पोलीसांची भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यासपीठांचा वापर करणे आवश्यक आहे. बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक ठरले आहे. सोशल मीडिया व इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे गुन्हेगारी वाढत असून, डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग आणि डिजिटल ट्रॅकिंग, ऑनलाईन गुन्ह्यांवर जलद प्रतिसादासाठी विशेष असे नव तंत्रज्ञान आणि पद्धती वापरणे आवश्यक आहे. अशा गुन्ह्यांची जलद उकल करण्यास मदत व्हावी यासाठी महाराष्ट्रात देशातील प्रगत अशी अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी लॅब उभारण्यात आली आहे. इतर देशांनीही आपल्या राज्यासारखी लॅब बनविण्याची मागणी केली आहे. एआयच्या सहाय्याने गुंतागुंतीची गुन्हे प्रकरणे अधिक वेगाने सोडविण्यात मदत होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. अंमली पदार्थ विरोधात राज्य शासनाने झिरो टॉलरन्स धोरण अवलंबले आहे. अंमली पदार्थांच्या व्यवहारात आढळलेल्यांवर कठोर कारवाई करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आपली अर्थव्यवस्था कृषी आधारित होती. आताही कृषी क्षेत्र तेवढेच महत्वाचे असून, बदलत्या काळानुरूप सेवा क्षेत्रावरही आपल्या अर्थव्यवस्थेचे अवलंबित्व वाढत आहे. कृषी व सेवा या दोन्ही क्षेत्रावर आधारलेल्या अर्थव्यवस्थेची आव्हाने वेगळी आहेत. त्यामुळे बदलत्या सेवा क्षेत्राची परिभाषा समजून घेणे आवश्यक आहे. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासोबतच शाश्वत मूल्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न होणेही आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment