Sunday, 15 June 2025

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य

 लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पोलीस दलाला बळकटी देणाऱ्या इमारतीचे उद्घाटन

 

            सांगलीदि. 23 :- राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

            सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. 

            यावेळी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलखासदार धनंजय महाडिकखासदार विशाल पाटीलआमदार सर्वश्री  अरुण लाडजयंत पाटीलडॉ. सुरेश खाडेसुधीर गाडगीळडॉ. विश्वजीत कदमगोपीचंद पडळकरसत्यजीत देशमुखसुहास बाबरअमल महाडिक,मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेजिल्हाधिकारी अशोक काकडेजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसेमहानगरपालिका आयुक्त सत्यम गांधीपोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागीविशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मनोजकुमार शर्माकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (प्र) डॉ. शशिकांत माहरकरपोलीस अधीक्षक संदीप घुगेअपर पोलीस अधीक्षक रितू खोखर आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे राज्यातील पोलीस कार्यालय व पोलीसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.सध्या 94 हजार निवासस्थाने उपलब्ध झाली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात फॉरेंन्सिक व्हॅन उपलब्ध करुन देण्यात येत असून सायबर गुन्ह्यांच्या उकलीमध्ये देशात महाराष्ट्र पोलीस अव्वल असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. अंमली पदार्थाच्या तस्करीतव्यवसायातपोलीसांचा सहभाग आढळल्यास संबंधीत पोलीसाला निलंबित न करता थेट बडतर्फ करण्याचा इशारा देत अंमली पदार्थांच्या बाबतीत झिरो टॉलरन्स असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi