Wednesday, 23 April 2025

महिलांच्या सुरक्षेसाठी 'अंतर्गत तक्रार समिती' स्थापन न करणाऱ्या कार्यालयांना ५० हजारांचा दंड

  

महिलांच्या सुरक्षेसाठी 'अंतर्गत तक्रार समिती' स्थापन न करणाऱ्या

कार्यालयांना ५० हजारांचा दंड

 

मुंबईदि. २२ : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून (संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण)

अधिनियम कायदा-2013 च्या कलम 26 नुसार शासकीय किंवा खासगी कार्यालये अंतर्गत तक्रार समिती' स्थापन करणार नाहीत अशा कार्यालयांना रुपये 50 हजार दंड आकारण्याची तरतूद आहे. अशी समिती न करणे आणि कायद्यातील व नियमातील तरतुदीचे आणि जबाबदारीचे पालन न केल्यास परवाना रद्द करण्यात येऊन दुप्पट दंड आकारण्यात येईल, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय धनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून (संरक्षण प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम कायदा-2013 च्या कलम  चार नुसार शासकीय किंवा  खासगी आस्थापनात दहा किंवा दहा पेक्षा जास्त अधिकारी/ कर्मचारी कार्यरत असल्यास अशा कार्यालयामध्ये महिलांचे लैंगिक छळ होऊ नये म्हणून 'अंतर्गत तक्रार समिती' स्थापन करणे अनिवार्य आहे.

 

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय व खागी आस्थापनांमधील उदा. दुकानेशैक्षणिक संस्थाक्रीडा संस्थाचित्रपट संस्थाशासकीय कार्यालये यांनी ही समिती स्थापन करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयबांद्रा (मुंबई उपनगर) किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीप्रशासकीय इमारतपहिला मजलादुसरा टप्पाआर. सी. मार्गचेंबूर येथे सादर करावाअसेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi