Thursday, 28 August 2025

केंद्रीय मंत्र्यांकडून महाराष्ट्राचे अभिनंदन

 केंद्रीय मंत्र्यांकडून महाराष्ट्राचे अभिनंदन

२०२३ मध्ये केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून २०२४ ला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात १० शहरांना बक्षीसे मिळाली आहेत. त्यातील ७ शहरे सुपर स्वच्छ लीगमध्ये आल्याबद्दल केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मोहन लाल खट्टर यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले.

देशाची प्रतिमा ही स्वच्छ आणि सुंदर शहरांमधून निर्माण होत असतेत्यासाठी प्रत्येक शहरे स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री मोहन लाल यांनी केले. उघड्यावरच्या हागणदारी मुक्त योजनेपासून स्वच्छतेची सुरुवात झाली आता प्रत्येक घरांमध्ये शौचालयांचा वापर होऊ लागला आहेहे एक मोठे यश असून शहरांमधील कचऱ्याचे ढीगराडारोडादूर करुन अपेक्षित यश साध्य करण्यासाठी गतीने प्रयत्न करण्याची आवश्यकताही केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवली. स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमात बक्षीसप्राप्त नागरी स्वराज्य संस्थांनी पुढाकार घ्यावा आणि क्रमवारीत खाली असलेल्या शहरांना सोबत घेऊन त्यांनाही स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत वर आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री. मनोहर लाल यांनी स्वच्छता लक्ष्य युनिट (सीटीयू) आणि स्वच्छता ही सेवा २०२५ च्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. स्वच्छ शहर जोडी उपक्रमाच्या डिजिटल मार्गदर्शिकेचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi