Thursday, 18 September 2025

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

  

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते

जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

 

मुंबईदि. 17 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर2025 या कालावधीत सेवा पंधरवडा अभियानाअंतर्गत मंत्रीमाहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलारयांच्या हस्ते आधार संच वितरण व नागरिकांना घरपोच सेवा देण्याकरिता फिरते सेतू केंद्र (MOBILE SETU) चा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणालेया अभियानांतर्गत बोरीवलीकुर्ला व अंधेरी या तहसील कार्यालयातील सुविधा केंद्र अद्ययावत व आधुनिक करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात नव्याने वार्डनिहाय 374 आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात येत आहेत. नागरिकांना तत्काळ सेवा मिळण्याकरिता प्रथमच जिल्ह्यात फिरते सेतू केंद्र व आधार केंद्र बळकट करण्याकरिता आधार नोंदी संच वितरित करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना तात्काळ सेवेचा लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता सर्व दाखले WhatsApp वर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi