पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजना - जयश्री भोज
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज म्हणाल्या की, राज्यात वातावरणीय बदलामुळे होणारे विविध परिणाम लक्षात घेता, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग पर्यावरण विषयक विविध अधिनियमांच्या अंमलबजावणी बरोबरच विविध उपाययोजना राबवत आहे. वातावरणीय कृती आराखड्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, राज्य वातावरणीय कृती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे. याशिवाय माझी वसुंधरा अभियान, राज्याचे परिसंस्था आधारित अनुकूलन धोरण, मानवनिर्मित देवराई व घनवने निर्माण करणे, कार्बन बाजारपेठ सुविधा कक्ष, सर्क्युलर इकॉनॉमी धोरण, विद्युत वाहन धोरण आदीच्या माध्यमातून कामे करण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment