांनी उत्तर दिले. सदस्य संजय केळकर, निलेश राणे, शेखऱ निकम, प्रशांत ठाकूर, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, सुनिल प्रभू, अजय चौधरी, अनंत नर, महेश सावंत, हारून खान यांनी ही चर्चा उपस्थित केली होती.
No comments:
Post a Comment