Sunday, 15 June 2025

सहकार चळवळीच्या वाढीसाठी पूर्ण सहकार्य

 सहकार चळवळीच्या वाढीसाठी पूर्ण सहकार्य

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

·         शेतकऱ्यांच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही

·         लाडकी बहीण योजना सुरु राहणार

·         शेतीत एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांनी प्रगती साधावी

·         काळम्मावाडी धरणाची गळती थांबवण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद

कोल्हापूरदि.23 (जिमाका): राज्याच्या आणि देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सहकार क्षेत्रातही काळानुसार बदल करणे आवश्यक असून सहकार चळवळ टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी आवश्यक सहकार्य करुअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

              कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोति कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफबँकेचे चेअरमन प्रवीणसिंह विश्वनाथराव पाटीलमाजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन के.पी. पाटीलमाजी आमदार व अन्नपूर्णा शुगर फॅक्टरीचे चेअरमन संजयबाबा घाटगेगोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळेशेतकरी संघाचे चेअरमन बाबासाहेब शिंदेगोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटीलबँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या मानेबिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोजभाऊ फराकटेविश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगलेबाबासाहेब पाटील - आसुर्लेकरअविनाश जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेशेतकरीमहिला व सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठामहिलांना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य देण्यासाठी लाडकी बहिण योजना अशा अनेक योजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगांसाठी दरवर्षी अनुदान देण्यात येत आहे. शेतकऱ्यांकरिता योजना राबवण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाहीत्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारी मुख्यमंत्री लाडकी बहण योजना सुरु राहीलकोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाची गळती रोखण्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईलअसे त्यांनी सांगितले. कोल्हापुरातील समृद्ध शेती आणि ऊस क्षेत्र पाहता इथल्या शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीचा विकास साधावाअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

         स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्रासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी या क्षेत्रात काही आवश्यक ते बदलपरवानग्या किंवा निर्णय घ्यावयाचे असतील तर आवर्जून सांगावेतसहकार क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. सहकारी तत्त्वावर बँकेची उभारणी करुन विश्वनाथराव अण्णांनी सर्वसामान्य शेतकरीछोट्या व्यावसायिकांना सक्षम करण्याचे काम केले आहे. सहकाराच्या माध्यमातून या भागाची सामाजिकआर्थिक व ग्रामविकासाची घडी त्यांनी बसवली आहे. या बँकेच्या वाटचालीत अनेक पिढ्यांनी योगदान दिल्याचा उल्लेख करुन शेतकऱ्यांना 50 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्याबाबत बँकेने विचार करावाअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

          उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेछत्रपती शिवाजी महाराज यांनी जात- पात भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. फुलेशाहूआंबेडकर यांच्यासह सर्व महामानवांनी दिलेली समतेची शिकवण आणि त्यांचे विचार अंगीकारुन आपण वाटचाल करणे गरजेचे आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवून 'दहशतवादाचा नायनाट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,' हा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्याचबरोबर सैन्यदलाची आणि भारतीयांची एकजूट यातून दिसून आली असून दहशतवादाची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी यापुढेही अशी ऑपरेशन राबवण्यात येतीलअसे त्यांनी सांगितले.

            वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणालेसहकार क्षेत्रात विश्वनाथराव पाटील यांनी मोठे योगदान दिले आहे. विश्वनाथराव पाटील बँकेने तब्बल 77 वर्ष पूर्ण केले असून या बँकेची वाटचाल अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे.

             प्रास्ताविकातून प्रविणसिंह पाटील यांनी बँकेच्या वाटचालीबाबत माहिती दिली

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi