Friday, 18 July 2025

रिस्पॉन्स टाईम कमी केला,दोषसिद्धीचे प्रमाण वाढवत आहोत

 रिस्पॉन्स टाईम कमी केला

रिस्पॉन्स टाईमसुध्दा कमी केला आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की११२ नंबर डायल केलातर ७.२३ मिनटात रिस्पॉन्स मिळेल. दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत. मे २०२५ अखेरपर्यंत दोषसिद्धीचे प्रमाण ४४.२ टक्के इतके आहे. मे २०२४ मध्ये हे प्रमाण साधारणतः ४५ टक्के एवढं होतं. २०२४ च्या तुलनेत यंदा सायबर गुन्ह्यांमध्ये ८७८ ने घट झाली आहे. राज्यात ५० सायबर पोलीस ठाणे आणि ५१ सायबर लॅब सुरू आहेत. सायबर विषयक १९३० ही हेल्पलाइन सुद्धा सुरू केलेली आहे. पायरसीच्या १३२१ वेबसाईट बंद केल्या आहेत.

 

दोषसिद्धीचे प्रमाण वाढवत आहोत

दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीखासगी वकील नेमण्याचा अधिकार क्षेत्रीय पातळीवर पोलिसांच्या घटक प्रमुखांना दिला आहे. मे २०२५ अखेरपर्यंत दोषसिद्धीचे प्रमाण ४४.२ टक्के इतके आहे. मे २०२४ मध्ये हे प्रमाण साधारणतः ४५ टक्के एवढं होते. २०२४ च्या तुलनेत यंदा सायबर गुन्ह्यांमध्ये ८७८ ने घट झाली आहे. राज्यात ५० सायबर पोलीस ठाणे आणि ५२ सायबर लॅब सुरू आहेत.

सायबर विषयक १९३० ही हेल्पलाइन सुद्धा सुरू केलेली आहे. पायरसीच्या १३२१ वेबसाईट बंद केल्या आहेतअसेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi