Monday, 13 October 2025

तितकीच डिजिटल व्यवहार, ई-गव्हर्नन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील सायबर सुरक्षा महत्त्वाची

 आजच्या काळात सीमारेषांवरील सुरक्षा जितकी महत्त्वाची आहेतितकीच डिजिटल व्यवहारई-गव्हर्नन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील सायबर सुरक्षा महत्त्वाची ठरली आहे. भारतात ७० कोटींहून अधिक इंटरनेट वापरकर्ते असून १२० कोटी मोबाईलधारक आहेत. गेल्या पाच वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल ४०० टक्के वाढ झाली आहेही गंभीर बाब आहे. आपल्या देशात दर मिनिटाला सरासरी ७०२ सायबर धोक्यांची नोंद होत असूनप्रत्येक सेकंदाला १२ नवीन सायबर हल्ल्यांचा धोका समोर येतो. त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणासाठी सक्षम व टिकाऊ सायबर सुरक्षा व्यवस्था उभारणे ही काळाची गरज असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi