Wednesday, 25 June 2025

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन Pl share

 साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी

१५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. २४ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळमुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीयोजनेकरिता दि. १५ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करावेतअसे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर-उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक वैशाली मुडळे यांनी केले आहे. 

  मुंबई शहर-उपनगर जिल्हयातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व उत्तीर्ण झालेल्या इयत्ता १० वी१२ वीपदवीपदव्युत्तरवैद्यकीय व अभियांत्रिकी इ. करिता महामंडळाकडून सरासरी ६०% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्तीयोजनेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

     अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखलारेशनकार्डआधार कार्डशाळेचा दाखलामार्कशीटदोन फोटोपुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ. सह दोन प्रतींमध्ये आपले पुर्ण पत्यासह व भ्रमणध्वनी क्रमांकासह अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठेविकास महामंडळ (मर्या)मुंबई- गृहनिर्माणभवनकलानगरतळमजलारुम नं. ३३बांद्रा (पू)मुंबई-४०००५१ या पत्त्यावर दि. १५ जुलै२०२५ पर्यंत करावेत,असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi