Saturday, 20 September 2025

महाराष्ट्र शासनाचा विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार; रू.८०,९६२ कोटीं गुंतवणूक तर ४०,३०० रोजगार निर्मिती · मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत नऊ सामंजस्य करार

 महाराष्ट्र शासनाचा विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार;

रू.८०,९६२ कोटीं गुंतवणूक तर ४०,३०० रोजगार निर्मिती

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशीउद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या उपस्थितीत नऊ सामंजस्य करार

 

मंबईदि. १९ :- मुंबईतील गोरेगाव येथे एआयआयएफए (आयफा) आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे नऊ कंपन्यांशी ८०,९६२ कोटी रूपयांचे सामंजस्य करार स्वाक्षरित झाले. या करारामुळे राज्यात ४० हजार ३०० रोजगार निर्मिती होणार आहे.

गडचिरोलीचंद्रपूरनागपूरवर्धारायगडछत्रपती संभाजीनगरसातारा आदी जिल्ह्यांत हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. गडचिरोलीत सुमेध टुल्स प्रा. लि. आणि हरिओम पाइप इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त प्रकल्पांमुळे ५,५०० रोजगार उपलब्ध होणार असून ५,१३५ कोटींची गुंतवणूक होणार आहे.

छत्रपती संभाजीनगरात एनपीएसपीएल अॅडव्हान्स्ड मटेरियल (अथा ग्रुप) प्रा. लि. तर्फे ५,४४० कोटींची गुंतवणूक करून क्रिटिकली अॅडव्हान्स्ड लिथियम बॅटरी मटेरियल आणि कार्बन कॉम्प्लेक्स’ उभारले जाणार आहे. यामुळे ५,००० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.

वर्धा येथे रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि.चा २५,००० कोटींचा एकात्मिक स्टील प्रकल्प येणार असून यामुळे १२,००० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे..

रायगडमध्ये जिंदाल स्टेनलेस लिमिटेडचा ४१,५८० कोटींचा स्टेनलेस स्टील प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याद्वारे तब्बल १५,५०० रोजगार निर्माण होतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi