इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना परसबाग, सेंद्रिय शेती, तृणधान्य उत्पादन, अन्न प्रक्रिया, कृत्रिम बुद्धीमत्ता, बांबूचा वापर, पाळीव प्राण्यांचे पोषण, कुक्कुट पालन, पर्यटन आणि आदरातिथ्य, जल व्यवस्थापनासाठी पाण्याचे लेखापरीक्षण, जैवविविधता नोंदणी, इंधनविरहीत स्वयंपाक इत्यादी विषय उपलब्ध करून देण्यात यावेत. शेतीसारख्या परंपरागत विषयात नवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देत कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित साधनांचा उपयोग कसा करावा याचा अभ्यासक्रमात सहभाग असावा, असेही राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment