Sunday, 15 June 2025

राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिलीमीटर पाऊस V इतर ही पडलेल्या पावसाची नोंद

 राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिलीमीटर पाऊस

 

मुंबई, दि. १३ :  राज्यात मागील २४ तासांमध्ये (१३ जून रोजी सकाळपर्यंत ) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिमी पाऊस झाला आहे. तर कोल्हापूर  ३९.८ मिमीरत्नागिरी जिल्ह्यात ३७ मिमीसांगली जिल्ह्यात ३६ मिमी आणि नाशिक जिल्ह्यात २५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

राज्यात कालपासून आज १३ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे १०.५, रायगड १५रत्नागिरी ३७,  सिंधुदुर्ग ७१,  पालघर २२.२नाशिक २५.२धुळे २१.४नंदुरबार ३.१जळगाव ९.३अहिल्यानगर १८.६पुणे २०.१सोलापूर १५.७,  सातारा २४.२,  सांगली ३६.६,  कोल्हापूर ३९.८छत्रपती संभाजीनगर २०.६जालना २३.६बीड १०.६लातूर ६.३,  धाराशिव ९.६नांदेड ४.९,  परभणी ८.९,  हिंगोली १९.बुलढाणा १३.९,

अकोला ८.७वाशिम १६.७अमरावती ३.५यवतमाळ ४.१वर्धा ३.९.नागपूर ०.३भंडारा ०.१गोंदिया ०.१चंद्रपूर २.६ आणि गडचिरोली १.४.

 

अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून  एनडीआरएफएसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 

राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती मृत व एक व्यक्ती जखमी झाली आहे. वीज पडून सांगली जिल्ह्यात दोन व्यक्ती मृत, जालना जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती  व १२ प्राणी मृत तर एक व्यक्ती जखमीयवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्ती जखमीवाशिम जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती व चार प्राणी मृत आणि एक व्यक्ती जखमी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात वीज पडून १७  प्राणी जखमी झाले आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. तर दिनांक १२ मार्च रोजी अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI १७१ या विमानच्या अपघातात राज्यातील दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi