‘जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या विषयावर
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा विशेष संवाद
मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमाच्या भाग -२ मध्ये राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीतून ते ‘जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’या विषयावर सविस्तर संवाद साधणार आहेत.
'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. ही मुलाखत निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी घेतली आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/
YouTube : https://www.youtube.com/
No comments:
Post a Comment