Sunday, 22 June 2025

परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य:,कृषी क्षेत्रासाठी जलसुरक्षा व सौरऊर्जा योजनेचा ध्यास

 मुंबईत झपाट्याने शहरी परिवर्तन

धारावी पुनर्विकास प्रकल्पासह मुंबईत शहरी पुनर्रचना वेगात सुरू असून८ लाख नागरिकांचे पुनर्वसन यामार्फत केले जाणार आहे. त्याचबरोबर "सिंगल ट्रान्सपोर्ट कार्ड" व एकत्रित मोबाईल अ‍ॅपद्वारे वाहतूक व्यवस्था सुलभ केली जात आहे. सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांमुळे किनारपट्टी स्वच्छ होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य:

परकीय गुंतवणूक वाढत असून महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आहे. एकात्मिक डिजिटल "सिंगल विंडो" प्रणालीएमआयडीसी औद्योगिक पार्क आणि 'कॅबिनेट कमिटी ऑन इन्व्हेस्टमेंटयांच्या माध्यमातून गुंतवणूक सुलभ झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

परकीय गुंतवणुकीत अव्वल असल्याने मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमामध्ये सत्कार

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशाच्या 40 टक्के आघाडीवर आहे. यानिमित्ताने या परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

कृषी क्षेत्रासाठी जलसुरक्षा व सौरऊर्जा योजनेचा ध्यास

राज्यात शेतकऱ्यांसाठी जलसुरक्षातंत्रज्ञानवीज यांच्यावर भर दिला जात आहे. २०२६ पर्यंत सौरऊर्जेवर आधारित मोफत दिवसभर वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. यामुळे उत्पादन व उत्पन्न वाढेलअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi