Sunday, 26 January 2025

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन 75 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत विविध संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा

 भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन

75 वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत विविध संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

पुणेदि. 26: भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानशिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

लोकांनीलोकांसाठी चालवलेलेलोकांचे राज्यहा विचार घेऊनदेशाने गेल्या 75 वर्षांची गौरवशाली वाटचाल केली. या 75 वर्षात देशासमोर अनेक संकटे आलीआव्हाने निर्माण झालीपरंतु देश कुणापुढे झुकला नाही. वाकला नाही. डगमगला नाही. भक्कम उभा राहीलाअसे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी काढले.

यावेळी आमदार बापुसाहेब पठारेविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसलेपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, ‘पीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसेजिल्हाधिकारी जितेंद्र डुडीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलपोलीस अधीक्षक पंकज देशमुखस्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीविविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारीज्येष्ठ नागरिकविद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेशेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी आपल्यासमोर अनेक संकटेआव्हाने होती. त्या संकट व आव्हानांवर मात करण्याची दिशा 26 जानेवारी 1950 ला भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्विकारुन आपण निश्चित केली. तेव्हापासून 75 वर्षात देशासमोरच्या प्रत्येक संकटालाआव्हानालाएकजुटीनंनिर्धारानं सामोर जाण्याचं काम प्रत्येक देशवासियांनी केलं.

देशाची एकताअखंडतासार्वभौमतासंविधानदेशातली लोकशाहीदेशाच्या सीमासुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सुपुत्रांनी प्राणांचं बलिदान दिल. अनेक कुटुंबांनी सर्वस्वाचा त्याग केला. त्या सर्वांच्या त्यागबलिदानापुढे नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताकाचाभारतीय लोकशाहीचाभारतीय स्वातंत्र्याचा उत्सव आज साजरा करण्याचा दिवस आहे.

देशांतर्गत कितीही मनभेदमतभेद असले तरीदेशासमोरच्या बाह्य संकटासमोर संपूर्ण देश एक आहेही भावना गेल्या 75 वर्षात अधिक मजबूत केली. ही भावना मजबूत होण्यामागे भारतरत्न             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची ताकद आहे. देशानं स्विकारलेला सर्वधर्मसमभावाच्या विचारांचं बळ आहे. गेल्या 75 वर्षात जगातल्या इतर देशात लोकशाही व्यवस्थेला धक्के बसत असतांना आपली लोकशाही सुरक्षित राहीली. याचं श्रेयडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेलाराज्यघटनेवरच्यालोकशाहीवरच्या देशवासियांच्या विश्वासाला आहे.

पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेतहे  पुरस्कार राज्याच्या राजकीय संस्कृतीकलासमृद्धीचा गौरव आहेअशा शब्दात श्री. पवार यांनी पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले. त्याचबरोबर पोलिस-अग्निशमन पदक, सेवापदक व शौर्यपदक, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने प्रदान करण्यात आलेल्या वीर गाथा राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्याचेही त्यांनी अभिनंदन केले.

जीबीएस’ आजारग्रस्त रुग्णांवर पुणे महानगरपालिकेने कमला नेहरु रुग्णालयपिंपरी-चिंचवड महानगरापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहेत्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

यावेळी डेहराडून (उत्तराखंड) येथे होणाऱ्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पथकप्रमुख संजय शेटे यांच्याकडे ध्वज हस्तांतरित करण्यात आला.

यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकमाजी सैनिकनिमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi