Saturday, 4 October 2025

विकसित महाराष्ट्र-2047 ध्येयाकडे वाटचाल

 विकसित महाराष्ट्र-2047 ध्येयाकडे वाटचाल

             राज्य शासनाने विकसित महाराष्ट्र-2047 या ध्येयाकडे वाटचाल करताना अनेक ऐतिहासिक आणि ठोस सुधारणा केल्या आहेत. शासन सुधारणा उपक्रमाचा एक भाग म्हणूनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती तसेच लिपिकांच्या वेळेत नियुक्तीची प्रक्रिया मिशन मोडमध्ये हाती घेण्यात आली. महाराष्ट्रात व्यापक भरती मोहीम राबविण्यात येत आहेज्यामध्ये १०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत नियुक्ती केली जात आहे. या "महा-भरती"चे वैशिष्ट्य असे आहे की ती केवळ भरतीपुरती मर्यादित नसून सुधारणा आणि परिवर्तनशील शासन पद्धतीच्या बांधिलकीवर आधारित आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi