Saturday, 21 June 2025

गावाभोवती चिंचेची झाडं का लावली पाहिजेत..,रक्तचंदनाच्या बाहुलीचं‌ महत्त्व‌ ,pl share

 गावाभोवती चिंचेची झाडं का  लावली पाहिजेत...याचं वैज्ञानिक कारण मारुती चितमपल्ली अतिशय आत्मीयतेने सांगत...चिंचेच्या झाडात  विलक्षण अशी अर्थिंग क्षमता असते... पावसाळ्यात गावात विजा पडू नयेत म्हणून गावाभोवती चिंचेची झाडं लावावीत...जोपासावीत..वादळ - वा-यात विजा कडाडल्यात तर चिंचेखाली उभं राहू नये...कारण चिंचेचं झाड विजेला खेचून जमिनीत घेऊन जातं...! हे सारं त्यांच्या मुखातून ऐकताना श्रोते चकित होऊन जात. 


रक्तचंदनाच्या बाहुलीचं‌ महत्त्व‌ त्यांनी सांगितल्यापासून‌ उशाशी रक्तचंदनाची बाहुली मी ठेऊ लागले. जपानी लोकं भारतात येऊन रक्तचंदनाच्या ऑक्शनची 'मुहंबोली किमत' देऊन सगळं रक्तचंदन जपानला‌ घेऊन जातात... बॉम्बहल्ल्यात होरपळलेली जपानी माणसं‌ जीवनात कुठलंच रेडिएशन नको म्हणून वाट्टेल ते प्रयत्न करतात... आणि घरातील रक्तचंदनाची दारं -खिडक्या आणि टेबल ठेवलेल्या खोलीतच आपली  इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स ठेवतात...कारण रक्तचंदनाच्या खोडात रेडिएशन शोषून घेण्याची ताकद असते...

आम्हाला हे शास्त्र कुठं ठाऊक होतं... मारुती चितमपल्ली स्वतः रक्तचंदनाच्या ऑक्शनचा अभ्यास करायला जपानला गेले होते.. ही जिज्ञासा, चिकाटी , पदरचा पैसा खर्च करून शास्त्रीय ज्ञान प्राप्त करण्याची जिद्द ,त्यासाठीची भटकंती आणि मिळविलेली वनविद्या वाचकांच्या ओंजळीत अर्घ्य देत  आयुष्य वेचलेल्या पितृतुल्य मारुती चितमपल्ली यांना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली! 


-प्रा. डॉ. मोना चिमोटे*


🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi