Wednesday, 25 June 2025

आषाढी सोहळ्यात पंढरपूर येथे सर्व पालख्या, दिंड्या, वारकरी व भाविक यांची सर्व व्यवस्था करणार, पंढरपूरचा कॉरिडॉर सर्वांच्या संमतीनेच होणार..

 पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025.....

महास्वच्छता अभियानातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे कार्य झाले

- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी सोहळ्यात पंढरपूर येथे सर्व पालख्यादिंड्यावारकरी व भाविक यांची सर्व व्यवस्था करणार, पंढरपूरचा कॉरिडॉर सर्वांच्या संमतीनेच होणार..

 

पंढरपूर/सोलापूरदिनांक 22(जिमाका):- पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत 42 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून 148 टन कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारीकर्मचारीसामाजिक संस्थांचे स्वयंसेवकविविध सामाजिक संघटनापंढरपूर शहरातील नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेऊन विठुरायाची नगरी स्वच्छ केली. या मोहिमेतून पंढरपूर शहर व येथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचे कार्य घडले असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

            पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 चा समारोप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार समाधान आवताडेआमदार सचिन कल्याणशेट्टीआमदार देवेंद्र कोठेजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादमुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमसोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासेमाजी आमदार प्रशांत परिचारकपंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापेकार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवारपंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री श्री गोरे म्हणाले कीया स्वच्छता अभियानातून श्री विठुरायाची नगरी स्वच्छ करण्याचे काम आपल्या सर्वांच्या श्रमातून झालेले आहे. ही वारी पूर्वीची स्वच्छता असून वारीनंतरही स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सोलापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील ही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून आजच्या मोहिमेत सात ते आठ हजार स्वयंसेवक नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये तरुणांचा सहभाग ही महत्त्वपूर्ण बाब होती व पुढील काळात या स्वच्छतेच्या संदेशाबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करतील व स्वतःही क्रियाशीलपणे राबवतील असे त्यांनी सांगितले.

            पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व्यापारी,  व्यावसायिक यांनी आपापल्या दुकानासमोर कचरा टाकण्यासाठी छोट्या छोट्या कचरा पेट्या ठेवाव्यात व त्यामध्येच कचरा टाकून तो नगरपालिकेच्या कचरा संकलन टीम कडे द्यावा. त्याप्रमाणेच विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत येणाऱ्या वारकरी भावी यांनीही कचरा कोठेही रस्त्यावर टाकू नये नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जवळपासच्या कचराकुंड्यामध्येच कचरा टाकावा, स्वच्छ पंढरपूरस्वच्छ चंद्रभागानमामी चंद्रभागा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे पालकमंत्री यांनी सांगितले.

            पंढरपूर हे राज्यासाठी महत्त्वाचे व पवित्र धार्मिक ठिकाण असून या विठुरायाच्या नगरीचा सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या विषयी सर्वांच्या संमतीनेच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली. तसेच सर्व मानाच्या पालख्या सह अन्य पालख्यादिंड्या यांचे प्रस्थान पंढरपूरसाठी झालेले आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आल्यानंतर या सर्वांना व्यवस्था प्रदान केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीमहापालिका आयुक्त यांच्यासह सर्व विभाग प्रमुखसामाजिक संस्थानागरिक व स्वयंसेवक यांचे त्यांनी कौतुक केले.

            आमदार सचिन आवताडे यांनी पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या संकल्पनेतून वारी पूर्वी पंढरपूर शहर स्वच्छ करण्यासाठी राबवलेल्या महा स्वच्छता अभियानाचे कौतुक केले व वारी संपल्यानंतर ही अशी मोहीम राबवण्याची मागणी केली.

            प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रास्ताविकात स्वच्छता अभियानाचे महत्त्व सांगून प्रशासनाच्या वतीने येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. तर मोहिमेत सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi