#हनुमानाचाप्रसाद 🚩🚩
एक तरुण नगरसेवक.. त्याकाळात साधारणत: ९० च्या त्या दशकात अगदी कमी वयात नगरसेवक होण्याचा मान मिळविणारा तो तरुण..
आपल्या पहिल्याच टर्म मध्ये मिळालेल्या त्या संधीच सोन करत या तरुणाने अतिशय दिमाखदार अशी कामगिरी करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आपलं नेतृत्व अधोरेखित केलेलं होत..
त्या तरुणाची पहिली टर्म संपली आणि मनपाच्या पुढील पंचवार्षिक निवडणुका लागल्या..
त्या निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर झाली आणि त्या तरुणाच्या प्रभागातील ४ पैकी ३ जागा या महिलांसाठी तर राहिलेली १ जागा एका प्रवर्गासाठी राखीव झाली..
या नवीन प्रभाग रचनेमुळे या तरुणाला आपला हक्काचा प्रभाग गमवावा लागला..
नवीन प्रभाग रचनेमुळे आत्ता जरी आपल्याला संधी नाही मिळाली तरी हरकत नाही कारण आपलं वय आत्ता फक्त २६ आहे आणि आपल्याला पुढे अजुन बरीच वर्षे आहेत त्यामुळे आत्ता आपण थांबूया आणि पुढच्या वेळी संधी मिळाल्यास निवडणूक लढवूया हा निर्णय आपल्या मनात त्या तरुणाने पक्का केला होता..
त्याकाळात 'प्रकाशजी' नावाचे एक सदगृहस्थ त्या शहरात एक ज्येष्ठ नगरसेवक म्हणून कार्यरत होते..
प्रकाशजी आपल्या प्रभागात कधी रात्री हातात काठी घेऊन शिट्टी वाजवत पेट्रोलिंग करायचे तर दररोज न चुकता सकाळी पहाटे पाच वाजता शिट्टी वाजवत फिरायचे..
प्रकाशजी म्हणजे जनतेच्या मनात घर केलेलीच व्यक्ती..
आपल्या कामामुळे सामान्य जनतेला प्रकाशजी म्हणजे आपल्याच घरातील व्यक्ती वाटतं असत..
एक दिवस प्रकाशजींनी या तरुण नगरसेवकाला सहजच विचारले की, "काय रे तुझ्याकडे स्कुटर आहे का?"
त्यावर त्या तरुणाने "हो आहे की.." असं उत्तर देताच प्रकाशजी लगेच म्हणाले "ठीक आहे.. मग संध्याकाळी तुझ्या स्कुटर वरून आपण दोघे मंदीरात जाऊया.."
ठरल्याप्रमाणे प्रकाशजी आणि तो तरुण संध्याकाळी त्याकाळी शहराच्या बाहेर असणाऱ्या एका टेकडीसारख्या भागावरील हनुमान मंदीरात गेले..
तिथे जाताना त्यांनी हार, फुले आणि नारळ घेतला..
मंदीरात जाताच प्रकाशजींनी तो घेतलेला नारळ त्या तरुणाच्या हातात दिला आणि तो त्या तरुणाच्या हातानेच फोडायचा आग्रह केला..
पण हे करत असतानाच प्रकाशजी अगदी अनपेक्षितपणे त्या तरुणाला म्हणाले, "तू नारळ फोडतोयस खरा पण या हनुमाना समोर मला वचन दे की, तू नारळ फोडल्यावर मी तुला जे काही सांगेन ते तुला ऐकावंच लागेल.."
यावर त्या तरुणाच्या चेहऱ्यावर थोडे आश्चर्यकारक भाव उमटले आणि एका क्षणात मनात विचार आला की, वयाच्या मानाने आपली तब्ब्येत जरा जास्त आहे त्यामुळे कदाचित प्रकाशजी आपल्याला म्हणतील की, उद्यापासून तू स्कुटर अजिबात वापरायची नाही त्याऐवजी सायकल वरूनच फिरायचं..
आता उद्यापासून आपली स्कुटर बंद आणि सायकल सुरु अशी क्षणार्धात आपल्या मनाची तयारी करून त्या तरुणाने प्रकाशजी जे काही सांगतील ते ऐकायची मानसिकता करुनच प्रकाशजींना वचन स्वीकार केल्याचा होकार दिला..
त्या तरुणाने नारळ फोडला आणि हातात प्रसाद घेऊन ते दोघे मंदिराच्या आवारात फिरत फिरत गप्पा मारत बसले..
गप्पा ऐन रंगात आल्या आणि अखेर प्रकाशजींनी मुख्य विषयाला हात घातला..
प्रकाशजी म्हणाले, "मी अनेक वर्षे सक्रिय राजकारणात आहे.. या काळात मी अनेक प्रकारची लोक बघितली.. त्यात तुझी गेल्या ५ वर्षांतील आपल्या पहिल्याच नगरसेवक पदाच्या टर्म मध्ये केलेलं काम पण अतिशय जवळून पाहिलयं..
माझा निर्णय झालाय.. माझं आता वय झालंयं.. त्यामुळे मी आता सक्रीय राजकारणातुन निवृत्ती घेत आहे.. तुझ्या सारखं व्हिजन असणारे तरुण राजकारणात यायला पाहिजेत आणि टीकायला पाहिजेत.. मला माहिती आहे तुझा प्रभाग आरक्षित झाल्याने तुला यावेळी निवडणूक लढवायला थोडीशी अडचण नक्की आहे आणि म्हणूनच तू आता माझ्या जागी येत्या मनपा निवडणुकीला उभं रहावं.."
यावर त्या तरुणाने प्रकाशजींना अतिशय नम्रतापूर्वक आपण अजुन उमदे असल्याने पुढे आपल्याला अजुन बरीच वर्षे मिळणार आहेत आणि त्यामुळे यावेळी आपण स्वतःच निवडणूक न लढविता थांबण्याची इच्छा अगदी स्पष्टपणे सांगितली..
तो तरुण हे सांगत असतानाच त्याला मध्येच थांबवत प्रकाशजी म्हणाले, "हे बघ, नारळ फोडताना मी जे काही सांगेन ते तू ऐकणार आहेस हे वचन तू मला दिले आहेस...."
हे सांगत असतानाच प्रकाशजींनी फोडलेल्या नारळाच्या खोबऱ्याचा एक तुकडा प्रसाद म्हणून त्या तरुणाच्या हातावर ठेवला आणि ते म्हणाले, "बेटा, ज्या प्रमाणे हा खोबऱ्याचा प्रसाद आहे अगदी त्याच प्रमाणे मी मनपा निवडणुकीसाठी माझी जागा ही तुझ्यासाठी सोडली आहे हा सुद्धा या हनुमानानेच तुला दिलेला प्रसाद आहे असं समज.."
अखेर दिलेल्या वचनाप्रमाणे त्या तरुणाला प्रकाशजींचे हे म्हणणे ऐकावेच लागले आणि त्याप्रमाणे त्या तरुणाने ती मनपा निवडणूक लढवली..
आणि तो तरुण ती निवडणूक लढवून सलग दुसऱ्यांदा नगरसेवक झाला.. नुसता नगरसेवकच न्हवे तर तो तरुण त्यावेळी "महापौर" झाला..
आपल्या शहराचा सर्वाधिक तरुण महापौर तसेच देशाच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक तरुण महापौर होण्याचा बहुमान त्या तरुणाने त्यावेळी मिळविला..
आपल्या वैयक्तिक निर्णयानुसार तो तरुण त्याचवेळी आपली पहिली टर्म झाल्यावर निवडणूक लढविण्यापासून थांबला असता तर कदाचित पुढे जाऊन त्या तरुणाच्या राजकीय कारकिर्दीला तिथेच ब्रेक सुद्धा लागू शकला असता..
पण प्रकाशजी आणि टेकडीवरच्या हनुमानाचा तो प्रसाद यामुळेच त्या तरुणाची राजकीय कारकीर्द ब्रेक न लागता पुढे अखंड सुरु राहिली..
सलग दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्यावर त्या तरुणाला 'महापौर' पद तर मिळालेच पण अवघ्या दोन अडीच वर्षांतच पक्षातर्फे विधानसभेची उमेदवारी सुद्धा मिळाली..
त्या तरुणाने त्यावेळी विधानसभेच्या आपल्या त्या पहिल्याच प्रयत्नात विधानसभा निवडणूक जिंकून सुरु केलेली आपली 'आमदार' पदाची घोडदौड मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशी विविध पदे भुषवित आज सलग पाचव्यांदा अगदी सुसाट सुरु आहे..
तो तरुण म्हणजे आपले "देवेंद्रजी फडणवीस....!!"
आणि टेकडीवरच्या हनुमानाने प्रसाद दिलेलं मंदीर म्हणजे नागपुरात सिव्हिल लाईन रोडने गेल्यावर पुढे येणारे "तेलंखेडी हनुमान मंदीर.."
देवेंद्रजींनी ही घटना स्वतःच एकदा बोलताना सांगितलेली.. तेंव्हापासून ही घटना लिहिण्याची आणि एकदा त्या मंदीरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेण्याची मनोमन इच्छा होती..
काही कामानिमित्त नागपूरला जाण्याचा योग आला आणि तिथे गेल्यावर हनुमानाचे दर्शन घेऊनच ही पोस्ट लिहित आहे..
- मयूर कुपाडे
#mayurkupade
#जयश्रीराम
Devendra Fadnavis जी 🚩🚩
No comments:
Post a Comment