Friday, 16 May 2025

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली बदल्यांची कार्यवाही

  उपस्थितीत

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या

पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तांच्या कार्यालयात पार पडली बदल्यांची कार्यवाही

समुपदेशनाने बदल्यांचा निर्णय भविष्यातही कायम राहील – मंत्री पंकजा मुंडे

इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी झाले खूश!

 

पुणेदि. 15 : पुन्हा एकदा इतिहास घडविताना या ऐतिहासिक क्षणाची मी साक्षीदार होतेयं याचा मला अतिशय आनंद होत आहे. अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवून भ्रष्टाचारमुक्त धोरण राबविणे यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्याचा निर्णय मी घेतला. हा निर्णय भविष्यातही कायम राहील. गाव पातळीवर कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. तुमच्या बदल्या मनासारख्या केल्या आहेतआता चांगले आणि फ्रेश मनाने काम कराअशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

राज्याच्या सर्व भागात मनुष्यबळाचा समतोल साधला जावा आणि बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व सहाय्यक आयुक्त या संवर्गातील बदल्या समुपदेशनाने करण्याचा ऐतिहासिक निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकताच घेतला होता. या बदल्यांची प्रक्रिया आजपासून आयुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयात मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सुरू झालीत्यावेळी त्या बोलत होत्या. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामीआयुक्त प्रवीण कुमार देवरेअतिरिक्त आयुक्त डॉ. शीतल मुकणे यावेळी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा निर्णय मी घेतला होतात्यावेळी त्याचा फायदा अनेक शिक्षकांना जे तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते त्यांना झाला. आऊट ऑफ बॉक्स जाऊन निर्णय घेण्याची आवड असल्याने आताही पशुसंवर्धन विभागासाठी मी हा निर्णय घेतला. एकदा घेतलेला निर्णय बदलत नाहीत्यामुळे भविष्यातही हा निर्णय कायम राहणार आहे. माझे वडील लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब नेहमी म्हणायचेज्याची पत नाहीऐपत नाही त्यांचा आवाज बनण्यासाठी मी राजकारणात आहेअगदी तोच वारसा घेऊन मी काम करत आहे. माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेतत्यांच्यासाठी तुम्ही काम करतात्यामुळे हा निर्णय घेतला. सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला महत्त्वाचा वाटतो. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आपल्या परिवारापासून दूर असणारेआदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना यामुळे हवी ती पोस्टींग मिळणार आहे. हव्या त्या ठिकाणी बदल्या झाल्याने तुमच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद समाधान देणारा आहे असे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi